शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:36 IST

प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.

ठळक मुद्देजबाबदारी ढकलण्याची कवायत : नागरिकांचीही अनास्था, पुढाकार कुणी घेईना, अड्याळ येथील प्रकार

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे.दुकाने, बँक, ग्रामपंचायत कार्यालय, प्रवासी निवारा, मुख्य व्यापारी लाईन किंवा विविध महत्वाच्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसीन येते. अड्याळ येथेही अशीच स्थिती आहे. दुचाकीसह चारचाकी वाहन धारकाला नेहमी एकच प्रश्न पडतो तो म्हणजे वाहन ठेवायचे तरी कुठे? मग मिळेल त्या ठिकाणी वाहन उभे ठेवले जाते? परिणामी रहदारीला अडथळा निर्माण होतो. यात ग्रामस्थांना, पादचाऱ्यांना, विद्यार्थ्यांना याचा रोजच त्रास सहन करावा लागतो. याची कल्पना सुद्धा संबंधित प्रशासन तसेच विभागाला आहे का, असा सवाल मात्र आज ग्रामस्थ ठिकठिकाणी करताना दिसत आहे.अड्याळ गावात पोलीस ठाणे आहे तसेच तालुक्यातील सर्वात मोठी व उप तालुक्याचा नावाचा दर्जा प्राप्त असलेली १९ सदस्यीय ग्रामपंचायत कार्यालय आहे. या इमारतीला लागूनच प्रवासी निवारा परिसर आहे. यामध्ये नेहमीकरिता एक वाहतूक नियंत्रक राहिल म्हणून मागील काळात ठरले होते, परंतु शोकांतिका अशी की काही दिवस सुरळीत चालले, त्यात सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाचे योगदान दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक आली व त्यानंतर मात्र याविषयी कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान देणे टाळले. आमि समस्या वाढतच गेली.गुजरी चौकामधील बँकमध्ये रोजच शेकडोंच्या संख्येने खातेधारक येतात. यात त्यांना गर्दीचा तसेच शौचालय व वाहन पार्किंगच्या समस्येचा सामना गेली अनेक वर्षापासून होत असतानाही मात्र याकडे लोकप्रतिनिधी नेहमीच दुर्लक्ष करतात.गावातील प्रवासी निवारा परिसरातील अनधिकृत पार्किंग होण्यामागे जबाबदार कोण, असा प्रश्न मात्र आज ग्रामस्थांना पडला आहे. एखादी अती महत्वाच्या, तात्काळ सेवेचा लाभ मिळणेकरिता गावातील मुख्य मार्गावरून जायचे झाल्यास अनेक ग्रामस्थांना त्याचा भयंकर त्रास होतो तशीच काहीशी स्थिती बसप्रवासी निवारा परिसरातील नेहमीच पाहायला मिळते. येथील दुकानदारांच्या तसेच ग्रामपंचायत कार्यालयातही तीच स्थिती आहे.वाहनधारक तसेच चालकांनी वाहन ‘पार्क’ तरी कुठे करायचे. यावर ग्रामपंचायत की पोलीस प्रशासन एकमेंकावर जबाबदारीचे खापर फोडीत असतात. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी आहे. सरपंच जयश्री कुंभलकर यांच्या मते यासाठी येथील व्यवसायीकांनी व वाहतूक नियंत्रक, पोलीस कर्मचारी यांनी गावहितासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.