शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी पालकांनी सजग राहावे

By admin | Updated: August 14, 2016 00:18 IST

सध्या शाळाबाह्य शिक्षण घेण्याची फॅशन झाली आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत गुणवत्ता आणि स्पर्धा यात पालक भरकटत आहे.

राजेश डोंगरे यांचे प्रतिपादन : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारभंडारा : सध्या शाळाबाह्य शिक्षण घेण्याची फॅशन झाली आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत गुणवत्ता आणि स्पर्धा यात पालक भरकटत आहे. दोन दशकापूर्वी शाळा व्यतिरिक्त शिक्षण घेणारे विद्यार्थी म्हणजे शिक्षणात 'ढ' असा समज होता. आता सर्वत्र विद्यार्थ्यांना अवांतर शिक्षणाच्या फॅशनने झपाटले आहे. म्हणून पालकांनी सजग राहुन शाळा बाह्य शिक्षणातून होणारी लुट थांबवून शाळांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे यांनी केले.लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भंडारा येथे शैक्षणिक सत्र २०१५-१६ मध्ये इयत्ता १० वी व १२ वीच्या वार्षिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी गुलाब बैस, जिल्हा परिषद सदस्य ज्योती खवास, माजी प्राचार्य परघी, प्रमोद मानापुरे, भारती लिमजे, अजय निखार, ममता गणवीर, प्राचार्य डी.व्ही. देशमुख, जेष्ठ शिक्षक गायधने उपस्थित होते.यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यात बारावी परीक्षेत महाविद्यालयातून प्रथम आलेल्या रक्षंदा कोलेकर, द्वितीय सोनल शहारे, तृतीय पियुष भोयर आणि इयत्ता दहावीतून प्रथम प्रियंका गायधने, द्वितीय जान्हवी भुरे व तृतीय सागर राठोड यांचा सत्कार करण्यात आला. १० वी व १२ वीच्या परीक्षेत विषयावार सर्वाधिक गुण पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण घेणाऱ्या साक्षी गभने, तसनिया खान, श्रेया गजभिये, मराठी विषयात योजना बावणे, अमन गायधने, मयुर तिरपुडे, हिंदी विषयात सेजल धांडे, गणित विषयात दिग्वीजय निनावे, प्रशिल बडवाईक व विज्ञान विषयात आयुष देशभ्रतार व सुप्रिया गभने यांना सन्मानित करण्यात आले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षण घेवून उच्चस्थ पदावर कार्यरत आणि व्यवसायात अग्रेसर असलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून आणि विविध व्यक्तीच्या स्मृती प्रित्यर्थ शाळेला प्राप्त दाननिधीच्या पैशातून येणाऱ्या वार्षिक व्याजाच्या रकमेतून गत अनेक वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्याची प्रथा सुरू आहे.प्राचार्य डी.व्ही. देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणातून शाळेचा इतिहास सांगितला आणि भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुणवंत विद्यार्थी निर्माण करणारी शाळा असल्याचा उल्लेख केला. संचालन विणा सिंगनजुडे, बक्षिस वितरण समारंभाचे सुत्रसंचालन केशर बोकडे आणि आभार एन.जी. गायधने यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)