शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील बारमाही वनमजूर आठ महिन्यांपासून वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:28 IST

भंडारा : वनाचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्यभरातील बारमाही वनमजुरांवर उपासमारीची संकट बळावले आहे. गत आठ महिन्यांपासून या ...

भंडारा : वनाचे रक्षण करण्याची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या राज्यभरातील बारमाही वनमजुरांवर उपासमारीची संकट बळावले आहे. गत आठ महिन्यांपासून या वन मजुरांना वेतन मिळालेले नाही. यासंदर्भात या मजुरांना त्वरित वेतन न दिल्यास राज्य स्तरावर तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटनेने दिला आहे.

याबाबत असे की, राज्यातील वनविभाग, वन्यजीव व सामाजिक वनीकरण विभागांतर्गत गत दोन दशकांपासून जवळपास चार हजार बारमाही वनमजुर नियमितपणे सेवा देत आहेत. वनसंरक्षणाचे काम ते इमानेइतबारे पाहत आहेत. संबंधित विभागाकडून नियमित वेतनही मिळत होते. परंतु मे २०२०पासून त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेले नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा असा यक्षप्रश्न या मजुरांसमोर उभा ठाकला आहे. यासंदर्भात या मजुरांना वेतन द्यावे अशी मागणी केली, मात्र त्यांच्या या रास्त मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन या बारमाही वनमजुरांना थकीत वेतन द्यावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

‘‘वन कामगारांना न्याय देण्यासाठी राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटना सातत्याने लढा देत आहे. आठ महिन्यांपासून या बारमाही बंद मजुरांना वेतन न मिळाल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शासनाची भूमिका ही आडमुठेपणाची आहे. परिणामी शासनाने याकडे गांभीर्याने बघून मजुरांना वेतन देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.’’

युवराज रामटेके, अध्यक्ष,

राज्य वन व सामाजिक वनीकरण रोजंदारी मजूर कामगार संघटना