शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

कमी पाण्यामध्ये पिकाचे नियोजन करा

By admin | Updated: March 29, 2016 00:30 IST

शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल.

प्रज्ञा गोळघाटे यांचे प्रतिपादन : पवनी येथे कार्यक्रमपवनी : शेतीसाठी व पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलस्त्रोताचा योग्य नियोजन करुन जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल. याबाबत काटकसरीचा वापर करुन कमीतकमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पिकांचे नियोजन शेतकरी बांधवांनी करावे व उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.कृषि व्यवस्थापन संस्था (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी पवनी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या जलजागृती अभियान अंतर्गत सुक्ष्म सिंचन पध्दतीने फायदे व ठिंबक तुषार संचाचे व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडून सेंद्रीय शेतीकडे वळावे व नफा मिळवावा असे सांगुन परंपरागत कृषी विकास, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी आदेशकुमार गजभिये, गोसेखुर्दचे सहायक अभियंता अहिरराव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. एन. बारई, लागवड अधिकारी घरडे, पं.स.चे कृषी अधिकारी वानखेडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. पी. पर्वते, नेटाकिमचे कृषी विद्यावेतन धनंजय मेहत्रे, कृषी अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. जलसंधारण, मृदसंधारण, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, याविषयीची माहिती तालुका कृषी अधिकारी ए. डी. गजभिये यांनी दिली व पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मार्गदर्शन केले. धनंजय मेहत्रे यांनी पिकांना मोकाट पाणी देण्यापेक्षा ठिंबक व तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा असे सांगुन ठिंबक व तुषार सिंचन वापरण्याची पध्दत समजावून दिली. यावेळी सहायक अभियंता अहिरवार, वनपरिक्षेत्र अधिकारी बारई, कृषी पर्यवेक्षक मेश्राम व हुमणे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन पी. पी. पर्वते यांनी तर आभार कृषी अधिकारी वाघमारे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)