शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

निराधार योजनेची १,१२३ प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 01:03 IST

निराधारांना राज्य शासनातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य (अनुदान) देण्यात येते.

इंद्रपाल कटकवार भंडारानिराधारांना राज्य शासनातर्फे विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य (अनुदान) देण्यात येते. वाढती महागाई व मिळणारे अनुदान सद्यस्थितीत अतिशय तोकडे आहे. विशेष म्हणजे मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला तरी जिल्ह्यातील लाभार्थी निराधारांना अनुदान मिळाले नाही. एकट्या भंडारा तालुक्यात १३८८ प्रकरणांपैकी केवळ २६५ प्रकरणे मंजूर झाले आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना व इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आदी योजनांच्या माध्यमातून निराधारांना आर्थिक मदत केली जाते. मात्र काही महिन्यांपासून निराधारांची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आवश्यक असलेली समिती नाही. समिती सदस्यांची नेमणूक न झाल्याने लाभार्थ्यांची प्रकरणेही लटकली आहे. वृद्ध, निराधारांच्या वाढत्या वयामुळे त्यांना रोज मजुरी करणे शक्य होत नाही. अनेक वृद्ध व निराधारांचे मुले त्यांचे पालन पोषण करीत नाही. त्यामुळे त्यांना शासकीय अनुदानावर अवलंबून रहावे लागते. यापैकी काही लाभार्थी निरक्षर आहेत. तहसिल कार्यालयात संबंधित विभागात योजनेच्या रकमेबाबत विचारले तर त्यांना टाळाटाळीची उत्तरे देण्यात येतात. परिणामी आयुष्याच्या संध्याकाळी जीवन कंठणारे हे वृद्ध निराशेपोटी आल्यापावली परत जातात. बँकेच्या खात्यात पैसे जमा झाले असतील अशी भाबडी आशा घेऊन आलेल्यांना रखरखत्या उन्हात परत जाण्याशिवाय मार्ग नसतो. या वृद्धांना दिले जाणारे ६०० रूपये अनुदान अत्यल्प आहे. यामुळे त्यांना जीवन जगणे असह्य झाले आहे. यात सर्वाधिक प्रकरणे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजनेचे प्रलंबित आहेत.भंडारा तालुक्यातून तहसिल कार्यालयात एकूण १३८८ प्रकरणे दाखल झाली असून त्यापैकी आतापर्यंत २६५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ही प्रकरणे मंजूर झाली असली तरी त्या लाभार्थ्यांना अजुन काही दिवस अनुदानासाठी वाट पाहावी लागणार आहे. ज्यांची प्रकरणे मंजूर झाली नाही किंवा तहसीलदारांच्या दालनात प्रलंबित आहेत ती निकाली काढण्याची मागणी निराधारांनी केली आहे.