शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस ...

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस तत्काळ अदा करून तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटनेने केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरी बांधवांना बँका व सावकारी कर्ज काढून शेतीची मशागत आणि पीक लागवड करावी लागते. शेतात भात पिकाची लागवड झाल्यानंतर भात पिकाला एखाद्या लहानशा पोराप्रमाणे जपावे लागते. परंतु, कधी वातावरणीय बदलामुळे, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत असतात, तर कधी वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भात पिकावर विपरीत परिणाम होत असल्याने पीक उत्पादनात बरीच घट येत असते. परंतु शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहित कालावधीत करावी लागत असल्याने लवकर मळणी करून नोव्हेंबर महिन्यापासून शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर भात पिकाची विक्री करावी लागते.

त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर शेतकरी बांधवांना भात पिकाच्या विक्रीचे नगदी चुकारे अदा करणे ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर देखील बऱ्याच शेतकरी बांधवांना भात पिकाचे चुकारे व बोनस अदा करण्यात आले नसल्याची दस्तुरखुद्द शेतकरी बांधवांची मोठी ओरड असून, संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात गुरफटून पडावे लागत आहे.

खरीप हंगामाची वेळ आली तरी भात पिकाचे चुकारे व बोनस अदा न करण्याचे कारण काय, चुकारे अदा न केल्यामुळे शेतकरी बांधवांना उसनवारी करून कर्जाची परतफेड करावी लागली आहे.

शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीम शक्ती संघटना जिल्हा भंडाराचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस. के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभुणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, जयपाल रामटेके, नंदू वाघमारे आदींनी केली आहे.