शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.67 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत येऊ लागली. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले.

ठळक मुद्देपाॅझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के : शनिवारी ९० कोरोनामुक्त, १७ पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६७ टक्के तर पाॅझिटिव्हिटी रेट १.७५ टक्के होता. प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र, अनलाॅक प्रक्रियेने सूट मिळाल्याने नागरिकांची बाजारात होणारी गर्दी धोकादायक ठरू शकते.कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ६० टक्क्यांपर्यंत खाली आले होते. दररोज मृत्यूचा आकडाही वाढत होता. या सर्व प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. मात्र, जून महिना जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरला. जून महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या आत येऊ लागली. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले. दररोज ७० ते ८० व्यक्ती कोरोनामुक्त होत आहेत. शनिवारी जिल्ह्यात ९७० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा २, तुमसर ३, पवनी १, लाखनी ६, साकोली २ आणि लाखांदूर तालुक्यात ३ असे १७ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार २३७ व्यक्ती पाॅझिटिव्ह झाले होते. त्यापैकी ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. गत दहा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नाही. जिल्ह्यात आता कोरोना बळींची संख्या १०५८ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ८९० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात भंडारा तालुका २४ हजार १२७, मोहाडी ४२३६, तुमसर ६९७४, पवनी ५८८५, लाखनी ६४१२, साकोली ७४०५ आणि लाखांदूर तालुक्यात २८५१ व्यक्तींचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता वेगाने घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गत आठवड्यात अनलाॅक प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील बाजारपेठ सुरु झाली आहे. सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु असते. परंतु बाजारपेठेतील गर्दी बघितल्यानंतर कोरोना संपला की काय अशी शंका येते. कोरोना संसर्गाचे नियम पायदळी तुडवत प्रत्येक दुकानात मोठी गर्दी होत आहे. नगरपरिषदेचे पथक सूचना देऊनही कुणी ऐकत नाही.

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२८ - जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली होती. गावागावात रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. गत आठवड्यात हजाराच्या आसपास असलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ३२८ वर आली आहे. भंडारा तालुक्यात ६४, मोहाडी २०, तुमसर २३, पवनी २०, लाखनी २८, साकोली १५०, लाखांदूर २३ असे ३२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.

कोरोनाने बळी नाही- एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडव अनुभवलेल्या जिल्ह्यात जून महिन्यात मोठा दिलासा मिळत आहे. गत १२ दिवसात केवळ एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. गत आठवडाभरात तर एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०५५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर १.७८ टक्के आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या