शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:52 IST

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष ...

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धान पीकाची लागवड केली जाते. धानपीकासाठी जमीनाचा पोत उत्तम असल्यामुळे वर्षाकाठी खरीप व रब्बी हंगामात पीक शेतकरी घेत असतो. परंतु या धान पीकाची खरी मदार पावसावर असते. यावर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस दमदार बरसला असला तरी हलके धान गर्भात असताना एका पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. दुसरीकडे धान पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी मोहाडी व भंडारा तालुक्यात चक्क आंदोलन छेडण्यात आले आहे.धान पिकत नसेल तर जगावे तरी कसे? असा संतप्त व तेवढाच मनाला उद्वीग्न करणारा प्रश्न बळीराजा विचारीत आहेत. जिल्ह्यातील मध्यम तथा अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा असतांना सिंचनासाठी दिले जात नाही. दुसरीकडे पेंच प्रकल्प विभागासोबत करार करुनही टेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने बळीराजा हताश झाला आहे.चौरास भागात काही ठिकाणी धान पिकाच्या मळणीला प्रांरभ झाला असला तरी काही ठिकाणी स्थिती हादरुन टाकणारी आहे. यात सर्वात जास्त टेंशन अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली व लाखनी परिसरात धान पीकासाठी एका पाण्याची गरज आहे. मात्र यास्थितीत पाणी मिळूनही त्याचा उपयोग राहणार नाही असेही शेतकरी बोलून दाखवित आहे. एकंदरीत यावर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.प्रशासन म्हणते सर्व आलबेलधानपीकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी विविध संघटना व लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन उभारले आहे. पाणी जेव्हा येईल तेव्हापर्यंत धान पीक हातचे जाणार अशी भिती असताना जिल्हा प्रशासन मात्र आलबेल असल्याचे सांगत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत आलेल्या पीक पेरणी अहवालात धानाचे उत्पादन चांगले येईल, असे दिसून येते.पाण्याअभावी धानपीक वाळत आहे, अशा आशयाची कुठलीही वार्ता किंवा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत अधिकृतपणे आलेली नाही. हलके धान येत्या काही दिवसात निघणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल असे काही चिन्ह दिसून येत नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी