शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

विस्तारीकरणात पवनी-भंडारा राज्यमार्ग उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:51 IST

विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.

ठळक मुद्देसावली हिरावली : गुलमोहराच्या सौंदर्याला लागली दृष्ट, उन्हाळ्यात होणार प्रवाशांना मोठा त्रास

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.भंडारा-पवनी हा राज्यमार्ग ४० किमीचा असून या रस्त्याच्या विस्तारीकरणाला प्रारंभ झाला आहे. विस्तारीकरणात सर्वात पहिली कुऱ्हाड पडली ती गर्द सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांवर या मार्गावर जागोजागी आंबा, चिंच, कवट, कडूनिंब, गुलमोहर अशी वृक्ष होती. निसर्गाचा हा अनमोल खजाना गेल्या कित्येक वर्षापासून वाटसरूंना सावली देत होता.ब्रिटीशांच्या काळात दूरदृष्टीने लावलेली ही वनराई सौंदर्यात भर घालणारी होती. परंतु आता या वृक्षांवरच कुºहाड चालली. ऐन उन्हाळ्यात हा रस्ता उजाड झाला आहे. कधीकाळी गर्द सावली देणाºया या रस्त्यावर आता सावलीसाठी वृक्ष शोधण्याची वेळ आली आहे.२०१८ मध्ये कारधा टोलनाका ते निलज फाटा या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे शेकडो जुने डेकेदार वृक्ष तोडण्यात आले. मुळासकट हे वृक्ष उखडून काढण्यात आले. शेकडो वर्षांपासून सावली देणारे हे वृक्ष आहा दिसेनासे झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केशरी रंगाने फुलणारे गुलमोहरही आता दिसेनासे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करतांना प्रवाशांना या मार्गावरुन सावलीचा आधार होता. परंतु आता विस्तारीकरणाने वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे आता सावली मिळणे कठीण झाले आहे. या विस्तारीकरणाचा मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करावे अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.वृक्षारोपणाकडे दुर्लक्षरस्त्याच्या विस्तारीकरणात दुतर्फा असलेली झाडे क्षणात तोडली जातात. मात्र त्यानंतर या रस्त्यावर वृक्षारोपण होत नाही. वृक्षारोपण झाले तरी त्याची योग्य देखभाल होत नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा असाच अनुभव आहे. त्यामुळे भंडारा-पवनी या राज्य मार्गावरही आता वाटसरूंना भविष्यात सावली मिळणार नाही.