शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

पाण्याअभावी भात व ऊस पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:54 IST

तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुक्यात आठ तास वीज पुरवठा : तापमानात वाढ, निवडणूक संपताच दोन तास वाढले भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.तुमसर तालुक्यात यावर्षी उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. विहिरीत पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु थ्री फेस वीज पुरवठा केवळ आठ तास करणे सुरु आहे. किमान बारा तास वीज पुरवठा करण्याची गरज आहे. आठवड्यात रात्री १२ नंतर तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. तर चार दिवस दिवसा वीज पुरवठा वीज वितरण कंपनी करीत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने केले होते.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा आठ तास वीज पुरवठा देणे सुरु केले आहे. भर उन्हात पाण्याअभावी धान पीक करपू लागले आहे. शेतकऱ्यांनी धान व नगदी ऊस पिकाची लागवड केली आहे. ऊसाचे पिकही येथे धोक्यात आले आहे. धानाला जादा भाव देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर तुमसर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली हे विशेष. वीज पुरवठा तासात वाढ न केल्याने येथील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांनी धान व ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पिकांना पाणी पुरेसा होत नाही. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. किमान १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा.-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, सिलेगाव.