शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:20 IST

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे. केंद्र व राज्य सरकारने याप्रकरणी वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणारा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देणारा योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मिशनने केली आहे.क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रज राजवटीत अन्याय, अत्यचार, शोषणाविरुद्ध लढा उभारला होता. तसेच भारत देशातील शोषित पीडित सामान्य नागरिकांना त्यांचे जन्मजात हक्क, अधिकार मिळावे यासाठी जीवाचे रान केले आणि पुण्यामध्ये १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार खुले केले. यास भारत देशातील जातीवादी व्यवस्थेने त्यांचा फार मोठा विरोध केला होता. परंतु त्यास न जुमानता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात तयार करून त्यांचे शैक्षणिक जबाबदारी सोपविली व सावित्रीबाई फुले यांना कशाचीही तमा, मान सन्मान न पाहता ती जबाबदारी निर्भीडपणे पार पाडली आहे. सावित्रीबाई फुले या भारत देशातील बहुजन समाजाच्या पहिल्या आद्यशिक्षिका आहेत. साथ पसरली असता रुग्णांची सेवा करताना त्या मृत्यू पावल्या. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना शेतकरी, शेतमजूरांच्या उत्थानासाठी बरेच भरीव कार्य केले असून शेतकºयांच्या आसूड या ग्रंथात शेतकºयांबाबत विस्तृत लेखन करून शेतकºयांचे हित जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे फुले दांपत्यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रास प्रेरक ठरत असून नवी दिशा देणारे असताना या दांपत्यांना अजूनपर्यंत या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. हे न्याय व तर्कसंगत नसून याबाबद संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून बहुजन समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन व मानविद्य दृष्टीकोनातून सम्यक विचार विनिमय करून क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून तमाम नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशनचे जिल्हाअध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, गौतम कानेकर, इंजि. अजय रंगारी, अशोक बागडे, धनराज कानेकर, अशोक फुलेकर, हितेंद्र मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.