शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पाणीटंचाईचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:53 IST

भूसर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. १२९ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावणार असल्याचे नमूद आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : रिडींगनुसारच शेतकऱ्यांना बील द्या

आॅनलाईन लोकमतभंडारा : भूसर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. १२९ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावणार असल्याचे नमूद आहे. या बाबीची गांर्भियाने दखल घेऊन पाणी टंचाईचे नियोजन आतापासूनच युध्दपातळीवर करा, अशा सूचना खासदार नाना पटोले यांनी केल्या.दिशा समितीची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधिक्षक रशमी नांदेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होते.खासदार पटोले म्हणाले, कृषि पंपधारक शेतकऱ्यांना विद्युत विभागाद्वारे सरासरीने बिल देण्यात आले आहे. त्यामुळे बिलात भरमसाठ वाढ झालेली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे त्यात बिलातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. म्हणून विद्युत विभागाने रिडिंगनुसार बिल दयावेत, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. पाणी टंचाईबाबत खासदार पटोले म्हणाले, मागच्या वर्षीच्या तुलनेत ०.२३ टक्के पाण्याची पातळी खाली गेली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.झुडपी जगंलाबाबत केंद्रिय वन खात्यांकडून ठोस निर्णय होणे आवश्यक असून झुडपी जंगलाबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. संजय गांधी निराधार योजनेत मंजूर झालेल्या प्रत्येक प्रकरणात लाभार्थ्यांना पात्र व अपात्र असल्याचे पत्र पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांना दिल्या. मनरेगात जलस्त्रोतांची जास्तीत जास्त कामे घेण्यात यावीत. जलस्त्रोत विकासाचा आराखडा मनरेगात सादर करण्याच्या सूचना खासदार पटोले यांनी खंड विकास अधिकाºयांना दिल्या. मनरेगामधून कृषि विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. उत्पादकता व आर्थिकतेत सक्षम असलेला जिल्हा निर्माण व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच पेरणी ते कापणी या तत्वावर आधारीत शेती विकास करुन रोजगार हमी मुक्त जिल्हा करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुपोषण, बालमृत्यु व माता मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना तयार करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.संचालन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सर्ववंशी यांनी मानले.