शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

पानखिडकी, दिवाणघाटाची पडझड

By admin | Updated: December 28, 2016 02:03 IST

प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले

पवनीत ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित : निधीची वाणवा कायम अशोक पारधी पवनी प्राचीन व ऐतिहासिक वारसा तसेच शेकडो मंदिर असलेल्या पवनी नगरातील मंदिराकडे नागरिकांनी लक्ष वेधून डागडुजी करणे सुरू केले असले तरी ऐतिहासिक वारसा असलेले पानखिडकी व दिवाणघाट दुर्लक्षित असल्याने त्याची पडझड होत आहे. दुर्लक्षित राहिल्यास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘नाव मोठे दर्शन खोटे’ या उक्तीला शोभेल अशी अवस्था या नगराची झालेली आहे. विदर्भाची काशी असा उल्लेख प्रत्येकजण करतो, परंतू ज्यामुळे काशीची उपाधी लावण्यात येते. ते स्थळ मात्र दुर्लक्षित आहेत. पुरातत्व विभाग असो की स्थानिक प्रशासन असो सर्वांचेच याकडे दुर्लक्ष आहे. प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात झाला तर पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात लोंढे नगराकडे वळू शकतात, असे जाणकारांचे मत आहे. भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या प्राचीन जवाहरगेट, परकोट, हरदोलाची टेकडी, सुलेमान टेकडी, जगन्नाथ स्तुप यांचा समावेश आहे. पर्यटकांना दिसणाऱ्या स्थळापैकी जवाहरगेट, परकोट याकडे विभागाचे लक्ष आहे. त्याची डागडुजी केल्या जाते. जगन्नाथ स्तुपाचे उत्खनन बाहेर काढण्यात आलेल्या मौलिक बाबी संग्रहालयात पाठविण्यात आलेल्या आहेत. कित्येक खांब अद्याप जमिनीवर पडून आहेत. वैनगंगा नदीचे नगराकडील तिरावर दिवाण घाट पानखिडकी, ताराबाईचा घाट, वैजेश्वर घाट अशी घाट आहेत. यापैकी एकही घाट पुरातत्व विभागाकडून संरक्षित करण्यात आलेले नाही. संरक्षित नसल्याने घाटांच्या डागडूजीसाठी शासनाच्या कोणत्याच विभागाचा निधी त्यावर खर्च होत नाही. परिणामी घाटांची झपाट्याने पडझड होवू लागली आहे. वैजेश्वर घाटावर भाविकांची वर्षभर वर्दळ राहते. वैजेश्वर घाट दुरुस्त करण्याचा प्रयत्न झाला असला तरी ऐतिहासिक महत्व असलेला दिवाणघाट व पानखिडकी यावर आतापर्यंत एक रूपयासुध्दा खर्च करण्यात आलेला नाही. दिवाणघाट करण्यासाठी तर पानखिडकी पवनीबाहेर जाण्यासाठी खुष्कीचा मार्ग म्हणून प्रसिध्द होता. दोन्ही घाटांची दुरुस्ती केल्यास पर्यटक घाटापर्यंत जाऊन ऐतिहासिक वारसांच्या आठवणी घेऊन परततील व अन्य पर्यटकांना घाटांचे माहात्म्य कथन करुन पर्यटकांपर्यंत माहिती पोहेचेल. नगरात पर्यटकांची वर्दळ वाढली. तरच पवनीचा विकास शक्य आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने प्राधान्याने ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करावा असे नगरवासीयांना वाटत आहे.