शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

धान खरेदी केंद्र सुरू ठेवा

By admin | Updated: May 23, 2014 23:39 IST

उन्हाळी धान खरेदीसाठी जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप शेतकरी आघाडीने दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना

भंडारा : उन्हाळी धान खरेदीसाठी जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप शेतकरी आघाडीने दिला आहे. या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविण्यात आले आहे. खरीप हंगामातील धान पिके हे आसमानी संकटामुळे व सुलतानी संकटात सापडल्याने पिकांची नासाडी होवून शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही. जे काही पडले ते रासायनिक खते, किटकनाशके, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी व सणासुदीसाठी अत्यल्प व कवडीमोल दराने व्यापार्‍यांच्या घशात पडले. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे आधारभूत धान्य खरेदी केंद्र उशिरा म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने निर्धारित केलेल्या हमी भावाचा लाभ पाच टक्के शेतकर्‍यांनाही झाला नाही. इतकेच नव्हेतर शासनाने घोषित केलेले २०० रूपये प्रति क्विंटल बोनसचा लाभळी शेतकर्‍यांना घेता आला नाही. एकंदरीत धानाच्या आधारभूत किंमतीचा व बोनसच्या लाभापासून या जिल्ह्यातील शेतकरी वंचितच राहिला आहे. शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात उन्हाळी धान पिक लावले. उत्पादन हातीयायला लागले आणि शासनाची आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याचा फतवा काढला. हे एकंदरीत शेतकर्‍याच्या हिताविरूद्धचे निर्णय असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये शासनाविरूद्ध असंतोष व आक्रोष निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता उन्हाळी धानाची खरेदी ही आधारभूत किंमतीने धान्य खरेदी केंद्रामार्फतच खरेदी करावे. त्यासाठी आधारभूत धान्य खरेदी केंद्रे पुर्ववत सुरू करावे. अन्यथा भाजप शेतकरी आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलेला आहे. (शहर प्रतिनिधी)