शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फुले दाम्पत्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 21:20 IST

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या द्वय महामानवांचे कार्य भारत देशातील समस्त समाजाला योग्य दिशा व प्रेरणारे देणारे आहे. केंद्र व राज्य सरकारने याप्रकरणी वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करणारा धोरणात्मक निर्णय घेऊन तमाम नागरिकांना दिलासा देणारा योग्य न्याय प्रदान करावा, अशी मागणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मिशनने केली आहे.क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रज राजवटीत अन्याय, अत्यचार, शोषणाविरुद्ध लढा उभारला होता. तसेच भारत देशातील शोषित पीडित सामान्य नागरिकांना त्यांचे जन्मजात हक्क, अधिकार मिळावे यासाठी जीवाचे रान केले आणि पुण्यामध्ये १८४८ साली मुलींसाठी पहिली शाळा स्थापन करून बहुजन समाजासाठी शिक्षणाचे दार खुले केले. यास भारत देशातील जातीवादी व्यवस्थेने त्यांचा फार मोठा विरोध केला होता. परंतु त्यास न जुमानता क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षण क्षेत्रात तयार करून त्यांचे शैक्षणिक जबाबदारी सोपविली व सावित्रीबाई फुले यांना कशाचीही तमा, मान सन्मान न पाहता ती जबाबदारी निर्भीडपणे पार पाडली आहे. सावित्रीबाई फुले या भारत देशातील बहुजन समाजाच्या पहिल्या आद्यशिक्षिका आहेत. साथ पसरली असता रुग्णांची सेवा करताना त्या मृत्यू पावल्या. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना शेतकरी, शेतमजूरांच्या उत्थानासाठी बरेच भरीव कार्य केले असून शेतकºयांच्या आसूड या ग्रंथात शेतकºयांबाबत विस्तृत लेखन करून शेतकºयांचे हित जोपासण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे फुले दांपत्यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रास प्रेरक ठरत असून नवी दिशा देणारे असताना या दांपत्यांना अजूनपर्यंत या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही. हे न्याय व तर्कसंगत नसून याबाबद संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून बहुजन समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष पसरला आहे.याप्रकरणी केंद्र व राज्य सरकारने वेळीच दखल घेऊन व मानविद्य दृष्टीकोनातून सम्यक विचार विनिमय करून क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दांपत्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करून तमाम नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशनचे जिल्हाअध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, गौतम कानेकर, इंजि. अजय रंगारी, अशोक बागडे, धनराज कानेकर, अशोक फुलेकर, हितेंद्र मेश्राम यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.