शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

झाडीपट्टीचा नायक-खलनायक रविंद्र ठवकर

By admin | Updated: September 22, 2015 01:04 IST

गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील

युवराज गोमासे ल्ल करडी (पालोरा)गणेशोत्सव, दिवाळी, नववर्षाच्या पर्वावर हौसेखातर सर्वोदय नाट्यमंडळाच्या रंगभूमीवर नाटके सादरीकरण करणारा पालोरा येथील रविंद्र ठवकर यांचे नाव नाट्यक्षेत्रात आज झाडीपट्टीचा नायक म्हणून आदराने घेतले जाते. ३० वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चढ उतार त्यांनी अनुभवले. गरीबीमुळे पोटापाण्यासाठी अनेक व्यवसायांचे उपद्व्याप सुरु केल्यानंतरही त्यांची नाटकांची ओढ कमी झाली नाही. सशक्त अभिनय, दमदार संवाद व उत्कृष्ट देहबोलीच्या भरवशावर नाट्यरसिकांची दाद मिळविली. अनेक पुरस्कार व पारितोषिकांचे ते मानकरी ठरले आहेत. पालोरा येथील सर्वोदय नाट्य मंडळाच्या रंगभूमीवर तयार झालेल्या रविंद्र तुळशीराम ठवकर या ४७ वर्षीय नाट्य कलावंताचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले. घरी दोन एकर जमीन, दोन भाऊ, प्रपंचाचा गाडा निट चालावा म्हणून सुरुवातीला मजुरी, देव्हाडा वैनगंगा साखर कारखान्यात पहारेदाराची नोकरी केली. कारखाना बंद झाल्यानंतर टेलरिंग व दुधाचा व्यवसाय आज ते सांभाळत आहेत.सन १९७२ मध्ये ‘बोवा तिथे बाया’ या नाटकात त्यांनी बालकलाकाराची भूमिका वठविली. नाटकातील गंध वाढत गेला. तरुण वयातील ‘फकीरा’ ही पहिली नाटक गाजली. अन् नायक म्हणून त्यांचा उदय झाला. त्यानंतर सर्व नाटकात खलनायक व नायकाचीच भूमिका त्यांना मिळाली. त्यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये यळकोट मल्हार, मराठा गडी - यशाचा धनी, ईथ ओसाळला मृत्यू, संभा बेलदार, भीक, भाकर, भूक, रुसली साडी माहेरची, खंडोबाची आण, सिंहाचा छावा, काकाचा अघोरी कावा, तो मी नव्हेच आदी व अन्य नाटकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी २५१ नाटके खेळली. खलनायकाचीही पात्रे रंगविली. व्यावसायीक रंगभूमीत सन १९९६ मध्ये प्रवेश झाला. ‘सासू नंबरी-सून दस नंबरी’ ही त्यांची पहिली व्यावसायीक नाटक प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने गाजविली. पसंतीस उतरली, भंडारा जिल्ह्यात नाव झाला. सरगम नाट्य रंगभूमीमुळे आघाडीचा नाट्यकलावंत म्हणून ओळख मिळाली. भंडारा सरगम रंगभूमी व कामगार कल्याण मंडळ तुमसर यांचेमुळे नागपूर विभागीय स्तरावर अनेक नाटके खेळता आली, असे ठवकर आदराने सांगतात.पारितोषिके प्रोत्साहन व चालना४पालोरा सारख्या दुर्गम खेड्यातून समोर आलेल्या रविंद्र ठवकर यांनी सरगम नाट्य रंगभूमी व सर्वस्तरीय कलाकार परिषदेची स्थापना होण्यासाठी मोलाची मदत केली, ते संस्थापक सदस्य आहेत. नवनवीन कलाकारांना चालना देणे, मंच मिळवून देण्यासोबत प्रशिक्षणाचे काम पार पाडल्या जात आहेत. समाजकल्याण विभागाद्वारे संचालित कामगार कल्याण मंडळाद्वारे खेळल्या गेलेल्या ‘मनधुंवाधार’ या नाटकासाठी कामगार कल्याण मंडळाचा पुरस्कार मिळाला. कलाकार परिषदेतर्फेही उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेकदा सन्मानित करण्यात आले. खेड्यातील कलावंतांना संदेश४गाव, खेड्यातील नाट्य कलावंतांनी मेहनत केली पाहिजे. मार्गदर्शनातून मनुष्य पुढे जातो. कलेची सर्वत्र प्रसंशा होते. झाडीपट्टीतील कलावंतांनी गावातील स्टेजवर अवलंबून न राहता व्यवसायीक रंगभूमीकडे वळावे किंवा हौशी रंगभूमीला तरी जोपासले पाहिजे. कला प्रत्येकाच्या अंगी असून ती योग्य स्तरावर प्रदर्शीत झाली पाहिजे, असा संदेश रविंद्र ठवकर यांचा आहे.