शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कर्मचारी संघटनेतर्फे पेन्शन बचाव परिषद

By admin | Updated: March 20, 2015 00:43 IST

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले.

भंडारा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय येथे पेन्शन बचाव परिषदचे आयोजन करण्यात आले. रामभाऊ येवले यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सदर परिषदेला सुनिल जोशी, अशोक थूल, चंद्रहास सूटे व लिलाधर पाथोडे यांनी उपस्थितांना अंशदायी पेन्शन योजनेबाबत संबोधित केले. त्यावेळी व्यासपीठावर दोन्ही संघटनांचे पदाधिकारी वसंतराव लाखे, रविंद्र तायडे, संजय पडोळे, रमेशराव व्यवहारे, गोविंदराव चरडे, अतुल वर्मा, एस.बी. भोयर, जाधवराव साठवणे, खुषरंग नागफासे आदी उपस्थित होते.मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव लाखे यांनी पेन्शन बचाव परिषदेचे प्रास्ताविक केले. लिलाधर पाथोडे म्हणाले, शासनाच्या कर्मचारी हितविरोधी धोरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीन गट पडले आहे. वैधानिक पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, अंशदायी पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारी, शासनाच्या नव्या धोरणानुसार कंत्राटी पद्धतीवर काम करणारे नवीन कर्मचारी, कर्मचाऱ्यांमध्ये असलेली एकजूट व संघर्षाची भूमिका यामुळे अजूनही भारतात ती राज्यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा येथे अंशदायी पेन्शन योजना लागू होवू शकली नाही. चंद्रहास सूटे म्हणाले १९९१ पासून नवीन आर्थिक धोरण भारतात लागू झाल्यापासून १९९१ ते २००३ पर्यंत ६ देशव्यापी संप झाले. २००५ पासून अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात सतत संघर्ष करून नारा देत आहोत.यासाठी अनेकदा एक दिवसीय संपही करण्यात आले. केंद्र सरकारने अंशदायी पेन्शन योजनेचे नियमन करण्यासाठी ६ फंड मॅनेजर्स नेमले आहे. ३२ कंपन्यासमोर आल्या आहेत. आज देशात ३ लक्ष लहानमोठे उद्योग बंद झाले आहेत. असंघटीत कामगारांची संख्या दोन कोटीच्या आसपास आहे. नवीन कर्मचाऱ्यांनी संघर्ष केल्याशिवाय अंशदायी पेन्शन योजनेच्या कायद्यात बदल होवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)