शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

रुंद वरंबा सरी पद्धतीनेच सोयाबीनची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान ...

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान त्या बोलत होत्या. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने चिखली, खरबी, परसोडी येथे कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. पुरेसा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी, त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ होते. त्याचप्रमाणे, रासायनिक खतात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बीएफ पद्धतीने पेरणी केल्याने बियाण्याची बचत होऊन वेळ व खर्चातही मोठी बचत झाल्याचे सांगितले. कृषी सहायक दराडे यांनी शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन पेरणी करताना पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याऐवजी रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचून न राहता, जास्तीचे पाणी सरीतून बाहेर काढणे सोपे जाते, तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहून कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे सांगितले.

कोट

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जास्तीचा पाऊस पडला, तरी ते पाणी सरीवाटे निघून जाते व कमी पाऊस पडला, तरीही वरंब्याद्वारे ओलावा राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बीबीएफ पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

रेणुका दराडे, कृषी सहायक, परसोडी

बॉक्स

बीबीएफ पद्धतीचे फायदे बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजुरांची ६० टक्के बचत होते. सरासरी पाच ते सात टक्के क्षेत्रावर प्रति दिन पेरणी होते. आंतर मशागत करणे शक्य होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते. या पद्धतीमध्ये चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. पिकाची वाढ जोमदार होते. अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन पाणी निघून जाते. पाणी सऱ्यांमध्ये मुरते व मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो. असे रुंद वरंबा-सरी पद्धतीचे फायदे होत असल्याने, पीक उत्पादनात भरघोस वाढ होते.