शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून ...

अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून कबड्डी या खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक विकास करायचा असेल तर नियमितपणे व्यायाम आणि मैदानी खेळ हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांनी केले. अड्याळ येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप तथा जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ, स्वरक्षण टीम तसेच समस्त ग्रामवासी, अड्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवस रात्रकालीन दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या संख्येने व उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षण राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र हजारे, सरपंच जयश्री कुंभलकर, कवलेवाडाचे माजी सरपंच मोहन घोगरे, मुख्याध्यापक अनिल हरडे, महेश कुंभलकर, राजू वंजारी, अतुल मुलकलवार, अमोल उराडे, आशिक नैताम व मंडळी उपस्थित होते. अड्याळ गावात दरवर्षी कबड्डीचा सामना रंगायचा आणि ते सामना पाहायला अड्याळ आणि परिसरातील ग्रामवासी मोठ्या संख्येने येत असतात. पण ब्रेक झाल्यानंतर आता पुन्हा हा सामना आयोजकांनी आयोजित केल्याने युवकांना व कबड्डी खेळाडू यांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत शृंगारपवार यांनी व्यक्त केले. अड्याळमध्ये दोन दिवस रात्रकालीन होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक कबड्डी खेळाडूंनी आपल्या टीमची नोंदणी केल्यामुळे येथील सामने मनोरंजक होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्याची माहिती आहे. कबड्डी सामना पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळते. आता यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते कोण ठरतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Attachments area