शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

प्रौढ शिक्षण प्रेरकांना थकीत मानधन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:36 IST

१०लोक ०९ के साकोली : महाराष्ट्र राज्य साक्षर भारत अभियान अंतर्गत कामावर असलेले प्रेरक-प्रेरिका (प्रौढ शिक्षक) यांचा २२ महिन्यांपासून ...

१०लोक ०९ के

साकोली : महाराष्ट्र राज्य साक्षर भारत अभियान अंतर्गत कामावर असलेले प्रेरक-प्रेरिका (प्रौढ शिक्षक) यांचा २२ महिन्यांपासून थकीत असलेले मानधन त्वरित देऊन त्यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशा मागणीचे निवेदन संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाला नुकतेच देण्यात आले. यावर निर्णय न लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

महाराष्ट्रात साक्षर भारत योजना अंतर्गत गोंदिया, गडचिरोली, नंदूरबार, बीड,जालना, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील ९३ तालुक्यातील ७,३१८ ग्रामपंचायत अंतर्गत १४ हजार ६३० प्रेरक-प्रेरिका कार्यरत आहेत. या प्रौढ शिक्षकांची नियुक्ती मानधन तत्त्वावर जानेवारी २०१२मध्ये करण्यात आली. या प्रौढ शिक्षकांनी नियुक्तीनंतर गावागावांत निरक्षरांना शिकविण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. साक्षर भारत अभियान जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१८पर्यंतच ठेवण्यात आले. अभियान २०१८ पासून शासनाने बंद केल्याने आज या प्रेरक-प्रेरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एवढेच नाही तर त्यांचे २२ महिन्यांचे मानधन सुद्धा अद्याप देण्यात आले नाही.

गोंदिया जिल्ह्यात १४२८ प्रेरक कार्यरत असून, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १४४ प्रेरक कार्यरत आहेत. या प्रेरक-प्रेरिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच एक सभा घेऊन शासन व प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रेरक-प्रेरिकांना ‘पढना-लिखना’ अभियानात समाविष्ट करण्यात यावे, २२ महिन्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत समाविष्ट करावे, दरमहा मानधन द्यावे, प्रेरकाना अंशकालीन करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान काम, समान वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. यावर विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. मागण्यांचे निवेदन देतेवेळी प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सुजाता वंजारी, उपाध्यक्ष प्रतीक राऊत, सचिव हेमराज जांभुळकर, कार्यवाह मनोज रामटेके, सदस्य कविता कामळे, नांदेश्वर, राऊत, राणी, राजेश राखडे, लांजे, चिमनकर उपस्थित होते.