शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा बचावासाठी जनआंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:56 IST

नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा प्रदूषित

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. आता वैनगंगेला दूषित होण्यापासून वाचविण्याकरिता वैनगंगा बचाव जनआंदोलन करणार असल्याचा ईशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.भंडारा जिल्हावासियांसाठी वैनगंगा नदी ही जीवनदायीनी आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वैनगंगा नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत गणल्या जात आहे. गोसेखुर्द धरणात नाग नदीचे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नाग नदीचे पाणी वैनगंगेत सोडणे थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१५ ला एका आदेशाद्वारे वैनगंगा नदीमध्ये दूषित पाणी आधी शुध्द करण्यात यावे व त्यानंतर वैनगंगेत सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. नागपूर महानगर पालिकेने नाग नदीचे दूषित पाणी शुध्द करण्याकरीता प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.केंद्र सरकारकडून एनआरसीपी अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होणार होती. मात्र प्रकल्पाला मंजुरी कधी मिळेल? व मंजुरी मिळाल्यास प्रकल्प उभारण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल? या प्रश्नांची उत्तरे शासनाने दिलेली नाही. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी चार वर्षे हा प्रश्न सुटणार नाही का? असा सवाल करून आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा ईशाराही पटोले यांनी दिला. पत्रपरिषदेत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, राजकपुर राऊत, उपस्थित होते.