शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कर्मचारी संघटनेतर्फे पेन्शन बचाव परिषद

By admin | Updated: March 20, 2015 00:43 IST

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले.

भंडारा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले. रामभाऊ येवले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सदर परिषदेला सुनिल जोशी, अशोक थूल, चंद्रहास सूटे व लिलाधर पाथोडे यांनी उपस्थितांना अंशदायी पेन्शन योजनेबाबत संबोधित केले. त्यावेळी व्यासपीठावर दोन्ही संघटनांचे पदाधिकारी वसंतराव लाखे, रविंद्र तायडे, संजय पडोळे, रमेशराव व्यवहारे, गोविंदराव चरडे, अतुल वर्मा, एस.बी. भोयर, जाधवराव साठवणे, खुषरंग नागफासे आदी उपस्थित होते.मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव लाखे यांनी पेन्शन बचाव परिषदेचे प्रास्ताविक केले. लिलाधर पाथोडे म्हणाले, शासनाच्या कर्मचारी हितविरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीन गट पडले आहे. वैधानिक पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, अंशदायी पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, शासनाच्या नव्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणारे नवीन कर्मचारी, कर्मचाऱ्यांमध्ये असलेली एकजूट व संघर्षाची भूमिका यामुळे अजूनही भारतात ती राज्यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा येथे अंशदायी पेन्शन योजना लागू होवू शकली नाही. चंद्रहास सूटे म्हणाले १९९१ पासून नवीन आर्थिक धोरण भारतात लागू झाल्यापासून १९९१ ते २००३ पर्यंत ६ देशव्यापी संप झाले. २००५ पासून अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात सतत संघर्ष करून नारा देत आहोत.यासाठी अनेकदा एक दिवसीय संपही करण्यात आले. केंद्र सरकारने अंशदायी पेन्शन योजनेचे नियमन करण्यासाठी ६ फंड मॅनेजर्स नेमले आहे. ३२ कंपन्यासमोर आल्या आहेत. आज देशात ३ लक्ष लहानमोठे उद्योग बंद झाले आहेत. असंघटीत कामगारांची संख्या दोन कोटीच्या आसपास आहे. नवीन कर्मचाऱ्यांनी संघर्ष केल्याशिवाय अंशदायी पेन्शन योजनेच्या कायद्यात बदल होवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)