शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मतदानाची टक्केवारी ४० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:53 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली.

ठळक मुद्दे१८ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद : ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे घसरली मतदानाची टक्केवारी

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात कमालिची झट झाली आहे. पुनर्वसनाच्या समस्या कायम असल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त मतदारांनी मतदानावर बहिष्काराच्या घातला. या घटना वगळता सर्वच २,१४९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत पटले, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भारिपचे अ‍ॅड.एल.के. मडावी, बीआरएसपीचे राजेश बोरकर यांच्यासह १८ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी ६ वाजता या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. या पोटनिवडणुकीत शहरी व ग्रामीण मतदारांमध्ये निरूत्साह होता. परंतु मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी तापमानाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळच्या सुमारास मतदान केंद्र गाठले परंतु मतदारसंघातील सर्वच १५ ही तालुक्यातील बहुतांश ईव्हीएम मशिनमध्ये सकाळपासूनच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या अनेकांना आल्यापावली परतावे लागले. ज्या मतदान केंद्रांतील ईव्हीएममध्ये अडचणी आल्या नाहीत, त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत होती. सकाळी ९ पर्यंत ५.९८ टक्के, ११ पर्यंत १३.९० टक्के, १ पर्यंत २२.५९ टक्के, ३ पर्यंत २४.५७ टक्के मतदान झाले होते. ऊन्हामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मतदारांची संख्या अत्यल्प होती. बहुतांश मतदान केंद्रात शुकशुकाट दिसून आला तर सायंकाळी अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. 

सामाजिक न्याय भवनात मतमोजणी ३१ मे रोजीया पोटनिवडणुकीची मतमोजणी दि.३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात होईल. सकाळी ८ पासून विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी या भवनात चोख व्यवस्था करण्यात आली. या भवनाच्या आतील कुणाला काही दिसू नये, यासाठी सभोवताल टिनाचे पत्रे लावण्यात आले आहे. याशिवाय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बहिष्कार घातलेल्या गावात अत्यल्प मतदानगोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित बोरगाव, निमगाव यासह त्या परिसरातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आणि माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी या गावांना भेटी देऊन मतदारांशी चर्चा केली आणि त्यांना लोकशाहीत मतदान हा आपला अधिकार आहे, याची जाणीव करून दिली. त्यांच्या विनंतीला मान देत काहींनी मतदान करू असे सांगितले तर काहींनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. बोरगाव येथे १,१५५ मतदानापैकी ८० ते ९० मतदान झाले. निमगाव येथे शंभरच्या आत मतदान झाल्याचे सांगण्यात आले. 

लोकशाही धोक्यात -राकॉ, भारिपचा आरोप२,१४९ मतदार केंद्रावर घेण्यात आलेल्या बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळपासून तांत्रिक बिघाड का? झाला असा प्रश्न उपस्थित करून शासन प्रशासनावर दबाव आणून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाने केला. या मतदारसंघात ३५० ते ४०० ईव्हीएम बंद आढळून आल्या. काही मशिनमध्ये व्हीव्हीपॅटमधून चिठ्या निघत नसल्याचे सांगून बटन कोणतेही दाबा मत कमळाला जात असल्यामुळे या देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावात आहे. त्यामुळे येणारा काळ जनतेने समजून घेतला पाहिजे. निवडणूक आयोगाने सरकारची कठपुतली म्हणून काम करू नये, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्ञानेश्वर सुलताने, अनुप बहुले, डी.आर.रामटेके, महेश मेश्राम उपस्थित होते.