शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

पोलीस प्रशिक्षणासाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

मुखरू बागडे पालांदूर : पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा ४१५ पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाकरिता अजूनही ...

मुखरू बागडे

पालांदूर : पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा ४१५ पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणाकरिता अजूनही आमंत्रित केलेले नाही. प्रशासकीय अडचणीचे कारण पुढे करीत वेळ मारून नेली जात आहे. आधीच बेरोजगारीने खितपत पडलेल्या तरुणाईला १३ महिन्यांचा कालावधी संकटात खेचणारा आहे. प्रशिक्षणासाठी ‘तारीख पे तारीख’ मिळत असून प्रशिक्षणार्थी प्रतीक्षेत आहेत.

बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. स्पर्धेच्या युगात परीक्षा पास होणे खूप कठीण आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ग्रामीण भागातील युवकांनी पोलीस उपनिरीक्षकाची परीक्षा पास केली. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा २०१८ मध्येच पार पडली असून त्यांचा निकाल १७ मार्च २०२० रोजी जाहीर झाला. यात उमेदवारांचे साडेतीन वर्षे खर्च झाली. निकाल लागल्यानंतर प्रशिक्षणाकरिता केवळ तीन महिन्यात आमंत्रित करणे अपेक्षित होते. कोरोनाची उद्भवलेले संकट स्थिती व महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये सुरू असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण यामुळे आमच्या प्रशिक्षणाला अक्षम्य विलंब होत असल्याची टीका भावी पोलीस उपनिरीक्षक यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.

२६ एप्रिल २०२१ ला प्रशिक्षण होण्याचे पत्र पाठवले. मात्र पुन्हा शासनाने १६ एप्रिलला एक परिपत्रक काढून प्रशिक्षण २३ जून २०२१ होणार असल्याचे कळविले आहे. वारंवार तारखा बदलल्याने तारखांवर आता विश्वास उडत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात शासनाला कोरोना योद्ध्यांची गरज असताना आमच्यासारख्या नवजवान तरुणांना काम करण्याची मनोमन इच्छा असतानासुद्धा वाव मिळत नाही. तर दुसरीकडे मुंबईसारख्या शहरात कोणतीही पूर्व परीक्षा न घेता तरुणांना पोलीस भरतीसाठी आमंत्रित करण्याचे ऐकिवात आहे. यावरून शासनाच्या दुटप्पी धोरणाचा अनुभव विद्यार्थी वर्गांना येत आहे. मुके व बहिरे शासन-प्रशासन भावी पोलीस उपनिरीक्षकांना योग्य वेळी कोरोनाच्या संकटात देशसेवा करण्याची संधी देतील का, हा प्रश्न लोकमतच्या माध्यमातून शासनाला विचारलेला आहे.

कोट बॉक्स

तृप्ती पांडुरंग खंडाईत (पालांदूर), भोजराम श्यामराव लांजेवार (मऱ्हेगाव पोस्ट पालांदूर), दीप्ती जयकांत मरकाम (मुरमाडी /लाखनी), अपूर्वा ताराचंद बोरकर (साकोली) असे चार पोलीस उपनिरीक्षक भंडारा जिल्ह्यातून पास झाले. मात्र १३ महिन्यानंतरही त्यांना सेवेत संधी मिळालेली नाही.

केंद्र शासनाच्या सर्व प्रशिक्षण संस्था सुरू आहेत. त्याअंतर्गत आम्हाला प्रशिक्षणार्थी म्हणून पाठवावे. आम्हाला मिळालेला बॅच नंबर तोच राहील की बदलेल याची चिंता सतावत आहे. आमचे प्रशिक्षण वेळेवर करून आम्हाला न्याय द्यावा. कठीण मेहनतीनंतर परीक्षा पास होऊनही देशसेवा करण्याची संधी मिळत नाही. चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे. लवकरात लवकर सेवेत दाखल करावे, हीच आमची विनंती आहे.

भोजराम लांजेवार, मऱ्हेगाव