शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मतदानाची टक्केवारी ४० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:53 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली.

ठळक मुद्दे१८ उमेदवारांचे भाग्य मशीन बंद : ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे घसरली मतदानाची टक्केवारी

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली. २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानात कमालिची झट झाली आहे. पुनर्वसनाच्या समस्या कायम असल्याचा आरोप करून प्रकल्पग्रस्त मतदारांनी मतदानावर बहिष्काराच्या घातला. या घटना वगळता सर्वच २,१४९ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

या पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत पटले, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भारिपचे अ‍ॅड.एल.के. मडावी, बीआरएसपीचे राजेश बोरकर यांच्यासह १८ उमेदवार रिंगणात होते. सायंकाळी ६ वाजता या उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले. या पोटनिवडणुकीत शहरी व ग्रामीण मतदारांमध्ये निरूत्साह होता. परंतु मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी तापमानाचा त्रास होऊ नये यासाठी सकाळच्या सुमारास मतदान केंद्र गाठले परंतु मतदारसंघातील सर्वच १५ ही तालुक्यातील बहुतांश ईव्हीएम मशिनमध्ये सकाळपासूनच तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या अनेकांना आल्यापावली परतावे लागले. ज्या मतदान केंद्रांतील ईव्हीएममध्ये अडचणी आल्या नाहीत, त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत होती. सकाळी ९ पर्यंत ५.९८ टक्के, ११ पर्यंत १३.९० टक्के, १ पर्यंत २२.५९ टक्के, ३ पर्यंत २४.५७ टक्के मतदान झाले होते. ऊन्हामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत मतदारांची संख्या अत्यल्प होती. बहुतांश मतदान केंद्रात शुकशुकाट दिसून आला तर सायंकाळी अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. 

सामाजिक न्याय भवनात मतमोजणी ३१ मे रोजीया पोटनिवडणुकीची मतमोजणी दि.३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात होईल. सकाळी ८ पासून विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी या भवनात चोख व्यवस्था करण्यात आली. या भवनाच्या आतील कुणाला काही दिसू नये, यासाठी सभोवताल टिनाचे पत्रे लावण्यात आले आहे. याशिवाय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बहिष्कार घातलेल्या गावात अत्यल्प मतदानगोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित बोरगाव, निमगाव यासह त्या परिसरातील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान, याची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे आणि माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी या गावांना भेटी देऊन मतदारांशी चर्चा केली आणि त्यांना लोकशाहीत मतदान हा आपला अधिकार आहे, याची जाणीव करून दिली. त्यांच्या विनंतीला मान देत काहींनी मतदान करू असे सांगितले तर काहींनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. बोरगाव येथे १,१५५ मतदानापैकी ८० ते ९० मतदान झाले. निमगाव येथे शंभरच्या आत मतदान झाल्याचे सांगण्यात आले. 

लोकशाही धोक्यात -राकॉ, भारिपचा आरोप२,१४९ मतदार केंद्रावर घेण्यात आलेल्या बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये सकाळपासून तांत्रिक बिघाड का? झाला असा प्रश्न उपस्थित करून शासन प्रशासनावर दबाव आणून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाने केला. या मतदारसंघात ३५० ते ४०० ईव्हीएम बंद आढळून आल्या. काही मशिनमध्ये व्हीव्हीपॅटमधून चिठ्या निघत नसल्याचे सांगून बटन कोणतेही दाबा मत कमळाला जात असल्यामुळे या देशात लोकशाहीला धोका निर्माण झाला. निवडणूक आयोगही सरकारच्या दबावात आहे. त्यामुळे येणारा काळ जनतेने समजून घेतला पाहिजे. निवडणूक आयोगाने सरकारची कठपुतली म्हणून काम करू नये, असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्ञानेश्वर सुलताने, अनुप बहुले, डी.आर.रामटेके, महेश मेश्राम उपस्थित होते.