शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीसाठी मजुरांची बाहेरगावाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:53 IST

दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत.

ठळक मुद्देपरगावात मिळते अधिक मजुरी : शेतमालकाला मजुरांसाठी करावी लागते वाहनांची व्यवस्था

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. वाहनांद्वारे मजुरांची सध्या आयात-नियात सुरू असून यात शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे.जिल्ह्यात भात रोवणीच्या कामाला जोमाने सुरूवात झाली आहे. शेतशिवार मजुरांनी फुलले आहे. परंतु गावातील मजुर गावातील शेतात राबायला तयार नाही. ते बाहेरगावी अधिक मजुरीच्या आशेने जात असल्याने गावातील शेतकऱ्यांना बाहेरगावारून मजुरांची आयात करावी लागत आहे. पालांदूर परिसरात सध्या किटाडी, चिखली, सानगाव, सायगाव, खराशी, दिघोरी येथून मजूर आणावे लागत आहे. खाजगी वाहनातून या मजुरांना आपल्या शेतात आणले जाते. काही वाहन चालकच या मजुरांचे ठेकेदार झाले आहेत.वीस ते तीस रूपये प्रती मजूर भाडे घेवून शेतापर्यंत त्यांना सोडल्या जात आहे. २०० ते ३०० रूपये मजुरी द्यावी लागते. उलट गावातील मजुर बाहेरगावी जात असल्याने दिसून येते. पालांदूर गावातील मजूर लाखनी परिसरात रोवणीसाठी जातात. तर पालांदूरमध्ये बाहेरगावचे मजूर येत आहे. मजुरांच्या या पळवापळवीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गावात साधारणत: शंभर ते १५० रूपये मजुरी मिळते. परंतु तेच मजूर बाहेरगावी गेले तर २०० ते ३०० रूपये मजुरी मिळते. याच आशेने अनेक महिला खाजगी वाहनांमध्ये दाटीवाटीने बसून दोन पैसे अधिक मिळतील म्हणून बाहेरगावी जाताना दिसत आहे.पऱ्हे झाले दीड महिन्याचेधान रोवणीसाठी शेतकºयांनी नर्सरीत टाकलेले पºहे आता ४० ते ४५ दिवसाचे झाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने रोवणी खोळंबली होती. परिणामी नर्सरीतच पऱ्हे वाढले आहे. धानाचा हंगाम यंदा उशिरा होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या २५ टक्केच्या आसपास रोवणी झाली असून मजूर टंचाईने रोवणी करणे कठीण जात आहे. मजूर मिळविण्यासाठी शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. अधिक पैशाचे आमिष देवूनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे. यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांवर निसर्ग रूसला असून आता मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती