शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

४८ तासात पोहोचणार पेंचचे पाणी

By admin | Updated: June 29, 2014 23:47 IST

भंडारा : पावसाच्या विलंबामुळे आणि सिंचन सुविधाअभावी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील धानाच्या पऱ्हे करपत आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी किसान गर्जनाने पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.

भंडारा :भंडारा : पावसाच्या विलंबामुळे आणि सिंचन सुविधाअभावी भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील धानाच्या पऱ्हे करपत आहेत. पऱ्हे वाचविण्यासाठी किसान गर्जनाने पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन पेंच प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किशोर वरंभे यांनी दिली.भंडारा जिल्ह्यात पावसाच्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी करपत आहे. हे पऱ्हे वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सोडा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा याबाबत किसान गर्जनाचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिला होता. त्यानंतर पेंच प्रकल्पाने घेतलेल्या निर्णयानंतर पाणी सोडण्यात आले. येत्या ४८ तासात हे पाणी भंडाऱ्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे. यासंदर्भात राजेंद्र पटले म्हणाले, पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किशोर वरंभे यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली असता त्यांनी पाणी सोडण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.पऱ्ह्यांसाठी संजीवनी ठरणारधानाच्या नर्सरीसाठी बावनथडी प्रकल्प, चांदपूर जलाशय आणि पेंच प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी १५ दिवसांपासून किसान गर्जना करीत आहे. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी आणि चांदपूर जलाशयाचे पाणी नहराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाल्यामुळे करपणाऱ्या पऱ्ह्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. आता भंडारा आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना पेंच प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)