शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

विस्तारीकरणात पवनी-भंडारा राज्यमार्ग उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:51 IST

विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.

ठळक मुद्देसावली हिरावली : गुलमोहराच्या सौंदर्याला लागली दृष्ट, उन्हाळ्यात होणार प्रवाशांना मोठा त्रास

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.भंडारा-पवनी हा राज्यमार्ग ४० किमीचा असून या रस्त्याच्या विस्तारीकरणाला प्रारंभ झाला आहे. विस्तारीकरणात सर्वात पहिली कुऱ्हाड पडली ती गर्द सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांवर या मार्गावर जागोजागी आंबा, चिंच, कवट, कडूनिंब, गुलमोहर अशी वृक्ष होती. निसर्गाचा हा अनमोल खजाना गेल्या कित्येक वर्षापासून वाटसरूंना सावली देत होता.ब्रिटीशांच्या काळात दूरदृष्टीने लावलेली ही वनराई सौंदर्यात भर घालणारी होती. परंतु आता या वृक्षांवरच कुºहाड चालली. ऐन उन्हाळ्यात हा रस्ता उजाड झाला आहे. कधीकाळी गर्द सावली देणाºया या रस्त्यावर आता सावलीसाठी वृक्ष शोधण्याची वेळ आली आहे.२०१८ मध्ये कारधा टोलनाका ते निलज फाटा या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे शेकडो जुने डेकेदार वृक्ष तोडण्यात आले. मुळासकट हे वृक्ष उखडून काढण्यात आले. शेकडो वर्षांपासून सावली देणारे हे वृक्ष आहा दिसेनासे झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केशरी रंगाने फुलणारे गुलमोहरही आता दिसेनासे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करतांना प्रवाशांना या मार्गावरुन सावलीचा आधार होता. परंतु आता विस्तारीकरणाने वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे आता सावली मिळणे कठीण झाले आहे. या विस्तारीकरणाचा मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करावे अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.वृक्षारोपणाकडे दुर्लक्षरस्त्याच्या विस्तारीकरणात दुतर्फा असलेली झाडे क्षणात तोडली जातात. मात्र त्यानंतर या रस्त्यावर वृक्षारोपण होत नाही. वृक्षारोपण झाले तरी त्याची योग्य देखभाल होत नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा असाच अनुभव आहे. त्यामुळे भंडारा-पवनी या राज्य मार्गावरही आता वाटसरूंना भविष्यात सावली मिळणार नाही.