शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

विमानाच्या इंधनापेक्षाही पेट्रोल महाग; वाहन चालविणे कसे परवडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST

इंद्रपाल कटकवार लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या ...

इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दराच्या बाबतीत ही भरारी मात्र विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या दरापेक्षा फार अधिक आहे. पेट्रोल-डिझेल पेक्षाही चक्क विमानाचे इंधन स्वस्त असल्याचे दिसून येते. परिणामी सर्वसामान्यांना वाहन चालविणे कसे परवडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भंडारा शहरात पेट्रोलचा भाव प्रति लिटर १०९ रुपयांपर्यंत तर डिझेलचा भाव प्रति लिटर ९८ रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

तर दुसरीकडे विमानासाठी लागणाऱ्या एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टरबाइन फ्युल या इंधनाचा भाव प्रति लिटर ६० रुपये इतका आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पेट्रोल आणि डिझेलचे भाव जात असल्याने वाहन चालविणे सोडायचे काय? असा प्रश्नही मनात निर्माण होत आहे.

पगार कमी खर्चात वाढ

गत दीड वर्षभरात कोरोना काळात महागाईने चांगलाच उच्चांक निर्माण केला आहे. दरडोई उत्पन्नात हवी तेवढी प्रमाणात वाढ झाली नसली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव कमी-जास्त होत असतानाही इंधनाच्या दरात मात्र सातत्याने वाढ होत गेली. तसेच त्यामानाने पगारात मात्र वाढ झालेली नाही. दोन वर्षांपासून पगार कमी आणि खर्च वाढले आहेत कौटुंबिक गाढा ओढायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे

- रूपेश कानतोइे,

भंडारा

पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम सरळसरळ वाहतूक सेवेवर पडत आहे. दुचाकीमध्ये आधी मी प्रती आठवड्याला दोनशे रुपयांचा पेट्रोल माझ्या दुचाकीत घालत होतो. मात्र आता ४०० रुपयांचे पेट्रोल आवागमनासाठी लागत आहे. परंतु त्या तुलनेत वेतनात कुठलीही वाढ झालेली नाही. ही बाब नक्कीच खिशाला कात्री लावणारी आहे. इंधनाचे दर कमी व्हायला हवे.

- रमेश लांजेवार,

भंडारा

कोरोनामुळे खर्चात भर; पाचशेच्या ठिकाणी हजार

गत दीड वर्षात कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले आहे. अनेक लोकांचे उद्योगधंदेही बुडाले. हातावर कमविणे व पानावर खाणाऱ्यांचे तर हाल बेहाल झाले. कारोनामुळे खर्चात अधिकच भर पडली. ज्या ठिकाणी पाचशे रुपये लागायचे, आता तो खर्च हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. त्यात सर्वाधिक मार हा मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांना बसला आहे. आधीच आर्थिक भुर्दंड बसला असताना महागाईने त्यात चांगलीच भर घातली आहे. पगार कमी आणि खर्चात वाढ जास्त झाल्याने कुटुंबाचा गाडा ओढायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आर्थिक घडी व त्याची गती रुळावर आली असली तरी हव्या त्या प्रमाणात आर्थिक लाभ होत नसल्याचे दिसून येत आहे.