शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

पंचायत व्यवस्था बळकटी निर्णयाची पायपल्ली

By admin | Updated: October 17, 2015 01:09 IST

७३ व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीसाठी व पंचायत कारभारात पारदर्शकता यावी, ...

अंमलबजावणीची मागणी : महिला राजसत्ता आंदोलन संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : ७३ व्या घटना दुरुस्तीनंतर पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीसाठी व पंचायत कारभारात पारदर्शकता यावी, महिलांचा सक्रीय सहभाग वाढावा, सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय काढले आहेत. मात्र या शासन निर्णयाची पायमल्ली होत आहे. अंमलबजावणीसाठी महिला राजसत्ता आंदोलनाच्या पदाधिकारी एकवटल्या असून शासन, प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील शाश्वत व स्वयंपे्ररित गावविकासासाठी महिला आंदोलनाने पुढाकार घेतला आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणीसाठी अनेकदा राज्य शासनाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. २० जिल्ह्यातील १०० गावांत पंचायत ग्राम अभियान राबविणे सुरु आहे. मात्र अभियान राबवित असताना शासन, प्रशासनाकडून असहकार्य मिळत आहे. विविध शासकीय कामांच्या ठिकाणी माहिती दर्शक फलक अनिवार्य असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील सरपंचांच्या मानधनात व बैठक भत्त्यात वाढ करण्याचे शासन आदेश असलेतरी यात अनियमितता दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना ग्राम पंचायत सहाय्यक अनुदानाची तरतूद ही कागदावरच दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. यावेळी ओळख पटविताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शासनातर्फे त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय झाला असूनही त्याची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे आढळून आले. शासनाने हक्काचा कायदा मंजूर केला असूनही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा महिला राजसत्ता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केला आहे. निवेदनावर नागपूर विभागीय समन्वयक रत्नमाला वैद्य, जिल्हाध्यक्ष शालु तिरपुडे, रीता सुखदेवे, शुभांगी श्रुंगारपवार, रजनी घडले, शामकला कांबळे, संगिता मडामे, अर्चना मेश्राम, निरु गजभिये, चंद्रकला हुमणे, तारा कुंभाणकर, माधुरी देशकर, शारदा गायधने, नत्थू बांते, प्रभाकर बोदेले, दुलिचंद देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (नगर प्रतिनिधी)