शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच ...

कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलमय झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कारधा निलज राज्य मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. ते काम कासवगतीने होत असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम केलेले दिसते आहे. कोंढा व कोसरा या दोन्ही गावाच्या मध्यातून राज्यमार्ग जातो, येथील जवळपास दीड किलोमीटर मार्ग कंपनीने मागील दोन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवले, पण ते काम पूर्ण न केल्याने मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच सर्वत्र मातीयुक्त चिखल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

येथील मुख्य बाजारपेठ राज्यमार्गावर आहे. राज्यमार्गाच्या आजूबाजूला मोठी मोठी दुकाने आहेत, त्या दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोंढा कोसरा या गावांना आजूबाजूची पंचवीस ते तीस गावे जोडली आहेत .त्यांचा संपर्क दररोज या गावाशी होत असते, पण सध्या राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून चिखलीत असल्याने नागरिकांना येथे येण्यास मोठा त्रास होत आहे. मार्गावर येथे १० ते १२ फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे आजूबाजूला चिखलयुक्त माती आहे त्यामुळे जडवाहन, चाकीवाहन, मोटारसायकल, सायकलस्वार यांना येण्या-जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक नागरिक या खड्डेयुक्त रस्त्यावर गंभीर जखमी झाले आहे. कंत्राटदार कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. मार्गावर अनेकांचे घर आहेत घरासमोर चिखलच चिखल असल्याने दुर्गंधी पसरली आहे. रोगराई वाढण्याची शक्यता आहे. कोसरा गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर नाली बांधकाम सुरू आहे. पण गावात येण्या-जाण्यासाठी योग्य मार्ग न काढल्याने वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन राज्यमार्ग खोदून ठेवला, पण ते काम न केल्याने लोकांमध्ये बांधकाम कंपनीविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

राज्यमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटदार खिसे गरम करीत असल्याने ते दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. कोंढा येते अर्धवट काम केले असल्याने रस्त्यावर येणे जाणे करणे कठीण जात आहे. तेव्हा या सर्व सर्व गोष्टीचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पावसाळ्यात रस्ता उखडून ठेवल्याने नागरिक त्रस्त आहेत, तेव्हा कोंढा येथील राज्यमार्गाचे काम त्वरित करावे अन्यथा येथील नागरिक जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.