शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

धान खरेदी केंद्र कागदावरच

By admin | Updated: November 11, 2015 00:30 IST

शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले.

दिवाळी अंधारात : शेतकरी जिथल्या तिथे, गोदाम मालक वाऱ्यावरपालांदूर : शासन शेतकऱ्यांप्रती उदासीन असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले. १ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात हमी भाव धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश असताना सुद्धा आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. लोकप्रतिनिधींचे शासनावर व शासनाचे प्रशासनावर अंकुश नसल्याने हमी भाव केंद्राला सुरू होण्यास उशीर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे.भंडारा जिल्ह्याची ख्याती धानाचा जिल्हा म्हणून आहे. कोठाराचा आधार मात्र निराधार होत आहे. शासनाकडे स्वत:चे कोठार नाही. खासगीतले कोठारमालक सुमार संकटात आले आहेत. मागील चार वर्षापासून कोठाराचे भाडे मंत्रालयात फाईल बंद आहेत. चालू वर्षात केवळ दोन महिन्यांचे भाडे देऊ असा सूर निघाल्याने कोठारमालक कोठार धान खरेदीकरिता देणारच नसल्याचे कोठारमालक मुरलीधर कापसे यांनी वार्तांकनात सांगितले. त्यामुळे धान खरेदी सुरु होणार की नाही हा प्रश्न ऐरणीवर आहे. पालांदूर परिसरात विविध सेवा कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत हमी भावांतर्गत धान खरेदी केली जाते. शेतकरी रोजच संस्थेत जाऊन धान खरेदी विषयी चौकशी करीत नकार मिळत असल्याने शासनाविषयी रोष व्याप्त होत आहे. हमी भाव केंद्राविषयी माहिती घेताना शासनाने हमी केंद्राचे कमीशन, गोदाम भाडे चार वर्षापासूनचे दिले नसल्याचे समोर आले. एकट्या पालांदूर सेवा सहकारी संस्थेचे २०१२-१३ चे २ लाख ४९ हजार १६६ रुपये, २०१३-१४ चे २ लाख ७७ हजार ५५० रुपये तर २०१४-१५ चे ४८ हजार ५८ असे एकुण १० लाख ६७७४ एवढी रक्कम कमीशन पोटी शिल्लक आहे. गोदाम भाडे २००९-१० चे ८२ हजार ९९४, २०११-१२ चे १ लाख १ हजार २४६, २०१२-१३ चे एक लाख ६० हजार ००१, २०१३-१४ चे १ लाख ४९ हजार ३३३ असे ५ लाख २ हजार ५७४ रुपये म्हणजे एकुण १५ लाख ९ हजार ३४८ एवढी रक्कम शासनाकडे शिल्लक असल्याने संस्था अडचणीत असल्याचे संस्था अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.पालांदूर परिसरात २२ दिवसांपासून धान मळणी यांत्रिक पद्धतीने सुरु असल्याने रोजच हजारो क्विंटल धान विक्रीकरिता येत आहे. परंतु जिल्हा प्रशासन उदासीन असल्याने खासगी व्यापाऱ्याच्या घशात ११५० - १२०० रुपये दराने धान खरेदी सुरु आहे. (वार्ताहर)धान खरेदीचे शासनाचे आदेश मिळाले आहे. जिल्ह्यातील अधिकृत केंद्राला खरेदीचे पत्र प्रत्यक्ष व पोष्टांनी पाठविले असून तात्काळ धान खरेदी सुरु करण्यात येईल. - पी.डी. खाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, भंडारा.शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न होणे चिंतनीय बाब आहे. जितका उशिर होईल तेवढा शेतकरी तोट्यात येईल. प्रशासनाच्या अक्षम्य चुकीमुळे शेतकरी भरडला जात आहे.- वसंत शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,