शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

भंडारा  तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड  बेड  तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक  तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले.  यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करताना आंतरपीक म्हणून कोथिंबीर पीक रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवडीचे मार्गदर्शन केले

ठळक मुद्देभंडारा तालुक्यातील माटोरा येथे बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामातील धानपिकाला परतीच्या पावसाचा फटका बसल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पीकांवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. जिल्ह्यात आलेला महापूर तसेच तुडतुडा किडीचा मोठा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. यावर्षी धान पिकाचे उत्पादन घटले आहे. यातून  शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कृषी कर्मचाऱ्यांमार्फत रबी पीकांचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच हरभरा पिकाच्या बीबीएफ पद्धत लागवडीचे धडे दिले जात आहेत. भंडारा  तालुक्यातील माटोरा येथील शास्त्री लक्ष्मण गोमासे यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने हरभरा लागवड  बेड  तयार करून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक  तालुक्यातील कृषी सहाय्यक गिरिधारी मालेवार यांनी शेतकऱ्यांना दाखवले. यावेळी शेतकऱ्यांना हरभरा पिकाची पेरणी करताना आंतरपीक म्हणून कोथिंबीर पीक रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवडीचे मार्गदर्शन केले.  माटोरा येथील शेतकरी खुशाल शेंडे, यादोवराव ढेंगे, किशोर  निंबार्ते, दिनेश भुते, डोनू सूर्यवंशी यांच्या शेतावर बीबीएफ पद्धतीने लागवड केलेल्या पीकाची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. तालुक्यातील  अनेक शेतकऱ्यांनी रुंद  सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी केली  आहे. भंडारा तालुक्यात हरभरा लागवडीखालील क्षेत्र मोठे असून यासाठी भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ठिकठिकाणी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी विजय हुमणे, होमराज धांडे, पर्यवेक्षक माया कांबळे, कृषी सहाय्यक गिरिधारी मलेवार  यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना आधुनिक  पद्धतीने पेरणीचे मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी शेतकऱ्यांची बोलताना सांगितले. अनेक शेतकरी हरभरा, गहू, लाखोरी पिकांची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करीत आहेत. कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना बिजप्रक्रियेचे महत्त्व सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिकातील मर रोगाचे प्रमाण कमी होत असून उत्पादनात अधिक भर पडत असल्याने शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षित दाखविण्यात येत आहेत. शेतकरी रुंद सरी वरंबा पद्धतीने हरभरा पिकांची पेरणी करीत असल्याने उत्पादनात चांगली वाढ होणार असल्याचेभंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

हरभरा पिकासाठी रुंद सरी वरंबा पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून अनेक शेतकरी बीबीएफ पद्धतीने पेरणी करीत आहेत. शेतकऱ्यांना आंतरपिकाचेही मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात रब्बीचे क्षेत्र मोठे असून कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करीत आहोत.- अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा

शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुनच पिकांची पेरणी करावी. यामुळे दुबार पेरणीचे संकट टळते. बीबीएफ पद्धतीचे मार्गदर्शन गटनिहाय पद्धतीने करणे सुरु आहे. उत्पादन वाढीसाठी ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे. - गिरीधारी मलेवार,  कृषी सहाय्यक,माटोरा.