शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कोंढा येथे मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच ...

कोंढा -कोसरा: कोंढा येथे राज्यमार्गावर रस्ता खोदकाम करून ठेवले, पण ते काम बांधकाम कंपनीने केले नसल्याने मुख्य मार्गावर खड्डेच खड्डे दिसत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलमय झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कारधा निलज राज्य मार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. ते काम कासवगतीने होत असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी अर्धवट काम केलेले दिसते आहे. कोंढा व कोसरा या दोन्ही गावाच्या मध्यातून राज्यमार्ग जातो, येथील जवळपास दीड किलोमीटर मार्ग कंपनीने मागील दोन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवले, पण ते काम पूर्ण न केल्याने मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. तसेच सर्वत्र मातीयुक्त चिखल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

येथील मुख्य बाजारपेठ राज्यमार्गावर आहे. राज्यमार्गाच्या आजूबाजूला मोठी मोठी दुकाने आहेत, त्या दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोंढा कोसरा या गावांना आजूबाजूची पंचवीस ते तीस गावे जोडली आहेत .त्यांचा संपर्क दररोज या गावाशी होत असते, पण सध्या राज्य मार्ग पूर्णपणे उखडला असून चिखलीत असल्याने नागरिकांना येथे येण्यास मोठा त्रास होत आहे. मार्गावर येथे १० ते १२ फुटाचे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे आजूबाजूला चिखलयुक्त माती आहे त्यामुळे जडवाहन, चाकीवाहन, मोटारसायकल, सायकलस्वार यांना येण्या-जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेक नागरिक या खड्डेयुक्त रस्त्यावर गंभीर जखमी झाले आहे. कंत्राटदार कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. मार्गावर अनेकांचे घर आहेत घरासमोर चिखलच चिखल असल्याने दुर्गंधी पसरली आहे. रोगराई वाढण्याची शक्यता आहे. कोसरा गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर नाली बांधकाम सुरू आहे. पण गावात येण्या-जाण्यासाठी योग्य मार्ग न काढल्याने वाहनधारकांना मोठा त्रास होत आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन राज्यमार्ग खोदून ठेवला, पण ते काम न केल्याने लोकांमध्ये बांधकाम कंपनीविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

राज्यमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटदार खिसे गरम करीत असल्याने ते दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे. कोंढा येते अर्धवट काम केले असल्याने रस्त्यावर येणे जाणे करणे कठीण जात आहे. तेव्हा या सर्व सर्व गोष्टीचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पावसाळ्यात रस्ता उखडून ठेवल्याने नागरिक त्रस्त आहेत, तेव्हा कोंढा येथील राज्यमार्गाचे काम त्वरित करावे अन्यथा येथील नागरिक जन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.