शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
2
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
4
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
5
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
6
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
7
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
8
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
9
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
10
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
11
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
12
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
13
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
14
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
15
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
16
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
17
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
18
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

‘ओव्हर टाईम’चा पैसा थकीत

By admin | Updated: May 2, 2015 00:48 IST

देव्हाडा स्थित ऐलोरा पेपर मिल सध्या विविध कारणांनी गाजत आहे.

व्यथा पेपर मिल कामगारांची : देव्हाडा येथील प्रकरण करडी (पालोरा) : देव्हाडा स्थित ऐलोरा पेपर मिल सध्या विविध कारणांनी गाजत आहे. कामगारांचे अनेक समस्या प्रलंबित असताना त्या सोडविण्यासाठी पेपर मिल मालक व प्रशासनाकडून साधे सौजन्य दाखविले जात नाही. कामगार आयुक्तांचा धाक संपल्यासारखी अवस्था आहे. कामगारांचा सन २०१३-१४-१५ मधील ओव्हर टाईमचा पैसा अजूनही देण्यात आलेला नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल मध्ये अन्यायकारक पद्धतीने काढलेल्या कामगारांना सेवा खंडीत काळातील वेतनासह पूर्वपदावर घेण्यात यावे, मासिक ५ हजार रुपये वेतनवृद्धी देण्यात यावी, कामगारांचे ४८ महिन्यांचे किमान वेतनाचे एरियस देण्यात यावे, सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांना ग्रॅज्युएटी ३० दिवसाचे आत देण्यात यावी, मुलभूत सोयी सुविधा व भत्ते देण्यात यावे यासाठी दि. १५ मार्च २०१५ पासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र कंपनी प्रशासनाने दीड महिन्याचा कालावधी उपोषणाला होत असताना दखल घेतलेली नाही. कामगारांशी चर्चा करायलाही मालक किंवा प्रशासन तयार नाही. त्यामुळे कामगार व भांडवलदार यांच्यात तीव्र संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे.कारखाना प्रशासन कामगारांवर एवढेच अन्याय करून थांबलेला नाही तर सन २०१३-१४-१५ मध्ये कामगारांनी भांडवलदाराचा नफा वाढविण्यासाठी, उत्पादन वाढवि यासाठी जे अतिरिक्त श्रम केले, ओव्हर टाईम करून होणारे नुकसान भरून काढले त्या कामगारांना अजूनही ओव्हरटाईमचा पैसा देण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रशासन जुलमी धोरण राबवित आवाज उठविणाऱ्यांचा आवाजच दडपशाहीने दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.कामगारांना बेकायदेशिरपणे कामावरून काढले जात आहे. कामगारांना दर महिन्याला त्यांच्या हक्काचे वेतन मिळणे गरजेचे आहे. कारण त्यांचेवरच मुलांच्या गरजा, कुटुंबाच्या व अन्य कामाच्या गरजा भागविल्या जातात. ते मासिक वेतनही वेळेवर दिले जात नाही. दोन तीन महिने वेतनच दिले जात नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. कारखाना प्रशासन कंपनी तोट्यात असल्याचे कारण त्यासाठी देत असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कारखान्यात केवळ ८३ मजुरांच्या भरवशावर ५०० कामगारांचे काम करवून घेत असताना फक्त किमान वेतन देत आहे. कामगार आयुक्तांकडे वारंवार प्रश्न लावूनही न्याय मिळवून दिला जात नाही. कामगार आयुक्तांचा धाक संपल्यासारखी अवस्था असून वरिष्ठांनी वेळीच दाखल घेऊन न्याय देण्याची गरज आहे. (वार्ताहर)