शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य

By admin | Updated: October 11, 2015 02:01 IST

गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे.

आंधळगाव : गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. विकासासाठी सर्वाेपरी मदत करणार असून हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांनी केले.तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत भवनात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, क्षेत्रातील विविध भागात रस्ते, पाणी, घरकुल, विधवा पेंशन, श्रावण बाळ, निराधार पेंशन, युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षण व आरोग्य संबंधी समस्या आहेत. क्षेत्रातील गरजू जनतेपर्यंत निस्वार्थ भावनेने मुलभूत गरजा पोहचविणे आहे. त्या करीता आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व संबंधीत यंत्रणेसोबत चर्चा सुरू आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच उषा धार्मिक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रामरतन खोकले, सचिव अशोक सार्वे, सदस्य कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, वसुंधरा धार्मिक, रमेश कुंभारे, संजय मते, हुरेराबी पठाण, मधुकर कारेमोरे, बालचंद पाटील, हरिराम माटे गुरूजी, रामेश्वर हटवार, शालिक वखाडे, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाठी सदानंद आकरे, गजभिये, गोपीचंद लांडगे, जगदीश कऱ्हाडे यांनी सहकार्य केले.संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी केले. (वार्ताहर)