शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:52 IST

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष ...

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धान पीकाची लागवड केली जाते. धानपीकासाठी जमीनाचा पोत उत्तम असल्यामुळे वर्षाकाठी खरीप व रब्बी हंगामात पीक शेतकरी घेत असतो. परंतु या धान पीकाची खरी मदार पावसावर असते. यावर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस दमदार बरसला असला तरी हलके धान गर्भात असताना एका पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. दुसरीकडे धान पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी मोहाडी व भंडारा तालुक्यात चक्क आंदोलन छेडण्यात आले आहे.धान पिकत नसेल तर जगावे तरी कसे? असा संतप्त व तेवढाच मनाला उद्वीग्न करणारा प्रश्न बळीराजा विचारीत आहेत. जिल्ह्यातील मध्यम तथा अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा असतांना सिंचनासाठी दिले जात नाही. दुसरीकडे पेंच प्रकल्प विभागासोबत करार करुनही टेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने बळीराजा हताश झाला आहे.चौरास भागात काही ठिकाणी धान पिकाच्या मळणीला प्रांरभ झाला असला तरी काही ठिकाणी स्थिती हादरुन टाकणारी आहे. यात सर्वात जास्त टेंशन अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली व लाखनी परिसरात धान पीकासाठी एका पाण्याची गरज आहे. मात्र यास्थितीत पाणी मिळूनही त्याचा उपयोग राहणार नाही असेही शेतकरी बोलून दाखवित आहे. एकंदरीत यावर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.प्रशासन म्हणते सर्व आलबेलधानपीकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी विविध संघटना व लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन उभारले आहे. पाणी जेव्हा येईल तेव्हापर्यंत धान पीक हातचे जाणार अशी भिती असताना जिल्हा प्रशासन मात्र आलबेल असल्याचे सांगत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत आलेल्या पीक पेरणी अहवालात धानाचे उत्पादन चांगले येईल, असे दिसून येते.पाण्याअभावी धानपीक वाळत आहे, अशा आशयाची कुठलीही वार्ता किंवा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत अधिकृतपणे आलेली नाही. हलके धान येत्या काही दिवसात निघणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल असे काही चिन्ह दिसून येत नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी