शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची मागणी : साकोली नगरपरिषदेअंतर्गत ४७७ लाभार्थ्यांंना घरकूल मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तीन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अनेक घरकुलाचे काम अर्धवट अवस्थेत अडकून पडले आहे. परिणामी लाभार्थींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली. पण दुर्देवाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने पैसे अडकल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात येत असल्याचे समजते.नियमाप्रमाणे, पहिला हप्ता ४० हजार, दुसरा हप्ता ४० हजार, तिसरा हप्ता २० हजार व चवथा हप्ता फिनीशींगसाठी एक लाख व शेवटचा हप्ता पन्नास हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. साकोली नगरपरिषदेअंतर्गत या योजनेत ४७७ लाभार्थीना घरकूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार या योजनेचे पैसे म्हाडामार्फत नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज संस्थाना पाठविले.यापैकी बºयाच घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी चौथ्या हप्त्याच्या रकमेची मागणी केली. इतरानाही झालेल्या कामाच्याप्रमाणात समाधानकारक रक्कम मिळाली नाही. आता लॉकडाऊनमुळे योजनेचे पैसे स्थानिक स्वराज संस्थेपर्यंत न पोहचल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही.३२३ चौरस फुट जागेत बांधकाम झाले पाहिजे. ज्यांच्याकडे दुसरी जागा नाही त्यांनी आपले जुने मोडकडीस आलेले घर पाडून घरकुलांसाठी जागा खाली केली व पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण होईल, या आशेने उघड्यावर आपला संसार थाटला. तर काहीनी पावसाळ्यापूर्वी घर खाली करुन देण्याच्या अटीवर परिचित, मित्र किंवा नातेवाईकाच्या रिकामे घर तात्पुरते भाड्याने घेऊन संसार उभा केला. पावसाळा पाहून घरमालकानी लाभार्थ्यांकडे घर रिकामे करण्याचा तगादा लावला. तर ज्यांनी उघड्यावर हिवाळा, उन्हाळा काढला आता घरकूल पूर्ण न झाल्याने त्यांनी आश्रय कुठे घ्यावा, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना