शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.

ठळक मुद्देमदतीची अपेक्षा : परतीचा पाऊस आणि किडींचा प्रादुर्भाव, सर्वेक्षण अद्यापही सुरू नाही

न्यूज नेटवर्कभंडारा : राबराब राबून पिकविलेला धान हातातोंडाशी आला असताना आता परतीचा पाऊस आणि किडींच्या प्रादूर्भावाने उद्ध्वस्त होत आहे. दुहेरी संकटाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आला असून पीक विम्यासोबत शासकीय मदतीची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन आहे. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, कन्हान आणि सुर नदीसोबत गोसेखुर्द व बावनथडी असे दोन मोठे प्रकल्प आहेत. परंतु अद्यापही नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळत नाही.यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच अतीवृष्टी झाली. आता ऐन दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. शेतात कापलेल्या धानाचे फड आहेत. मात्र पावसाने कापलेला धान ओला होत आहे. या सर्व प्रकारात शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शासनाने शेतकºयांना पीक विम्यासोबतच शासकीय मदतीची घोषणा करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.वन्यप्राण्यांचा फटकाजिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्यजीव शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. धानपिकात रानडुकरांनी धुमाकुळ घातल्याने उभे पीक आडवे होत आहे. यासोबतच भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. वनविभाग नुकसानभरपाई देत नसल्याने आणि शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती