शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री घरकूल योजनेची रक्कम तातडीने द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:01 IST

नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली.

ठळक मुद्देलाभार्थ्यांची मागणी : साकोली नगरपरिषदेअंतर्गत ४७७ लाभार्थ्यांंना घरकूल मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तीन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या घरकुलाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे अनेक घरकुलाचे काम अर्धवट अवस्थेत अडकून पडले आहे. परिणामी लाभार्थींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अडीच लक्ष रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असलेले घरकूल मंजूर करण्यात आले. झालेल्या कामाच्या प्रमाणात लाभार्थ्यांना ४० हजार ते एक लाख रुपयापर्यंत पैसे देण्यात आले. पैसे मिळताच अनेकांनी कामाचा पुढचा टप्पा सुरु केला. पावसाळ्याच्या घाईने जेवढे काम शक्य झाले ते झपाट्याने उरकले व झालेल्या कामाचे पैसे मिळावे म्हणून नगर परिषदेकडे मागणी केली. पण दुर्देवाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरु झाल्याने पैसे अडकल्याचे लाभार्थ्यांना सांगण्यात येत असल्याचे समजते.नियमाप्रमाणे, पहिला हप्ता ४० हजार, दुसरा हप्ता ४० हजार, तिसरा हप्ता २० हजार व चवथा हप्ता फिनीशींगसाठी एक लाख व शेवटचा हप्ता पन्नास हजार रुपये काम पूर्ण झाल्यावर दिले जातात. साकोली नगरपरिषदेअंतर्गत या योजनेत ४७७ लाभार्थीना घरकूल मंजूर करण्यात आले. केंद्र सरकार या योजनेचे पैसे म्हाडामार्फत नगरपरिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज संस्थाना पाठविले.यापैकी बºयाच घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहेत. त्यांनी चौथ्या हप्त्याच्या रकमेची मागणी केली. इतरानाही झालेल्या कामाच्याप्रमाणात समाधानकारक रक्कम मिळाली नाही. आता लॉकडाऊनमुळे योजनेचे पैसे स्थानिक स्वराज संस्थेपर्यंत न पोहचल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही.३२३ चौरस फुट जागेत बांधकाम झाले पाहिजे. ज्यांच्याकडे दुसरी जागा नाही त्यांनी आपले जुने मोडकडीस आलेले घर पाडून घरकुलांसाठी जागा खाली केली व पावसाळ्यापूर्वी घर पूर्ण होईल, या आशेने उघड्यावर आपला संसार थाटला. तर काहीनी पावसाळ्यापूर्वी घर खाली करुन देण्याच्या अटीवर परिचित, मित्र किंवा नातेवाईकाच्या रिकामे घर तात्पुरते भाड्याने घेऊन संसार उभा केला. पावसाळा पाहून घरमालकानी लाभार्थ्यांकडे घर रिकामे करण्याचा तगादा लावला. तर ज्यांनी उघड्यावर हिवाळा, उन्हाळा काढला आता घरकूल पूर्ण न झाल्याने त्यांनी आश्रय कुठे घ्यावा, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना