शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

विस्तारीकरणात पवनी-भंडारा राज्यमार्ग उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 22:51 IST

विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.

ठळक मुद्देसावली हिरावली : गुलमोहराच्या सौंदर्याला लागली दृष्ट, उन्हाळ्यात होणार प्रवाशांना मोठा त्रास

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : विकास हवा असेल तर तडजोड करावीच लागते. मात्र विकासाच्या नावाखाली वनराईवर कुऱ्हाड चालविणे कितपत योग्य आहे. आता हेच बघा ना भंडारा-पवनी मार्गाच्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालली. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात फुलणाऱ्या गुलमोहरालाही विकासाने दृष्ट लावली.भंडारा-पवनी हा राज्यमार्ग ४० किमीचा असून या रस्त्याच्या विस्तारीकरणाला प्रारंभ झाला आहे. विस्तारीकरणात सर्वात पहिली कुऱ्हाड पडली ती गर्द सावली देणाऱ्या विविध प्रजातीच्या वृक्षांवर या मार्गावर जागोजागी आंबा, चिंच, कवट, कडूनिंब, गुलमोहर अशी वृक्ष होती. निसर्गाचा हा अनमोल खजाना गेल्या कित्येक वर्षापासून वाटसरूंना सावली देत होता.ब्रिटीशांच्या काळात दूरदृष्टीने लावलेली ही वनराई सौंदर्यात भर घालणारी होती. परंतु आता या वृक्षांवरच कुºहाड चालली. ऐन उन्हाळ्यात हा रस्ता उजाड झाला आहे. कधीकाळी गर्द सावली देणाºया या रस्त्यावर आता सावलीसाठी वृक्ष शोधण्याची वेळ आली आहे.२०१८ मध्ये कारधा टोलनाका ते निलज फाटा या रस्त्यावरील दोन्ही बाजूचे शेकडो जुने डेकेदार वृक्ष तोडण्यात आले. मुळासकट हे वृक्ष उखडून काढण्यात आले. शेकडो वर्षांपासून सावली देणारे हे वृक्ष आहा दिसेनासे झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केशरी रंगाने फुलणारे गुलमोहरही आता दिसेनासे झाले आहे.उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करतांना प्रवाशांना या मार्गावरुन सावलीचा आधार होता. परंतु आता विस्तारीकरणाने वृक्ष तोडण्यात आले. त्यामुळे आता सावली मिळणे कठीण झाले आहे. या विस्तारीकरणाचा मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करावे अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.वृक्षारोपणाकडे दुर्लक्षरस्त्याच्या विस्तारीकरणात दुतर्फा असलेली झाडे क्षणात तोडली जातात. मात्र त्यानंतर या रस्त्यावर वृक्षारोपण होत नाही. वृक्षारोपण झाले तरी त्याची योग्य देखभाल होत नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा असाच अनुभव आहे. त्यामुळे भंडारा-पवनी या राज्य मार्गावरही आता वाटसरूंना भविष्यात सावली मिळणार नाही.