शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:52 IST

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष ...

ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा

इंद्रपाल कटकवार।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धान पीकाची लागवड केली जाते. धानपीकासाठी जमीनाचा पोत उत्तम असल्यामुळे वर्षाकाठी खरीप व रब्बी हंगामात पीक शेतकरी घेत असतो. परंतु या धान पीकाची खरी मदार पावसावर असते. यावर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस दमदार बरसला असला तरी हलके धान गर्भात असताना एका पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. दुसरीकडे धान पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी मोहाडी व भंडारा तालुक्यात चक्क आंदोलन छेडण्यात आले आहे.धान पिकत नसेल तर जगावे तरी कसे? असा संतप्त व तेवढाच मनाला उद्वीग्न करणारा प्रश्न बळीराजा विचारीत आहेत. जिल्ह्यातील मध्यम तथा अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा असतांना सिंचनासाठी दिले जात नाही. दुसरीकडे पेंच प्रकल्प विभागासोबत करार करुनही टेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने बळीराजा हताश झाला आहे.चौरास भागात काही ठिकाणी धान पिकाच्या मळणीला प्रांरभ झाला असला तरी काही ठिकाणी स्थिती हादरुन टाकणारी आहे. यात सर्वात जास्त टेंशन अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली व लाखनी परिसरात धान पीकासाठी एका पाण्याची गरज आहे. मात्र यास्थितीत पाणी मिळूनही त्याचा उपयोग राहणार नाही असेही शेतकरी बोलून दाखवित आहे. एकंदरीत यावर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.प्रशासन म्हणते सर्व आलबेलधानपीकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी विविध संघटना व लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन उभारले आहे. पाणी जेव्हा येईल तेव्हापर्यंत धान पीक हातचे जाणार अशी भिती असताना जिल्हा प्रशासन मात्र आलबेल असल्याचे सांगत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत आलेल्या पीक पेरणी अहवालात धानाचे उत्पादन चांगले येईल, असे दिसून येते.पाण्याअभावी धानपीक वाळत आहे, अशा आशयाची कुठलीही वार्ता किंवा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत अधिकृतपणे आलेली नाही. हलके धान येत्या काही दिवसात निघणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल असे काही चिन्ह दिसून येत नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी