शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीसाठी मजुरांची बाहेरगावाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:53 IST

दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत.

ठळक मुद्देपरगावात मिळते अधिक मजुरी : शेतमालकाला मजुरांसाठी करावी लागते वाहनांची व्यवस्था

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. वाहनांद्वारे मजुरांची सध्या आयात-नियात सुरू असून यात शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे.जिल्ह्यात भात रोवणीच्या कामाला जोमाने सुरूवात झाली आहे. शेतशिवार मजुरांनी फुलले आहे. परंतु गावातील मजुर गावातील शेतात राबायला तयार नाही. ते बाहेरगावी अधिक मजुरीच्या आशेने जात असल्याने गावातील शेतकऱ्यांना बाहेरगावारून मजुरांची आयात करावी लागत आहे. पालांदूर परिसरात सध्या किटाडी, चिखली, सानगाव, सायगाव, खराशी, दिघोरी येथून मजूर आणावे लागत आहे. खाजगी वाहनातून या मजुरांना आपल्या शेतात आणले जाते. काही वाहन चालकच या मजुरांचे ठेकेदार झाले आहेत.वीस ते तीस रूपये प्रती मजूर भाडे घेवून शेतापर्यंत त्यांना सोडल्या जात आहे. २०० ते ३०० रूपये मजुरी द्यावी लागते. उलट गावातील मजुर बाहेरगावी जात असल्याने दिसून येते. पालांदूर गावातील मजूर लाखनी परिसरात रोवणीसाठी जातात. तर पालांदूरमध्ये बाहेरगावचे मजूर येत आहे. मजुरांच्या या पळवापळवीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गावात साधारणत: शंभर ते १५० रूपये मजुरी मिळते. परंतु तेच मजूर बाहेरगावी गेले तर २०० ते ३०० रूपये मजुरी मिळते. याच आशेने अनेक महिला खाजगी वाहनांमध्ये दाटीवाटीने बसून दोन पैसे अधिक मिळतील म्हणून बाहेरगावी जाताना दिसत आहे.पऱ्हे झाले दीड महिन्याचेधान रोवणीसाठी शेतकºयांनी नर्सरीत टाकलेले पºहे आता ४० ते ४५ दिवसाचे झाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने रोवणी खोळंबली होती. परिणामी नर्सरीतच पऱ्हे वाढले आहे. धानाचा हंगाम यंदा उशिरा होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या २५ टक्केच्या आसपास रोवणी झाली असून मजूर टंचाईने रोवणी करणे कठीण जात आहे. मजूर मिळविण्यासाठी शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. अधिक पैशाचे आमिष देवूनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे. यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांवर निसर्ग रूसला असून आता मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती