शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

‘ओव्हर टाईम’चा पैसा थकीत

By admin | Updated: May 2, 2015 00:48 IST

देव्हाडा स्थित ऐलोरा पेपर मिल सध्या विविध कारणांनी गाजत आहे.

व्यथा पेपर मिल कामगारांची : देव्हाडा येथील प्रकरण करडी (पालोरा) : देव्हाडा स्थित ऐलोरा पेपर मिल सध्या विविध कारणांनी गाजत आहे. कामगारांचे अनेक समस्या प्रलंबित असताना त्या सोडविण्यासाठी पेपर मिल मालक व प्रशासनाकडून साधे सौजन्य दाखविले जात नाही. कामगार आयुक्तांचा धाक संपल्यासारखी अवस्था आहे. कामगारांचा सन २०१३-१४-१५ मधील ओव्हर टाईमचा पैसा अजूनही देण्यात आलेला नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल मध्ये अन्यायकारक पद्धतीने काढलेल्या कामगारांना सेवा खंडीत काळातील वेतनासह पूर्वपदावर घेण्यात यावे, मासिक ५ हजार रुपये वेतनवृद्धी देण्यात यावी, कामगारांचे ४८ महिन्यांचे किमान वेतनाचे एरियस देण्यात यावे, सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कामगारांना ग्रॅज्युएटी ३० दिवसाचे आत देण्यात यावी, मुलभूत सोयी सुविधा व भत्ते देण्यात यावे यासाठी दि. १५ मार्च २०१५ पासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र कंपनी प्रशासनाने दीड महिन्याचा कालावधी उपोषणाला होत असताना दखल घेतलेली नाही. कामगारांशी चर्चा करायलाही मालक किंवा प्रशासन तयार नाही. त्यामुळे कामगार व भांडवलदार यांच्यात तीव्र संघर्षाचा भडका उडण्याची शक्यता आहे.कारखाना प्रशासन कामगारांवर एवढेच अन्याय करून थांबलेला नाही तर सन २०१३-१४-१५ मध्ये कामगारांनी भांडवलदाराचा नफा वाढविण्यासाठी, उत्पादन वाढवि यासाठी जे अतिरिक्त श्रम केले, ओव्हर टाईम करून होणारे नुकसान भरून काढले त्या कामगारांना अजूनही ओव्हरटाईमचा पैसा देण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रशासन जुलमी धोरण राबवित आवाज उठविणाऱ्यांचा आवाजच दडपशाहीने दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.कामगारांना बेकायदेशिरपणे कामावरून काढले जात आहे. कामगारांना दर महिन्याला त्यांच्या हक्काचे वेतन मिळणे गरजेचे आहे. कारण त्यांचेवरच मुलांच्या गरजा, कुटुंबाच्या व अन्य कामाच्या गरजा भागविल्या जातात. ते मासिक वेतनही वेळेवर दिले जात नाही. दोन तीन महिने वेतनच दिले जात नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आहे. कारखाना प्रशासन कंपनी तोट्यात असल्याचे कारण त्यासाठी देत असली तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. कारखान्यात केवळ ८३ मजुरांच्या भरवशावर ५०० कामगारांचे काम करवून घेत असताना फक्त किमान वेतन देत आहे. कामगार आयुक्तांकडे वारंवार प्रश्न लावूनही न्याय मिळवून दिला जात नाही. कामगार आयुक्तांचा धाक संपल्यासारखी अवस्था असून वरिष्ठांनी वेळीच दाखल घेऊन न्याय देण्याची गरज आहे. (वार्ताहर)