शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

धान पिकावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST

वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा परिणाम : शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे धान पीकावर तुडतुडा रोगाचा उपद्रव वाढत असून शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. वातावरणात हवेची आर्द्रता ७५ ते ८० टक्केच्या जवळपास असल्याने रोगाचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी नियंत्रणात्मक उपाययोजना त्वरित करावीे, असे भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावर्षी सुरुवातीला दोन महिने पावसाचा खंड आणि नंतर सातत्याने संततधार पाऊस पडत असल्याने वातावरणात आमुलाग्र बदल झाला आहे. त्याचा परिणाम धान पिकावर होत असून अनेक रोगकिडींसह तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढत असून यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बांध्यातील साठलेले पाणी काढून देवून सकाळच्या सत्रामध्ये उन्हापूर्वी फवारणी करावी.फवारणीपूर्वी धानाच्या बुंद्याजवळ बारिक निरीक्षण करुन ५ ते १० तुडतुडे आढळल्यास नुकसानीची पातळी वाढली आहे. हे समजून त्यासाठी प्रथम मॅटारायझिंग अ‍ॅनिसोपडी जैविक बुरशीनाशक १ किलो प्रति एकर या प्रमाणात बांध्यामध्ये वापरुन फवारणी करावी. रासायनिक शिफारशीप्रमाणे तुडतुडा नियंत्रणासाठी ईमिडाक्लोरोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली किंवा ट्रायझोफास ४० एलजी प्रवाही २० मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करतांना धानाच्या बुंध्यापर्यंत जाईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. नुकसान झालेल्या शेतशिवाराची पाहणी दरम्यान तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, मंडळ अधिकारी दिपक अहेर, पर्यवेक्षक आनंद मोहतुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.ओळख तुडतुड्याचीतुडतुड्याचे हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, पांढºया पाढीचे तुडतुडे अशा तीन प्रकारचा किडांचा जीवनक्रम असून त्यामध्ये हिरवे तुडतुडे पाण्यातील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. तर तपकिरी तुडतुडे प्रौढ झाल्याने झाड्यांच्या बुंध्यामधून सतत रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाडे निस्तेज होतात तर पांढºया पाढीच्या तुडतुड्याने मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामुळे चुडाच्या बाहेरील पाने करपलेली दिसतात. यावर प्रतिबंधात्मक उपाय वेळीच करणे गरजेचे आहे. यामध्ये धान रोपाच्या लावणीपासून पट्टा पध्दत करणे गरजेचे आहे.

टॅग्स :agricultureशेती