शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार

By admin | Updated: March 30, 2016 00:56 IST

येत्या तीन दिवसात म्हाडा वसाहतीत दूषित पाणी पुरवठाबाबत समाधान झाले नाही तर, तेच दूषित पाणी मुख्याधिकाऱ्यांना पाजण्यात येईल.

महेंद्र निंबार्ते यांचा इशारा : म्हाडा कॉलनीत दूषित पाणी पुरवठा प्रकरण, महिनाभरापासून नागरिकांचे आरोग्य धोक्यातभंडारा : येत्या तीन दिवसात म्हाडा वसाहतीत दूषित पाणी पुरवठाबाबत समाधान झाले नाही तर, तेच दूषित पाणी मुख्याधिकाऱ्यांना पाजण्यात येईल. या प्रकरणाची भंडारा नगर परिषदेने दखल घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हाडा कॉलनीतील जनता आंदोलन करेल, असा इशारा नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी दिला आहे.शहरातील नागरिकांचे दुषित पाणी पुरवठ्यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचे अनेक प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. म्हाडा कॉलोनीतील नळाला दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांच्याकडे नागरिकांनी केली. त्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली असता तत्थ्य आढळून आले. शहरातील पाणी पुरवठ्याकरिता पहिल्यांदा १,९०० मध्ये म्हणजे ११६ वर्षी पाण्याच्या टाकीचे निर्माण करण्यात आले. शहराचे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १९८५ ला दुसरी तर १९९६ ला तिसरी पाण्याची टाकी बनविण्यात आली. भंडारा शहराची लोकसंख्या दीड लाखाच्या घरात आहे. दोन्ही टाक्यामुळे नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नाही. अनेक वेळा दूषित पाण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. नाग नदीच्या सांडपाण्यामुळे वैनगंगेचे पाणी अधिक दूषित झाले आहे. या माध्यमातून नागपूर महानगर पालिकेने नागनदी जलशुध्दीकरण प्रकल्प सुरु करावे असे आवाहन निंबार्ते यांनी केले होते. या समस्येवर तोडगा निघाला नाही तर तेच दूषित पाणी मुख्याधिकाऱ्यांना पाजण्यात येईल. या प्रकरणाची गंभीर दखल भंडारा नगर परिषदेने घ्यावी. अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. म्हाडा कॉलनीतील जनता आंदोलन करेल, असा गर्भित इशाराही प्रकाश नवखरे, भरणे, चकधारे, मुटकुरे, खोटेले, वाघाये, कोल्हे, गोमासे, सूर्यवंशी, बावणे, सरोदे, शेख, महादेव वंजारी, प्रफुल झंझाड, वैरागडे, सोरखे, वनवे यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)