शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भरणा ५.८९ कोटींचा, भरपाई शून्य

By admin | Updated: May 15, 2017 00:25 IST

खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी ....

प्रधानमंत्री पीक विमा योजना : बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणीदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपये विमा हफत्याचा भरणा केला. निसर्गाच्या प्रकोपामुळे धानपीकाचे मोठे नुकसान झाले. हंगाम लोटून सहा सात महिने लोटले तरी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २०१६-१७ करिता लागू करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान तसेच सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेस पात्र आहेत. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येते. या योजनेंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला. जोखमीच्या बाबींची व्याप्ती या योजनेंतर्गत वाढविण्यात आली. यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचा उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केली जाते. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामुळे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकातील उत्पन्नात येणारी घट व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अशी या योजनेची प्रमुख वैशिष्टै आहेत. जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत विमा हप्त्यापोटी ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपय भरले. शासनाची जोरदार जाहिरातबाजी आणि दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या अडचणीत पीक विमा काढला. खरीप हंगामात जे घडायचे होत ते घडले. पावसाने दगा दिल्याने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ज्यावेळी पावसाची पिकांना गरज होती त्यावेळी न बरसल्याने धान पीक जमीनदोस्त झाली. प्रशासनाने जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली व भोंडकी आणि साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) या गावांचा दुष्काळ सदृष्य गावांमध्ये समावेश केला. विमा न काढणारे शेतकरी हवाल दिल झाले. विमा काढला असता तर काही लाभ मिळाला असता अशा विचारात असणारे शेतकरी आता मात्र विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे दुर्दैव पाहात आहेत. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी एकही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून अद्याप एक नवा पैसाही कंपनीकडून मिळालेला नाही. २०१५-१६ मध्ये ४५४ शेतकऱ्यांना भरपाईजिल्ह्यात खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये तृणधान्य भात हे पीक राष्ट्रीय कृषी विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. एकुण १५ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रातील पिकासाठी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता. ११ हजार ६६५ शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. विमा संरक्षीत रक्कम २५ कोटी २ लाख ७० हजार एवढी होती. त्या सत्रातदेखील शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता काढूनही केवळ ४५४ शेतकऱ्यांना ४ लाख २८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती.