शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

क्षेत्राचा विकास हेच आपले कर्तव्य

By admin | Updated: October 11, 2015 02:01 IST

गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे.

आंधळगाव : गावातील तंटे गावात सोडविण्यात यावे. गावाच्या विकासासाठी हे महत्वपुर्ण आहे. विकासासाठी सर्वाेपरी मदत करणार असून हेच माझे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे यांनी केले.तंटामुक्त गाव समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत भवनात पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, क्षेत्रातील विविध भागात रस्ते, पाणी, घरकुल, विधवा पेंशन, श्रावण बाळ, निराधार पेंशन, युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण, शिक्षण व आरोग्य संबंधी समस्या आहेत. क्षेत्रातील गरजू जनतेपर्यंत निस्वार्थ भावनेने मुलभूत गरजा पोहचविणे आहे. त्या करीता आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व संबंधीत यंत्रणेसोबत चर्चा सुरू आहेत. अध्यक्षस्थानी सरपंच उषा धार्मिक तर, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच रामरतन खोकले, सचिव अशोक सार्वे, सदस्य कविता बुराडे, निलकमल गोंडाणे, वसुंधरा धार्मिक, रमेश कुंभारे, संजय मते, हुरेराबी पठाण, मधुकर कारेमोरे, बालचंद पाटील, हरिराम माटे गुरूजी, रामेश्वर हटवार, शालिक वखाडे, नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उमेश पाटील उपस्थित होते. यावेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी जिल्हा परिषद सदस्य राणी ढेंगे, पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाठी सदानंद आकरे, गजभिये, गोपीचंद लांडगे, जगदीश कऱ्हाडे यांनी सहकार्य केले.संचालन तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बुराडे यांनी केले. (वार्ताहर)