शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

धान खरेदी केंद्र कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 00:30 IST

शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले.

दिवाळी अंधारात : शेतकरी जिथल्या तिथे, गोदाम मालक वाऱ्यावरपालांदूर : शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना सुद्धा आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचे शासनावर व शासनाचे प्रशासनावर अंकुश नसल्याने हमी भाव केंद्राला सुरू होण्यास उशीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.भंडारा जिल्ह्याची ख्याती धानाचा जिल्हा म्हणून आहे. कोठाराचा आधार मात्र निराधार होत आहे. शासनाकडे स्वत:चे कोठार नाही. खासगीतले कोठारमालक सुमार संकटात आले आहेत. मागील चार वर्षापासून कोठाराचे भाडे मंत्रालयात फाईल बंद आहेत. चालू वर्षात केवळ दोन महिन्यांचे भाडे देऊ असा सूर निघाल्याने कोठारमालक कोठार धान खरेदीकरिता देणारच नसल्याचे कोठारमालक मुरलीधर कापसे यांनी वार्तांकनात सांगितले. त्यामुळे धान खरेदी सुरु होणार की नाही हा प्रश्न ऐरणीवर आहे. पालांदूर परिसरात विविध सेवा कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत हमी भावांतर्गत धान खरेदी केली जाते. शेतकरी रोजच संस्थेत जाऊन धान खरेदी विषयी चौकशी करीत नकार मिळत असल्याने शासनाविषयी रोष व्याप्त होत आहे. हमी भाव केंद्राविषयी माहिती घेताना शासनाने हमी केंद्राचे कमीशन, गोदाम भाडे चार वर्षापासूनचे दिले नसल्याचे समोर आले. एकट्या पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे २०१२-१३ चे २ लाख ४९ हजार १६६ रुपये, २०१३-१४ चे २ लाख ७७ हजार ५५० रुपये तर २०१४-१५ चे ४८ हजार ५८ असे एकुण १० लाख ६७७४ एवढी रक्कम कमीशन पोटी शिल्लक आहे. गोदाम भाडे २००९-१० चे ८२ हजार ९९४, २०११-१२ चे १ लाख १ हजार २४६, २०१२-१३ चे एक लाख ६० हजार ००१, २०१३-१४ चे १ लाख ४९ हजार ३३३ असे ५ लाख २ हजार ५७४ रुपये म्हणजे एकुण १५ लाख ९ हजार ३४८ एवढी रक्कम शासनाकडे शिल्लक असल्याने संस्था अडचणीत असल्याचे संस्था अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.पालांदूर परिसरात २२ दिवसांपासून धान मळणी यांत्रिक पद्धतीने सुरु असल्याने रोजच हजारो क्विंटल धान विक्रीकरिता येत आहे. परंतु जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने खासगी व्यापाऱ्याच्या घशात ११५० - १२०० रुपये दराने धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)धान खरेदीचे शासनाचे आदेश मिळाले आहे. जिल्ह्यातील अधिकृत केंद्राला खरेदीचे पत्र प्रत्यक्ष व पोष्टांनी पाठविले असून तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात येईल. - पी.डी. खाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणे चिंतनीय बाब आहे. जितका उशिर होईल तेवढा शेतकरी तोट्यात येईल. प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे शेतकरी भरडला जात आहे.- वसंत शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,