शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आयुध निर्माणी प्रशासनाने हटविले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:53 IST

ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.

ठळक मुद्देठाणा ते जवाहरनगर : सुरक्षेच्या कारणांवरुन अनेकांनी काढले स्वमर्जीने अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.देशात अग्रगण्य समजली जाणारी व देशाला युध्दासाठी लागणारी कच्ची सामुग्री येथील आयुध निर्माणी भंडारा येथे तयार करण्यात येतो. आयुध कारखाना ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापर्यंत आयुध निर्माणी रस्त्याच्या दुतर्फा शंभरफुट जागा आयुध निर्माणी मालकीची आहे. दोन्ही बाजुला तीन ते चार फुट उंच सिमांकन दगड लावलेला आहे. या जागेवर कच्चे व पुर्ण पक्के बांधकाम खासगी व्यक्तींना करण्यास मनाई आहे.मात्र जवाहरनगर वसाहत ते ठाणा राष्ट्रीय महामार्गपर्यंत पानटपरी धारकांनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले. काहीनी तर चक्क झोपडी तयार करुन दुसऱ्यांना जास्त किरायाने आपली पानटपरी व झोपडी दिलेली होती. या झोपडीमुळे आयुध निर्माणीतील भविष्यात असामाजिक तत्वाची व्यक्ती समुहापासून धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली होती. देशातील परिस्थिती पाहता आयुध निर्माणी प्रशासनाने योग्य पाऊल उचलून अनधिकृतरित्या पानटपरी व झोपडी हटविण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारला प्रशासनाकडून कारवाई होण्यापुर्वीच अनधिकृत पानटपरी धारकांनी सावधगीरी बाळगून आयुध निर्माणी जागेवरून अतिक्रमण हटविले. आयुधी प्रशासन मंगळवारला सकाळी ११.३० वाजता सुमारास ठाणा पेट्रोलपंप टी पॉर्इंट येथे आले असता रस्त्यालगत असलेले चार फुट उंचीचे सिमेंटचे पाईप रस्त्याच्या दूर केले. हे सिमेंट पाईप १० वर्षापासून याच ठिकाणी रस्त्यालगत पडून होते. यामुळेच ठाणा येथील माजी सरपंच शिवदास उरकुडे यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन अपघात झाले. प्रशासनाने येथील पाईप व अनधिकृत झोपटी पानटपरी हटविल्याने नागरिकांनी आयुध प्रशासनाचे आभार मानले. मात्र आयुध प्रशासनाची परवानगी घेऊन आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह आयुध निर्माणीच्या नियमानुसार करणाऱ्या पानटपरी, अल्पोपहार विके्रत्यांना नाहक बळी पडावे लागले.