शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस ...

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस तत्काळ अदा करून तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटनेने केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरी बांधवांना बँका व सावकारी कर्ज काढून शेतीची मशागत आणि पीक लागवड करावी लागते. शेतात भात पिकाची लागवड झाल्यानंतर भात पिकाला एखाद्या लहानशा पोराप्रमाणे जपावे लागते. परंतु, कधी वातावरणीय बदलामुळे, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत असतात, तर कधी वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भात पिकावर विपरीत परिणाम होत असल्याने पीक उत्पादनात बरीच घट येत असते. परंतु शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहित कालावधीत करावी लागत असल्याने लवकर मळणी करून नोव्हेंबर महिन्यापासून शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर भात पिकाची विक्री करावी लागते.

त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर शेतकरी बांधवांना भात पिकाच्या विक्रीचे नगदी चुकारे अदा करणे ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर देखील बऱ्याच शेतकरी बांधवांना भात पिकाचे चुकारे व बोनस अदा करण्यात आले नसल्याची दस्तुरखुद्द शेतकरी बांधवांची मोठी ओरड असून, संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात गुरफटून पडावे लागत आहे.

खरीप हंगामाची वेळ आली तरी भात पिकाचे चुकारे व बोनस अदा न करण्याचे कारण काय, चुकारे अदा न केल्यामुळे शेतकरी बांधवांना उसनवारी करून कर्जाची परतफेड करावी लागली आहे.

शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटना जिल्हा भंडाराचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस. के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, जयपाल रामटेके, नंदू वाघमारे आदींनी केली आहे.