शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

रोवणीसाठी मजुरांची बाहेरगावाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:53 IST

दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत.

ठळक मुद्देपरगावात मिळते अधिक मजुरी : शेतमालकाला मजुरांसाठी करावी लागते वाहनांची व्यवस्था

मुखरू बागडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : दमदार पावसाच्या आगमनानंतर रखडलेल्या रोवणीला जिल्ह्यात वेग आला आहे. मात्र मजुरांच्या टंचाईने शेतकरी हैराण झाला आहे. गावातील मजुर गावातील शेतात रोवणीसाठी यायला तयार नाही. अधिक मजुरीच्या आशेने गावातील मजूर परगावात धाव घेत आहेत. वाहनांद्वारे मजुरांची सध्या आयात-नियात सुरू असून यात शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पिचला जात आहे.जिल्ह्यात भात रोवणीच्या कामाला जोमाने सुरूवात झाली आहे. शेतशिवार मजुरांनी फुलले आहे. परंतु गावातील मजुर गावातील शेतात राबायला तयार नाही. ते बाहेरगावी अधिक मजुरीच्या आशेने जात असल्याने गावातील शेतकऱ्यांना बाहेरगावारून मजुरांची आयात करावी लागत आहे. पालांदूर परिसरात सध्या किटाडी, चिखली, सानगाव, सायगाव, खराशी, दिघोरी येथून मजूर आणावे लागत आहे. खाजगी वाहनातून या मजुरांना आपल्या शेतात आणले जाते. काही वाहन चालकच या मजुरांचे ठेकेदार झाले आहेत.वीस ते तीस रूपये प्रती मजूर भाडे घेवून शेतापर्यंत त्यांना सोडल्या जात आहे. २०० ते ३०० रूपये मजुरी द्यावी लागते. उलट गावातील मजुर बाहेरगावी जात असल्याने दिसून येते. पालांदूर गावातील मजूर लाखनी परिसरात रोवणीसाठी जातात. तर पालांदूरमध्ये बाहेरगावचे मजूर येत आहे. मजुरांच्या या पळवापळवीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. गावात साधारणत: शंभर ते १५० रूपये मजुरी मिळते. परंतु तेच मजूर बाहेरगावी गेले तर २०० ते ३०० रूपये मजुरी मिळते. याच आशेने अनेक महिला खाजगी वाहनांमध्ये दाटीवाटीने बसून दोन पैसे अधिक मिळतील म्हणून बाहेरगावी जाताना दिसत आहे.पऱ्हे झाले दीड महिन्याचेधान रोवणीसाठी शेतकºयांनी नर्सरीत टाकलेले पºहे आता ४० ते ४५ दिवसाचे झाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने रोवणी खोळंबली होती. परिणामी नर्सरीतच पऱ्हे वाढले आहे. धानाचा हंगाम यंदा उशिरा होत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या २५ टक्केच्या आसपास रोवणी झाली असून मजूर टंचाईने रोवणी करणे कठीण जात आहे. मजूर मिळविण्यासाठी शेतकरी गावोगाव भटकंती करीत आहे. अधिक पैशाचे आमिष देवूनही मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे. यंदा सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांवर निसर्ग रूसला असून आता मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती