शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

धान खरेदी केंद्र कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 00:30 IST

शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले.

दिवाळी अंधारात : शेतकरी जिथल्या तिथे, गोदाम मालक वाऱ्यावरपालांदूर : शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना सुद्धा आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचे शासनावर व शासनाचे प्रशासनावर अंकुश नसल्याने हमी भाव केंद्राला सुरू होण्यास उशीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.भंडारा जिल्ह्याची ख्याती धानाचा जिल्हा म्हणून आहे. कोठाराचा आधार मात्र निराधार होत आहे. शासनाकडे स्वत:चे कोठार नाही. खासगीतले कोठारमालक सुमार संकटात आले आहेत. मागील चार वर्षापासून कोठाराचे भाडे मंत्रालयात फाईल बंद आहेत. चालू वर्षात केवळ दोन महिन्यांचे भाडे देऊ असा सूर निघाल्याने कोठारमालक कोठार धान खरेदीकरिता देणारच नसल्याचे कोठारमालक मुरलीधर कापसे यांनी वार्तांकनात सांगितले. त्यामुळे धान खरेदी सुरु होणार की नाही हा प्रश्न ऐरणीवर आहे. पालांदूर परिसरात विविध सेवा कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत हमी भावांतर्गत धान खरेदी केली जाते. शेतकरी रोजच संस्थेत जाऊन धान खरेदी विषयी चौकशी करीत नकार मिळत असल्याने शासनाविषयी रोष व्याप्त होत आहे. हमी भाव केंद्राविषयी माहिती घेताना शासनाने हमी केंद्राचे कमीशन, गोदाम भाडे चार वर्षापासूनचे दिले नसल्याचे समोर आले. एकट्या पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे २०१२-१३ चे २ लाख ४९ हजार १६६ रुपये, २०१३-१४ चे २ लाख ७७ हजार ५५० रुपये तर २०१४-१५ चे ४८ हजार ५८ असे एकुण १० लाख ६७७४ एवढी रक्कम कमीशन पोटी शिल्लक आहे. गोदाम भाडे २००९-१० चे ८२ हजार ९९४, २०११-१२ चे १ लाख १ हजार २४६, २०१२-१३ चे एक लाख ६० हजार ००१, २०१३-१४ चे १ लाख ४९ हजार ३३३ असे ५ लाख २ हजार ५७४ रुपये म्हणजे एकुण १५ लाख ९ हजार ३४८ एवढी रक्कम शासनाकडे शिल्लक असल्याने संस्था अडचणीत असल्याचे संस्था अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.पालांदूर परिसरात २२ दिवसांपासून धान मळणी यांत्रिक पद्धतीने सुरु असल्याने रोजच हजारो क्विंटल धान विक्रीकरिता येत आहे. परंतु जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने खासगी व्यापाऱ्याच्या घशात ११५० - १२०० रुपये दराने धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)धान खरेदीचे शासनाचे आदेश मिळाले आहे. जिल्ह्यातील अधिकृत केंद्राला खरेदीचे पत्र प्रत्यक्ष व पोष्टांनी पाठविले असून तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात येईल. - पी.डी. खाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणे चिंतनीय बाब आहे. जितका उशिर होईल तेवढा शेतकरी तोट्यात येईल. प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे शेतकरी भरडला जात आहे.- वसंत शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,