शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
3
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
4
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
5
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
6
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
7
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
8
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
9
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
10
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
11
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
12
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
13
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
14
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
15
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
16
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
17
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
18
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
19
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
20
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस ...

भंडारा : जिल्हा पणन विभागाने वेळीच दखल घेवून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवांचे धानाचे थकीत चुकारे तसेच बोनस तात्काळ अदा करून तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीमशक्ती संघटनेने केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरीबांधवांना बँका व सावकारी कर्ज काढून शेतीची मशागत आणि पीक लागवड करावी लागते. शेतात भातपिकाची लागवड झाल्यानंतर भात पिकाला लहान मुलाप्रमाणे जपावे लागते. परंतु, कधी वातावरणीय बदलामुळे, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट कोसळत असतात. तर कधी वनस्पतीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने भात पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याने पीक उत्पादनात बरीच घट येत असते. परंतु, शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहित कालावधीत करावी लागत असल्याने लवकर मळणी करून नोव्हेंबर महिन्यांपासून शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर भात पिकाची विक्री करावी लागते.

त्यामुळे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्यानंतर शेतकरीबांधवांना भात पिकाच्या विक्रीचे नगदी चुकारे अदा करणे, ही संबंधित विभागाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु, पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही बऱ्याच शेतकरीबांधवांना भात पिकाचे चुकारे व बोनस अदा करण्यात आले नसल्याची दस्तुरखुद्द शेतकऱ्यांतून मोठी ओरड होत असून संबंधित विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्युहात गुरफटून पडावे लागत आहे.

खरीप हंगामाची वेळ आली तरी भात पिकाचे चुकारे व बोनस अदा न करण्याचे कारण काय, चुकारे अदा न केल्यामुळे शेतकरी बांधवांना उधार उसनवारी करून कर्जाची परतफेड करावी लागत आहे.

शेतकरी बांधवांना तूर्त दिलासा देण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी भीमशक्ती संघटना जिल्हा भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, बाळकृष्ण शेंडे, एस. के. वैद्य, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, जयपाल रामटेके, नंदू वाघमारे आदींनी केली आहे.