शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

रुंद वरंबा सरी पद्धतीनेच सोयाबीनची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान ...

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान त्या बोलत होत्या. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने चिखली, खरबी, परसोडी येथे कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. पुरेसा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी, त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ होते. त्याचप्रमाणे, रासायनिक खतात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बीएफ पद्धतीने पेरणी केल्याने बियाण्याची बचत होऊन वेळ व खर्चातही मोठी बचत झाल्याचे सांगितले. कृषी सहायक दराडे यांनी शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन पेरणी करताना पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याऐवजी रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचून न राहता, जास्तीचे पाणी सरीतून बाहेर काढणे सोपे जाते, तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहून कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे सांगितले.

कोट

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जास्तीचा पाऊस पडला, तरी ते पाणी सरीवाटे निघून जाते व कमी पाऊस पडला, तरीही वरंब्याद्वारे ओलावा राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बीबीएफ पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

रेणुका दराडे, कृषी सहायक, परसोडी

बॉक्स

बीबीएफ पद्धतीचे फायदे बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजुरांची ६० टक्के बचत होते. सरासरी पाच ते सात टक्के क्षेत्रावर प्रति दिन पेरणी होते. आंतर मशागत करणे शक्य होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते. या पद्धतीमध्ये चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. पिकाची वाढ जोमदार होते. अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन पाणी निघून जाते. पाणी सऱ्यांमध्ये मुरते व मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो. असे रुंद वरंबा-सरी पद्धतीचे फायदे होत असल्याने, पीक उत्पादनात भरघोस वाढ होते.