शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१० बंद रेतीघाटातून नियमबाह्य रेतीचा उपसा

By admin | Updated: September 9, 2016 01:38 IST

तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा, बावनथडी नद्या वाहतात. उच्च दर्जाची रेती नदीपत्रात असून या रेतीचा प्रचंड मागणी शहरात आहे.

रस्त्यांची दुरवस्था : महसूल प्रशासनाने केला आठ रेतीघाटांचा लिलाव तुमसर : तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा, बावनथडी नद्या वाहतात. उच्च दर्जाची रेती नदीपत्रात असून या रेतीचा प्रचंड मागणी शहरात आहे. तुमसर तालुक्यात १८ रेतीघाटापैकी आठ रेतीघाटांचा राज्य शासनाने लिलाव केला. इतर १० रेतीघाट केवळ कागदोपत्री बंद आहेत. या रेतीघाटातून रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासन थातुरमातूर कारवाई करून मोकळे होतात. परिणामी रस्त्यांची दूरावस्था झाली आहे.वैनगंगा तथा बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची पांढरी शुभ्र, पिवळसर दाणेदार रेती मुबलक आहे. प्रचंड रेती साठ्यामुळे रेती कंत्राटदार तालुक्यातील रेतीघाट खरेदी करतात. या रेतीची उपराजधानी नागपूर ही मोठी बाजारपेठ आहे. महसूल विभागाने सन २०१६ या वर्षात आठ रेती घाटांचा लिलाव केला. कोट्यवधींना ही रेतीघाट खरेदी करण्यात आले. यात चारगाव, बाम्हणी, तामसवाडी सि., मांडवी, वारपिंडकेपार, आष्टी, लोभी व देवनारा येथील रेतीघाटांचा लिलाव झाला. येथील रेतीघाटात रेतीचा प्रचंड साठा आहे तर उमरवाडा, सुकळी दे, पांजरा, बपेरा, घानोड, ढोरवाडा, माडगी, चांदमारा, सक्करदरा या रेतीघाटांचा लिलाव झाला नाही. ही रेतीघाट अयोग्य मानली गेली. घाटात रेतीसाठा उपलब्ध नाही.रेतीघाट लिलाव झाले नाही त्या रेतीघाटातून मात्र नियमित मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती आहे. महसूल प्रशासन कारवाई करणे, पुन्हा उपसा सुरू होतो. ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांची कारवाई येथे संथगतीने दिसते. क्षमतेपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये भरली जाते. यामुळे रस्त्यंची अगदी चाळण झाली आहे. रेतीघाट असलेली गाव रस्ते खड्डेमय झाली आहेत. अनेक आंदोलने होतात, परंतु परिस्थिती मात्र जैसे थेच दिसून येत आहे. रेती उपस्याचे अतिशय कडक नियम आहे, परंतु नियमबाह्य रेती उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन येथे हतबल झालेले दिसते.नदी पात्रात सीमांकन केले जाते, परंतु दररोज सीमांकन पाहण्याकरिता महसूल अधिकारी तथा कर्मचारी जाऊच शकत नाही. सीमा कुठून कुठपर्यंत आहेत हे सर्वसामान्यांना कळत नाही. नदीपात्र गावापासून दूर असते. कंत्राटदार हे वजनदार व श्रीमंत व्यक्ती असतात त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी तक्रार देण्याकरिता ग्रामस्थ पुढे येत नाही. महसूल प्रशासनाचे अधिकारीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. (तालुका प्रतिनिधी)लाखनीत ६ घाटातून वाहतूक सुरूलाखनी : तालुक्यातील मऱ्हेगाव, पाथरी, भुगाव, नरव्हा, पळसगाव येथील रेतीघाट सुरू आहेत. त्यांची ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत मुदत आहे. मिरेगाव रेतीघाटाला गिट्टी उत्खननाची परवानगी ६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत आहे. आज तहसिलदार राजीव शक्करवार यांनी मिरेगाव रेतीघाटातून रेतीचे उत्खनन व अवैध वाहतुक करीत असताना ९ ट्रॅक्टर ताब्यात घेतले असून ट्रॅक्टर मालकावर कारवाही केली आहे.तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन केले जाते. रेतीचे रॉयल्टी व नियमानुसार वाहतुकीचे तहसिल कार्यालयाचे व पोलीस विभागाचे लक्ष असते. गावकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे मऱ्हेगाव, भुगाव, नरव्हा येथील रस्ते खराब झाले आहेत. लोकांना त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी व पहाटेला अवैध वाहतुक चालत असते याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असतात. (तालुका प्रतिनिधी)