शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची ...

यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची विक्री तालुक्यातील विविध शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर केली. धानाची विक्री करून तब्बल अडीच महिने लोटले असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप धानाचे चुकारे अदा करण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून तालुक्यात सर्वत्रच धान लागवडीला वेग आला आहे. संबंधित शेतीकाम करताना ट्रॅक्टर व मजुरांकरवी भाड्याने केले जाते. सबंधितांना मजुरी देण्याकरिता उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

उन्हाळी धान विक्री करीत असताना शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर बारदाणा उपलब्ध नसल्याने शासन निर्देशानुसार शेतकऱ्यांकडून ज्युटच्या बारदाण्यात धान खरेदी करण्यात आले. शेतकऱ्यांकडे ज्युटचा बारदाणा नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी उधार उसने पैसे घेऊन ज्युटचा बारदाणा विकत घेऊन धानाची विक्री केली. मात्र, तब्बल अडीच महिने लोटून देखील धानाचे चुकारे न मिळाल्याने बारदाण्याचे पैसे कुठून द्यावे हा देखील मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

यासह गतवर्षीच्या खरिपातील धानाला शासनाने ७०० रुपये प्रति क्विंटल बोनस जाहीर केले. मात्र, त्यापैकी केवळ अर्धे बोनस दिले आहेत व उर्वरित अर्धे बोनस शिल्लक आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी शासनाने देण्याचे आश्वासित केले होते. सध्या घडीला तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून त्यांना तत्काळ रब्बी धानाचे चुकारे तत्काळ अदा करा व सोबतच अन्य मागण्या पूर्ण करा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देतेवेळी जि. प.चे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, गोपाल झोडे, पतीराम झोडे, नीकेश लंजे, हरिदास घाटे, सुकरण लंजे, धनराजहटवार, आदेश शेंडे, गिरीधर नागेश्वर, अरविंद राऊत, ताराचंद मातेरे, जगदीश बगमारे, पंडित गायकवाड, रामदास सावरकर यांसह अन्य धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते.