शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
3
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
4
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
7
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
8
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
9
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
11
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
12
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
13
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
14
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
15
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
16
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
17
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
18
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
19
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
20
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!

जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार

By admin | Updated: September 22, 2015 00:53 IST

सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून

पवनी : सव्वा वर्षाचा कालावधी लोटून गेला. परंतु जनतेचे प्रश्न अजूनही मार्गी लागले नाहीत. बेरोजगारांना रोजगार देणारे विदेशातून काळा पैसा आणणारे, गरीबी हटविणारे भाजप सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. नागनदीचा दूषित पाण्याचा प्रश्न, गोसे धरणाचा डावा कालवा, मच्छीमारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भावाचा प्रश्न, उसाचा प्रश्न तसेच ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यामध्ये भाजप सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेचे प्रश्न जर सरकारने सोडविले नाही तर त्याकरिता आंदोलन करू, रस्त्यावर येऊ, असा इशारा खासदार प्रफुल पटेल यांनी दिला. पवनी येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, विलास काटेखाये, डॉ.विजय ठक्कर, डॉ.किशोर मोटघरे आदी उपस्थित होते. खा.पटेल म्हणाले, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. आपण लोकांना सोडून जाणार नाही. गोरगरीब जनतेचा कुणीही वाली नाही. याकरिता सर्व कार्यकर्त्यांनी व जनतेनी एकत्र येऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन केले. केवळ आढावा बैठक घेऊन जनतेचे प्रश्न सुटत नाही, असाही टोला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मारला. गोसे धरणात एकही पैसा त्यांनी दिला गेला नाही. उलट या सरकारने आमच्या सरकारनेच सुरु केलेल्या योजना बंद पाडल्यात. यावर त्यांनी खेद व्यक्त केला. प्रास्ताविक डॉ.किशोर मोटघरे यांनी केले. राजेश डोंगरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपली मतभेद विसरुन पक्षाची कामे हिरहिरीने करावीत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केशव आकरे, नागो शहारे, गोपाल वैरागडे यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. खासदार पटेल यांचा विविध कार्यकारी सहसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. संचालन डॉ.अनिल धकाते यांनीतर आभार प्रदर्शन डॉ.राखडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)