शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

शारीरिक विकासासाठी मैदानी खेळ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून ...

अड्याळ : मातीचा खेळ महाराष्ट्रात रूतला, रूजला पाहिजे. खऱ्या अर्थाने अंगाला माती लागल्याशिवाय खेळ होऊ शकत नाही. म्हणून कबड्डी या खेळाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शारीरिक विकास करायचा असेल तर नियमितपणे व्यायाम आणि मैदानी खेळ हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांनी केले. अड्याळ येथे रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सर्पमित्र फ्रेंड्स ग्रुप तथा जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ, स्वरक्षण टीम तसेच समस्त ग्रामवासी, अड्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवस रात्रकालीन दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या संख्येने व उत्साहात पार पडले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी शिक्षण राज्यमंत्री विलासराव शृंगारपवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेंद्र हजारे, सरपंच जयश्री कुंभलकर, कवलेवाडाचे माजी सरपंच मोहन घोगरे, मुख्याध्यापक अनिल हरडे, महेश कुंभलकर, राजू वंजारी, अतुल मुलकलवार, अमोल उराडे, आशिक नैताम व मंडळी उपस्थित होते. अड्याळ गावात दरवर्षी कबड्डीचा सामना रंगायचा आणि ते सामना पाहायला अड्याळ आणि परिसरातील ग्रामवासी मोठ्या संख्येने येत असतात. पण ब्रेक झाल्यानंतर आता पुन्हा हा सामना आयोजकांनी आयोजित केल्याने युवकांना व कबड्डी खेळाडू यांना एक नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे मत शृंगारपवार यांनी व्यक्त केले. अड्याळमध्ये दोन दिवस रात्रकालीन होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक कबड्डी खेळाडूंनी आपल्या टीमची नोंदणी केल्यामुळे येथील सामने मनोरंजक होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्याची माहिती आहे. कबड्डी सामना पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळते. आता यामध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते कोण ठरतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Attachments area