शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग अतिमहत्त्वाचा

By admin | Updated: July 1, 2017 00:26 IST

केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यातून लोकांचा विकास साध्य करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे.

राजेश काशिवार : विशेष प्रचार अभियानलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यातून लोकांचा विकास साध्य करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे. या विकास प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे मत आमदार राजेश काशिवार यांनी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) येथे आयोजित विशेष प्रचार अभियानात बोलतांना व्यक्त केले.या विशेष प्रचार अभियानात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, शिवणीच्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य मोनाली गाढवे, गटविकास अधिकारी मिलींद बडगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा साथरोग अधिकारी रवी कापगते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहूल शेंडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.आर. निर्वाण, बँक आॅफ महाराष्ट्र चे उपव्यवस्थापक रचित शुक्ला, नवचैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.राऊत तसेच क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यावेळी उपस्थित होते.भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित या विशेष प्रचार अभियानात बोलतांना आमदार काशिवार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात लोकशाहीचे महत्व प्रकट करतांना प्रत्येक व्यक्तीच्या विकासावर भर देण्यात आला असून हा विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने लोकशाही प्रक्रीयेत सहभागी होवून विकास साध्य करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी मुद्रा तसेच बँकेच्या योजनांची माहिती देतांना अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक आर.एस.खांडेकर यांनी मुद्रा बँक तसेच अटल पेन्शन योजना व इतर विमा योजना बाबत उपस्थितांना माहिती दिली. लाखनीच्या बँक आॅफ महाराष्ट्रचे उपव्यवस्थापक रचित शुक्ला यांनी भीम अ‍ॅपबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कौशल्य विकास योजनेबाबत बोलतांना शासकीय औद्यागिक संस्थेचे प्राचार्य एस.आर.निर्वाण यांनी स्किल इंडिया बाबत माहिती देवून विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या माध्यमातून कौशल्य साध्य करता येईल, असे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी या प्रचार अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. जिल्हा साथरोग अधिकारी रवी कापगते यांनी आरोग्याच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. तसेच बार्टी या संस्थेचे हृदय गोडबोले यांनी बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. प्रचार अभियानाच्या निमित्ताने शिवणी येथील नवचैतन्य विद्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एम.एम.राऊत यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली गावातून फि रुन कार्यक्रम स्थळी विसर्जित झाली. यावेळी क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. बँक आॅफ इंडिया तसेच महाराष्ट्र बँकेने सुध्दा आपल्या योजनांची माहिती देणारी प्रदर्शनी लावण्यात आली होती. आयसीडीएस मार्फत सकस आहार प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. संचालन व आभार अंबादास यादव यांनी केले. कार्यक्रमासाठी रामचंद्र सोनसळ, ग्रामसेवक जयंत गडपाल, ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला असर फाऊन्डेशन सांस्कृतिक कलापथकांनी शासकीय योजनांवर आधारीत गीत व नाटकाचे सादरीकरण केले.