शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षणासाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

मुखरू बागडे पालांदूर : पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा ४१५ पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाकरिता अजूनही ...

मुखरू बागडे

पालांदूर : पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा ४१५ पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाकरिता अजूनही आमंत्रित केलेले नाही. प्रशासकीय अडचणीचे कारण पुढे करीत वेळ मारून नेली जात आहे. आधीच बेरोजगारीने खितपत पडलेल्या तरुणाईला १३ महिन्यांचा कालावधी संकटात खेचणारा आहे. प्रशिक्षणासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत असून प्रशिक्षणार्थी प्रतीक्षेत आहेत.

बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. स्पर्धेच्या युगात परीक्षा पास होणे खूप कठीण आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामीण भागातील युवकांनी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा २०१८ मध्येच पार पडली असून त्यांचा निकाल १७ मार्च २०२० रोजी जाहीर झाला. यात उमेदवारांचे साडेतीन वर्षे खर्च झाली. निकाल लागल्यानंतर प्रशिक्षणाकरिता केवळ तीन महिन्यात आमंत्रित करणे अपेक्षित होते. कोरोनाची उद्भवलेले संकट स्थिती व महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये सुरू असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण यामुळे आमच्या प्रशिक्षणाला अक्षम्य विलंब होत असल्याची टीका भावी पोलीस उपनिरीक्षक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.

२६ एप्रिल २०२१ ला प्रशिक्षण होण्याचे पत्र पाठवले. मात्र पुन्हा शासनाने १६ एप्रिलला एक परिपत्रक काढून प्रशिक्षण २३ जून २०२१ होणार असल्याचे कळविले आहे. वारंवार तारखा बदलल्याने तारखांवर आता विश्वास उडत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात शासनाला कोरोना योद्ध्यांची गरज असताना आमच्यासारख्या नवजवान तरुणांना काम करण्याची मनोमन इच्छा असतानासुद्धा वाव मिळत नाही. तर दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात कोणतीही पूर्व परीक्षा न घेता तरुणांना पोलीस भरतीसाठी आमंत्रित करण्याचे ऐकिवात आहे. यावरून शासनाच्या दुटप्पी धोरणाचा अनुभव विद्यार्थी वर्गांना येत आहे. मुके व बहिरे शासन-प्रशासन भावी पोलीस उपनिरीक्षकांना योग्य वेळी कोरोनाच्या संकटात देशसेवा करण्याची संधी देतील का, हा प्रश्न लोकमतच्या माध्यमातून शासनाला विचारलेला आहे.

कोट बॉक्स

तृप्ती पांडुरंग खंडाईत (पालांदूर), भोजराम श्यामराव लांजेवार (मऱ्हेगाव पोस्ट पालांदूर), दीप्ती जयकांत मरकाम (मुरमाडी /लाखनी), अपूर्वा ताराचंद बोरकर (साकोली) असे चार पोलीस उपनिरीक्षक भंडारा जिल्ह्यातून पास झाले. मात्र १३ महिन्यानंतरही त्यांना सेवेत संधी मिळालेली नाही.

केंद्र शासनाच्या सर्व प्रशिक्षण संस्था सुरू आहेत. त्याअंतर्गत आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवावे. आम्हाला मिळालेला बॅच नंबर तोच राहील की बदलेल याची चिंता सतावत आहे. आमचे प्रशिक्षण वेळेवर करून आम्हाला न्याय द्यावा. कठीण मेहनतीनंतर परीक्षा पास होऊनही देशसेवा करण्याची संधी मिळत नाही. चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे. लवकरात लवकर सेवेत दाखल करावे, हीच आमची विनंती आहे.

भोजराम लांजेवार, मऱ्हेगाव