शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

वैनगंगा बचावासाठी जनआंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:56 IST

नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : नाग नदीच्या दूषित पाण्यामुळे वैनगंगा प्रदूषित

आॅनलाईन लोकमतभंडारा : नागपूरच्या नाग नदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत असल्यामुळे वैनगंगेचे नदीचे पात्र प्रदूषित झाले आहे. आता वैनगंगेला दूषित होण्यापासून वाचविण्याकरिता वैनगंगा बचाव जनआंदोलन करणार असल्याचा ईशारा काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला.भंडारा जिल्हावासियांसाठी वैनगंगा नदी ही जीवनदायीनी आहे. मात्र मागील काही वर्षांपासून वैनगंगा नदी प्रदूषित नद्यांच्या यादीत गणल्या जात आहे. गोसेखुर्द धरणात नाग नदीचे दूषित पाणी सोडण्यात येत आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नाग नदीचे पाणी वैनगंगेत सोडणे थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. १९ नोव्हेंबर २०१५ ला एका आदेशाद्वारे वैनगंगा नदीमध्ये दूषित पाणी आधी शुध्द करण्यात यावे व त्यानंतर वैनगंगेत सोडण्यात यावे, असा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. हा न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला. नागपूर महानगर पालिकेने नाग नदीचे दूषित पाणी शुध्द करण्याकरीता प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शविली होती.केंद्र सरकारकडून एनआरसीपी अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात होणार होती. मात्र प्रकल्पाला मंजुरी कधी मिळेल? व मंजुरी मिळाल्यास प्रकल्प उभारण्यासाठी नेमका किती कालावधी लागेल? या प्रश्नांची उत्तरे शासनाने दिलेली नाही. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागतील असे पालकमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आणखी चार वर्षे हा प्रश्न सुटणार नाही का? असा सवाल करून आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा ईशाराही पटोले यांनी दिला. पत्रपरिषदेत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, राजकपुर राऊत, उपस्थित होते.