शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या बाबतीत ही भरारी मात्र विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा फार अधिक आहे. पेट्रोल-डिझेल पेक्षाही चक्क विमानाचे इंधन स्वस्त असल्याचे दिसून येते. परिणामी सर्वसामान्यांना वाहन चालविणे कसे परवडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा शहरात पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०९ रुपयांपर्यंत तर डिझेलचा भाव प्रति लिटर ९८ रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

तर दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टरबाइन फ्युल या इंधनाचा भाव प्रति लिटर ६० रुपये इतका आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पेट्रोल आणि डिझेलचे भाव जात असल्याने वाहन चालविणे सोडायचे काय? असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे.

पगार कमी खर्चात वाढ

गत दीड वर्षभरात कोरोना काळात महागाईने चांगलाच उच्चांक निर्माण केला आहे. दरडोई उत्पन्नात हवी तेवढी प्रमाणात वाढ झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी-जास्त होत असतानाही इंधनाच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत गेली. तसेच त्यामानाने पगारात मात्र वाढ झालेली नाही. दोन वर्षांपासून पगार कमी आणि खर्च वाढले आहेत कौटुंबिक गाढा ओढायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे

- रूपेश कानतोइे,

भंडारा

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम सरळसरळ वाहतूक सेवेवर पडत आहे. दुचाकीमध्ये आधी मी प्रती आठवड्याला दोनशे रुपयांचा पेट्रोल माझ्या दुचाकीत घालत होतो. मात्र आता ४०० रुपयांचे पेट्रोल आवागमनासाठी लागत आहे. परंतु त्या तुलनेत वेतनात कुठलीही वाढ झालेली नाही. ही बाब नक्कीच खिशाला कात्री लावणारी आहे. इंधनाचे दर कमी व्हायला हवे.

- रमेश लांजेवार,

भंडारा

कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार

गत दीड वर्षात कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. अनेक लोकांचे उद्योगधंदेही बुडाले. हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांचे तर हाल बेहाल झाले. कारोनामुळे खर्चात अधिकच भर पडली. ज्या ठिकाणी पाचशे रुपये लागायचे, आता तो खर्च हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. त्यात सर्वाधिक मार हा मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना बसला आहे. आधीच आर्थिक भुर्दंड बसला असताना महागाईने त्यात चांगलीच भर घातली आहे. पगार कमी आणि खर्चात वाढ जास्त झाल्याने कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक घडी व त्याची गती रुळावर आली असली तरी हव्या त्या प्रमाणात आर्थिक लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.