शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रुंद वरंबा सरी पद्धतीनेच सोयाबीनची लागवड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान ...

भंडारा तालुक्यातील चिखली येथे कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या प्रात्यक्षिकाच्या दरम्यान त्या बोलत होत्या. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने चिखली, खरबी, परसोडी येथे कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया व रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीन लागवड करण्याविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. पुरेसा पाऊस झाला असून, शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बुरशीनाशक, कीटकनाशक, रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करूनच सोयाबीनची पेरणी करावी, त्यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ होते. त्याचप्रमाणे, रासायनिक खतात बचत होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे कृषी सहायक रेणुका दराडे यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बीएफ पद्धतीने पेरणी केल्याने बियाण्याची बचत होऊन वेळ व खर्चातही मोठी बचत झाल्याचे सांगितले. कृषी सहायक दराडे यांनी शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन पेरणी करताना पारंपरिक पद्धतीने पेरणी करण्याऐवजी रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड करावी. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचून न राहता, जास्तीचे पाणी सरीतून बाहेर काढणे सोपे जाते, तसेच रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पिकांमध्ये हवा खेळती राहून कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे सांगितले.

कोट

शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे जास्तीचा पाऊस पडला, तरी ते पाणी सरीवाटे निघून जाते व कमी पाऊस पडला, तरीही वरंब्याद्वारे ओलावा राहत असल्याने पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे बीबीएफ पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.

रेणुका दराडे, कृषी सहायक, परसोडी

बॉक्स

बीबीएफ पद्धतीचे फायदे बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यांसह तयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात. मजुरांची ६० टक्के बचत होते. सरासरी पाच ते सात टक्के क्षेत्रावर प्रति दिन पेरणी होते. आंतर मशागत करणे शक्य होते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते. या पद्धतीमध्ये चांगली मशागत होऊन बियाण्यासाठी चांगले वरंबे तयार होतात. हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. पिकाची वाढ जोमदार होते. अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होऊन पाणी निघून जाते. पाणी सऱ्यांमध्ये मुरते व मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाचा दीर्घकालीन खंड पडल्यास जमिनीत ओलावा टिकून राहतो. असे रुंद वरंबा-सरी पद्धतीचे फायदे होत असल्याने, पीक उत्पादनात भरघोस वाढ होते.