शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

पाणीटंचाईचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:53 IST

भूसर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. १२९ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावणार असल्याचे नमूद आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : रिडींगनुसारच शेतकऱ्यांना बील द्या

आॅनलाईन लोकमतभंडारा : भूसर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील पाण्याची पातळी कमी झालेली आहे. १२९ गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावणार असल्याचे नमूद आहे. या बाबीची गांर्भियाने दखल घेऊन पाणी टंचाईचे नियोजन आतापासूनच युध्दपातळीवर करा, अशा सूचना खासदार नाना पटोले यांनी केल्या.दिशा समितीची बैठक जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर पोलीस अधिक्षक रशमी नांदेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होते.खासदार पटोले म्हणाले, कृषि पंपधारक शेतकऱ्यांना विद्युत विभागाद्वारे सरासरीने बिल देण्यात आले आहे. त्यामुळे बिलात भरमसाठ वाढ झालेली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला आहे त्यात बिलातील वाढ यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. म्हणून विद्युत विभागाने रिडिंगनुसार बिल दयावेत, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या. पाणी टंचाईबाबत खासदार पटोले म्हणाले, मागच्या वर्षीच्या तुलनेत ०.२३ टक्के पाण्याची पातळी खाली गेली आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.झुडपी जगंलाबाबत केंद्रिय वन खात्यांकडून ठोस निर्णय होणे आवश्यक असून झुडपी जंगलाबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. संजय गांधी निराधार योजनेत मंजूर झालेल्या प्रत्येक प्रकरणात लाभार्थ्यांना पात्र व अपात्र असल्याचे पत्र पाठवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी तहसिलदारांना दिल्या. मनरेगात जलस्त्रोतांची जास्तीत जास्त कामे घेण्यात यावीत. जलस्त्रोत विकासाचा आराखडा मनरेगात सादर करण्याच्या सूचना खासदार पटोले यांनी खंड विकास अधिकाºयांना दिल्या. मनरेगामधून कृषि विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. उत्पादकता व आर्थिकतेत सक्षम असलेला जिल्हा निर्माण व्हावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच पेरणी ते कापणी या तत्वावर आधारीत शेती विकास करुन रोजगार हमी मुक्त जिल्हा करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी समितीचे सदस्य व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कुपोषण, बालमृत्यु व माता मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस उपाय योजना तयार करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.संचालन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार सर्ववंशी यांनी मानले.