शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची मागणी : साकोली नगरपरिषदेअंतर्गत ४७७ लाभार्थ्यांंना घरकूल मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तीन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अनेक घरकुलाचे काम अर्धवट अवस्थेत अडकून पडले आहे. परिणामी लाभार्थींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली. पण दुर्देवाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने पैसे अडकल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात येत असल्याचे समजते.नियमाप्रमाणे, पहिला हप्ता ४० हजार, दुसरा हप्ता ४० हजार, तिसरा हप्ता २० हजार व चवथा हप्ता फिनीशींगसाठी एक लाख व शेवटचा हप्ता पन्नास हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. साकोली नगरपरिषदेअंतर्गत या योजनेत ४७७ लाभार्थीना घरकूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार या योजनेचे पैसे म्हाडामार्फत नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज संस्थाना पाठविले.यापैकी बºयाच घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी चौथ्या हप्त्याच्या रकमेची मागणी केली. इतरानाही झालेल्या कामाच्याप्रमाणात समाधानकारक रक्कम मिळाली नाही. आता लॉकडाऊनमुळे योजनेचे पैसे स्थानिक स्वराज संस्थेपर्यंत न पोहचल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही.३२३ चौरस फुट जागेत बांधकाम झाले पाहिजे. ज्यांच्याकडे दुसरी जागा नाही त्यांनी आपले जुने मोडकडीस आलेले घर पाडून घरकुलांसाठी जागा खाली केली व पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण होईल, या आशेने उघड्यावर आपला संसार थाटला. तर काहीनी पावसाळ्यापूर्वी घर खाली करुन देण्याच्या अटीवर परिचित, मित्र किंवा नातेवाईकाच्या रिकामे घर तात्पुरते भाड्याने घेऊन संसार उभा केला. पावसाळा पाहून घरमालकानी लाभार्थ्यांकडे घर रिकामे करण्याचा तगादा लावला. तर ज्यांनी उघड्यावर हिवाळा, उन्हाळा काढला आता घरकूल पूर्ण न झाल्याने त्यांनी आश्रय कुठे घ्यावा, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना