शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य

By admin | Updated: October 11, 2015 02:01 IST

गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे.

आंधळगाव : गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. विकासासाठी सर्वाेपरी मदत करणार असून हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांनी केले.तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत भवनात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, क्षेत्रातील विविध भागात रस्ते, पाणी, घरकुल, विधवा पेंशन, श्रावण बाळ, निराधार पेंशन, युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षण व आरोग्य संबंधी समस्या आहेत. क्षेत्रातील गरजू जनतेपर्यंत निस्वार्थ भावनेने मुलभूत गरजा पोहचविणे आहे. त्या करीता आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व संबंधीत यंत्रणेसोबत चर्चा सुरू आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच उषा धार्मिक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रामरतन खोकले, सचिव अशोक सार्वे, सदस्य कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, वसुंधरा धार्मिक, रमेश कुंभारे, संजय मते, हुरेराबी पठाण, मधुकर कारेमोरे, बालचंद पाटील, हरिराम माटे गुरूजी, रामेश्वर हटवार, शालिक वखाडे, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाठी सदानंद आकरे, गजभिये, गोपीचंद लांडगे, जगदीश कऱ्हाडे यांनी सहकार्य केले.संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी केले. (वार्ताहर)