शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भरणा ५.८९ कोटींचा, भरपाई शून्य

By admin | Updated: May 15, 2017 00:25 IST

खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी ....

प्रधानमंत्री पीक विमा योजना : बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणीदेवानंद नंदेश्वर । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपये विमा हफत्याचा भरणा केला. निसर्गाच्या प्रकोपामुळे धानपीकाचे मोठे नुकसान झाले. हंगाम लोटून सहा सात महिने लोटले तरी पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही खरीप हंगाम सन २०१६-१७ करिता लागू करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान तसेच सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीचे अत्यंत कठिण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील, अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेस पात्र आहेत. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येते. या योजनेंतर्गत जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला. जोखमीच्या बाबींची व्याप्ती या योजनेंतर्गत वाढविण्यात आली. यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचा उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकांचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केली जाते. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामुळे हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकातील उत्पन्नात येणारी घट व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, अशी या योजनेची प्रमुख वैशिष्टै आहेत. जिल्ह्यातील ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ७५ हजार ५३१ हेक्टर क्षेत्रातील धान पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनातंर्गत विमा हप्त्यापोटी ५ कोटी ८९ लाख ५० हजार रुपय भरले. शासनाची जोरदार जाहिरातबाजी आणि दुष्काळाच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या अडचणीत पीक विमा काढला. खरीप हंगामात जे घडायचे होत ते घडले. पावसाने दगा दिल्याने धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले. ज्यावेळी पावसाची पिकांना गरज होती त्यावेळी न बरसल्याने धान पीक जमीनदोस्त झाली. प्रशासनाने जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील चुल्हरडोह, आग्री, चिचोली व भोंडकी आणि साकोली तालुक्यातील नवेगाव (रिठी) या गावांचा दुष्काळ सदृष्य गावांमध्ये समावेश केला. विमा न काढणारे शेतकरी हवाल दिल झाले. विमा काढला असता तर काही लाभ मिळाला असता अशा विचारात असणारे शेतकरी आता मात्र विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांचे दुर्दैव पाहात आहेत. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यापैकी एकही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून अद्याप एक नवा पैसाही कंपनीकडून मिळालेला नाही. २०१५-१६ मध्ये ४५४ शेतकऱ्यांना भरपाईजिल्ह्यात खरीप हंगाम २०१५-१६ मध्ये तृणधान्य भात हे पीक राष्ट्रीय कृषी विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले होते. एकुण १५ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रातील पिकासाठी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा विमा हप्ता भरला होता. ११ हजार ६६५ शेतकऱ्यांनी त्यात सहभाग घेतला होता. विमा संरक्षीत रक्कम २५ कोटी २ लाख ७० हजार एवढी होती. त्या सत्रातदेखील शेतकऱ्यांना निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागला होता. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ७५ लाख ७६ हजार रुपयांचा पीक विमा हप्ता काढूनही केवळ ४५४ शेतकऱ्यांना ४ लाख २८ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली होती.