शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

इतरांच्या वेदना आपल्या संवेदना ठराव्यात

By admin | Updated: June 19, 2014 23:41 IST

समाजातील उपेक्षित घटकांवर अन्याय, अत्याचार रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे. अन्याय, अत्याचार रोखण्याकरिता गावागावात पथक निर्माण करणे गरजेचे आहे. इतरांच्या वेदना आपल्या संवेदना झाल्या पाहिजे,

तुमसर : समाजातील उपेक्षित घटकांवर अन्याय, अत्याचार रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे. अन्याय, अत्याचार रोखण्याकरिता गावागावात पथक निर्माण करणे गरजेचे आहे. इतरांच्या वेदना आपल्या संवेदना झाल्या पाहिजे, असे परखड विचार ज्येष्ठ कवी व साहित्यीक यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत मनोहर तथा इतरांनी रॅलीला निळी झेंडी दाखविली. यशवंत मनोहर म्हणाले, हल्ली आंदोलन, चळवळी थंडावत चालल्या आहेत. समाजात जनजागरण करण्याची गरज असून मनोधैर्य वाढविण्याची खरी गरज आहे. उपेक्षित, बहिष्कृत घटकांना आज उलट संघटनेची गरज आहे. रॅली संपली तरी ही उपेक्षितांची चळवळ संपणार नाही. खैरलांजी, खर्डा येथे अशा अमानवी घटना पुरोगामी महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. हे रोखण्याकरिता तरुण पथक तात्काळ धावून जाण्याकरिताच ही जागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा प्रवास १८ ते २६ जून असून मुंबईतील आझाद मैदानात तिचा समारोप होणार आहे. याप्रसंगी मंचावर प्रसिद्ध साहित्यीक नजूबाई गावीत, रमेश बिजेकर, संयोजक किशोर जाधव, कवी भाऊ पंचभाई, डॉ.राहुल भगत, प्रा.उबाळे, प्रा.सुनिल चवळे, हिमाचल खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी रॅलीचे संयोजक किशोर जाधव यांनी ही रॅली झाल्यानंतर वर्षभराचा कार्यक्रम राबविला जाईल. शिबिर आयोजित करणे, प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. रॅली समारोपाप्रसंगी शासनाला निवेदन देण्यात येणार नाही. रॅलीस्थळी गावागावात खर्डा संसद, श्वेतपत्रिका, दलितांवर अत्याचार कमी व्हावे, कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीकरिता कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली गेली नाही, असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी सुमारे २०० बाईकर्स सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)