शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

इतरांच्या वेदना आपल्या संवेदना ठराव्यात

By admin | Updated: June 19, 2014 23:41 IST

समाजातील उपेक्षित घटकांवर अन्याय, अत्याचार रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे. अन्याय, अत्याचार रोखण्याकरिता गावागावात पथक निर्माण करणे गरजेचे आहे. इतरांच्या वेदना आपल्या संवेदना झाल्या पाहिजे,

तुमसर : समाजातील उपेक्षित घटकांवर अन्याय, अत्याचार रोखण्यास शासन अपयशी ठरली आहे. अन्याय, अत्याचार रोखण्याकरिता गावागावात पथक निर्माण करणे गरजेचे आहे. इतरांच्या वेदना आपल्या संवेदना झाल्या पाहिजे, असे परखड विचार ज्येष्ठ कवी व साहित्यीक यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी यशवंत मनोहर तथा इतरांनी रॅलीला निळी झेंडी दाखविली. यशवंत मनोहर म्हणाले, हल्ली आंदोलन, चळवळी थंडावत चालल्या आहेत. समाजात जनजागरण करण्याची गरज असून मनोधैर्य वाढविण्याची खरी गरज आहे. उपेक्षित, बहिष्कृत घटकांना आज उलट संघटनेची गरज आहे. रॅली संपली तरी ही उपेक्षितांची चळवळ संपणार नाही. खैरलांजी, खर्डा येथे अशा अमानवी घटना पुरोगामी महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. हे रोखण्याकरिता तरुण पथक तात्काळ धावून जाण्याकरिताच ही जागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा प्रवास १८ ते २६ जून असून मुंबईतील आझाद मैदानात तिचा समारोप होणार आहे. याप्रसंगी मंचावर प्रसिद्ध साहित्यीक नजूबाई गावीत, रमेश बिजेकर, संयोजक किशोर जाधव, कवी भाऊ पंचभाई, डॉ.राहुल भगत, प्रा.उबाळे, प्रा.सुनिल चवळे, हिमाचल खोब्रागडे उपस्थित होते. यावेळी रॅलीचे संयोजक किशोर जाधव यांनी ही रॅली झाल्यानंतर वर्षभराचा कार्यक्रम राबविला जाईल. शिबिर आयोजित करणे, प्रबोधनाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. रॅली समारोपाप्रसंगी शासनाला निवेदन देण्यात येणार नाही. रॅलीस्थळी गावागावात खर्डा संसद, श्वेतपत्रिका, दलितांवर अत्याचार कमी व्हावे, कृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तुमसर - खैरलांजी - खर्डा - मुंबई बाईकर्स रॅलीकरिता कुणाकडूनही आर्थिक मदत घेतली गेली नाही, असे आवर्जून सांगितले. याप्रसंगी सुमारे २०० बाईकर्स सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)