शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

गणवेश खरेदीसाठी होणार पालकांची धावपळ

By admin | Updated: June 20, 2017 00:20 IST

बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात.

मिळणार फक्त २०० रुपये : गणवेश निधी होणार बँक खात्यात जमालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाजारातून हलक्या दर्जाचा कपडा घ्यायचे म्हटले तरी एक मीटर कपड्यासाठी ५० ते १०० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मोफत गणवेश योजनेअंतर्गत येणाऱ्या २०० रुपयात ८ व्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कापड विकत घेणे कठीण आहे. २०० रुपये कापडावरच खर्च झाल्यानंतर शिलाईचे काय? असा प्रश्न आता पालकांसमोर उपस्थित होत आहे. पूर्वी शाळास्तरावरुन एकत्रितरीत्या कापड अथवा रेडीमेड ड्रेस खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे २०० रुपयात गणवेश तयार होत होते. परंतु चालू शैक्षणिक वर्षापासून गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे २०० रुपयांमध्ये गणवेशाचे कापड खरेदी करुन ते शिवण्याची कसरत पालकांना करावी लागणार आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत आहे, असे असतानाही दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत एका गणवेशाखाली २०० रुपये देऊन विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. मागील काही वर्षांपासून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आलेली नाही. परंतु गणवेशाचे पैसे शाळा स्तरावर देण्यात येत होते. या रक्कमेतून शाळा स्तरावरच एकत्रितरित्या गणवेश खरेदी करण्यात येत होते. अनेकवेळा सहावी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्यानंतर पैसे कमी पडत होते. अशावेळी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पदाधिकारी आर्थिक हातभार लावायचे. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थी नविन गणवेशात शाळेत येत होते. परंतू चालू शैक्षणिक वर्षापासून योजनेंतर्गत प्रत्येकी दोन गणवेशासाठी दिले जाणारे २०० रुपये हे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे आता गणवेश खरेदीची जबाबदारी थेट पालकांच्या खांद्यावर आली आहे. एकीकडे एखादा रुमाल घ्यायचा असला तरी २५ ते ५० रुपये मोजावे लागतात. दुसरीकडे शासनाने २०० रुपयांमध्ये गणवेश खरेदी करण्याचा नवोपक्रम राबविला आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी ते खिशातून रक्कम टाकून गणवेश खरेदी करु शकतात. मात्र गावनिवाह विचार केल्यास अशा पालकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यांचे हातावर आणून पाणावर खाणे आहे, असे पालक जास्तीचे पैसे कुठून आणणार अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारपेठेतील दराचा विचार करुन गणवेशासाठी दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. शाळेतूनच गणवेश वाटप करावेसर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेतूनच मोफत पाठपुस्तकांचे वाटप करण्यात येते. त्याच धर्तीवर गणवेश वाटप करावे अशी मागणी पालकांकडून होत आहे. एकत्रितरित्या खरेदी केल्याशिवाय २०० रुपयांच्या बजेटमध्ये गणवेश बसत नाही. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम न टाकता खादी महामंडळाकडून गणवेशाचा कापड खरेदी करावा अशी मागणी होत आहे. हे जरी शक्य नसल्यास शाळेतूनच गणवेश वाटप करावे, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेने वाटा उचलावामोफत गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालकांना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गणवेश केवळ २०० रुपयात खरेदी करावा लागणार आहे. महागाई लक्षात घेता. २०० रुपयात गणवेश मिळणे कठीण आहे व बँकेत पैशाच्या टंचाईने पालकांना २०० रुपयांसाठी मजूरी सोडून रांगेत उभे राहणे कठीण होईल. त्यामुळे कमी पडणाऱ्या रक्कमेचा वाटा जिल्हा परिषदेने उचलावा अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.