शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

व्यापाऱ्यांसाठी सुरू होणार धान खरेदी केंद्र !

By admin | Updated: May 13, 2017 00:17 IST

शीर्षक वाचून दचकलात काय? दचकू नका, हे सत्य आहे.

मुकेश देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्कशीर्षक वाचून दचकलात काय? दचकू नका, हे सत्य आहे. कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा शासनाने १५ मे पासून उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा मुहूर्त शासनाने निश्चित केला आहे. मात्र, संपूर्ण भंडारा- गोंदिया या धानाच्या जिल्ह्यात धान मळणीला २० एप्रिलपासूनच सुरुवात झालेली आहे. धान खरेदी केंद्र सुरु होण्यास तब्बल २५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात खाजगी व्यापाऱ्यांना उत्पादीत धान विकणे सुरु केले आहे. धान खरेदी केंद्र सुरु होण्याच्या दिवसापर्यंत शेतकऱ्याकडील सर्व धान व्यापाऱ्यांकडे राहील व व्यापाऱ्यांसाठीच धान खरेदी केंद्राचे विधीवत उद्घाटन करुन खरेदीचा शुभारंभ करण्यात येईल यात दुमत नाही. बळीराजाने नव्या जोमाने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. पिकही बऱ्यापैकी चांगले उत्पादन देत असल्याने खरीपात झालेले नुकसान भरुन निघेल या भोळ्या आशेवर शेतकऱ्यांनी कसून मेहनत केली. मात्र शासन शेतकऱ्यांनी कसून मेहनत केली. मात्र शासन व लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या धोरणामुळे अजूनपर्यंत उन्हाळी धान खरेदी सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांना आपले धानपिक आधारभूत किमतीपेक्षा ४०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांना नाईलाजाने विकावे लागत आहेत. प्रति क्विंटल ४०० रुपयांचा तोटा म्हणजे जेमतेम उत्पादन खर्च सुध्दा निघेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे.शासन व शासनाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याला धान विकू नका आधारभूत केंद्रातच धान विका असे वारंवार सांगतात मात्र, धानाची साठवणूक करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यात गावतपाळीवर कुठेही साठवणूक केंद्राची उपलब्धता करुन देत नसल्याने खाजगी व्यापाऱ्यांकडे धान विकल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही.उन्हाळी धानपीक हे एप्रिलच्या पंधरवाड्यापासून मळणीला येत असतात याची पुरेपुर कल्पना शासनाला व संबंधित अधिकाऱ्यांना सुध्दा असते तरीपण १५ मे पासून उन्हाळी धान खरेदीचा शुभारंभ करण्यामागे काय हेतू असावा? असा प्रश्न निर्माण होतो. मागील तीन वर्षांचा विचार केला असता असे लक्षात येते की फक्त १० टक्के शेतकऱ्यांनीच धान खरेदी केंद्रावर जावून स्वत:चे धान विकले उर्वरित सर्व धान हे खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दिले असल्याचे बोलले जात आहे.ज्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान विकले नाही. अशा शेतकऱ्यांना खाजगी व्यापारी सातबारावर धान देण्याच्या मोबदल्यात कमीशन देत असल्याचीही माहिती आहे. आणि शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना सातबारे दिले तर बिघडले कुठे किमान नुकसान झालेल्या चा मोबदला म्हणून काही रुपये खाजगी व्यापाऱ्यांकडून मिळतील याकरिता शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना आपलेकडील सातबारे देत असतो. निवडणुका आल्या की राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करीत असतात. मात्र निवडणुकीनंतर पुढाऱ्यांचे तोंडही दिसत नाही. १ मे पासून धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश खरेदी-विक्री व राईसमिल असोसिएशनला दिले आहेत त्यांनी अजूनपर्यंत धान खरेदी सुरु का केले नाही. याबाबत चौकशी केली जाईल. ताबडतोब धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येईल.-एच. एल. पवार, जिल्हा मार्केटिंग अधिकारीउन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यासंबंधाने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून कोणतेही पत्र अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही. उद्याला खरेदी-विक्री संघाची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील.-अरुण गभणे, खरेदी-विक्री उपसभापती लाखांदूर