शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:36 IST

प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

ठळक मुद्देजबाबदारी ढकलण्याची कवायत : नागरिकांचीही अनास्था, पुढाकार कुणी घेईना, अड्याळ येथील प्रकार

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.दुकाने, बँक, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवासी निवारा, मुख्य व्यापारी लाईन किंवा विविध महत्वाच्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसीन येते. अड्याळ येथेही अशीच स्थिती आहे. दुचाकीसह चारचाकी वाहन धारकाला नेहमी एकच प्रश्न पडतो तो म्हणजे वाहन ठेवायचे तरी कुठे? मग मिळेल त्या ठिकाणी वाहन उभे ठेवले जाते? परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होतो. यात ग्रामस्थांना, पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना याचा रोजच त्रास सहन करावा लागतो. याची कल्पना सुद्धा संबंधित प्रशासन तसेच विभागाला आहे का, असा सवाल मात्र आज ग्रामस्थ ठिकठिकाणी करताना दिसत आहे.अड्याळ गावात पोलीस ठाणे आहे तसेच तालुक्यातील सर्वात मोठी व उप तालुक्याचा नावाचा दर्जा प्राप्त असलेली १९ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यालय आहे. या इमारतीला लागूनच प्रवासी निवारा परिसर आहे. यामध्ये नेहमीकरिता एक वाहतूक नियंत्रक राहिल म्हणून मागील काळात ठरले होते, परंतु शोकांतिका अशी की काही दिवस सुरळीत चालले, त्यात सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आली व त्यानंतर मात्र याविषयी कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान देणे टाळले. आमि समस्या वाढतच गेली.गुजरी चौकामधील बँकमध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने खातेधारक येतात. यात त्यांना गर्दीचा तसेच शौचालय व वाहन पार्किंगच्या समस्येचा सामना गेली अनेक वर्षापासून होत असतानाही मात्र याकडे लोकप्रतिनिधी नेहमीच दुर्लक्ष करतात.गावातील प्रवासी निवारा परिसरातील अनधिकृत पार्किंग होण्यामागे जबाबदार कोण, असा प्रश्न मात्र आज ग्रामस्थांना पडला आहे. एखादी अती महत्वाच्या, तात्काळ सेवेचा लाभ मिळणेकरिता गावातील मुख्य मार्गावरून जायचे झाल्यास अनेक ग्रामस्थांना त्याचा भयंकर त्रास होतो तशीच काहीशी स्थिती बसप्रवासी निवारा परिसरातील नेहमीच पाहायला मिळते. येथील दुकानदारांच्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयातही तीच स्थिती आहे.वाहनधारक तसेच चालकांनी वाहन ‘पार्क’ तरी कुठे करायचे. यावर ग्रामपंचायत की पोलीस प्रशासन एकमेंकावर जबाबदारीचे खापर फोडीत असतात. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आहे. सरपंच जयश्री कुंभलकर यांच्या मते यासाठी येथील व्यवसायीकांनी व वाहतूक नियंत्रक, पोलीस कर्मचारी यांनी गावहितासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.