शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

आयुध निर्माणी प्रशासनाने हटविले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:53 IST

ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.

ठळक मुद्देठाणा ते जवाहरनगर : सुरक्षेच्या कारणांवरुन अनेकांनी काढले स्वमर्जीने अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा ते आयुध निर्माणी जवाहरनगरपर्यंत असलेल्या रस्त्यालगत पानटपरी धारकांनी अतिक्रमण केल्याने आयुध निर्माणीला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उद्देशाने आयुध निर्माणी प्रशासनाने रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण निर्मूलन केले. या मोहिमेचे ठाणा-परसोडी वासियांनी आयुध निर्माणी प्रशासनाचे आभार मानले.देशात अग्रगण्य समजली जाणारी व देशाला युध्दासाठी लागणारी कच्ची सामुग्री येथील आयुध निर्माणी भंडारा येथे तयार करण्यात येतो. आयुध कारखाना ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापर्यंत आयुध निर्माणी रस्त्याच्या दुतर्फा शंभरफुट जागा आयुध निर्माणी मालकीची आहे. दोन्ही बाजुला तीन ते चार फुट उंच सिमांकन दगड लावलेला आहे. या जागेवर कच्चे व पुर्ण पक्के बांधकाम खासगी व्यक्तींना करण्यास मनाई आहे.मात्र जवाहरनगर वसाहत ते ठाणा राष्ट्रीय महामार्गपर्यंत पानटपरी धारकांनी अवैधरित्या अतिक्रमण केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले. काहीनी तर चक्क झोपडी तयार करुन दुसऱ्यांना जास्त किरायाने आपली पानटपरी व झोपडी दिलेली होती. या झोपडीमुळे आयुध निर्माणीतील भविष्यात असामाजिक तत्वाची व्यक्ती समुहापासून धोका होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली होती. देशातील परिस्थिती पाहता आयुध निर्माणी प्रशासनाने योग्य पाऊल उचलून अनधिकृतरित्या पानटपरी व झोपडी हटविण्याची मोहीम सुरू केली. मंगळवारला प्रशासनाकडून कारवाई होण्यापुर्वीच अनधिकृत पानटपरी धारकांनी सावधगीरी बाळगून आयुध निर्माणी जागेवरून अतिक्रमण हटविले. आयुधी प्रशासन मंगळवारला सकाळी ११.३० वाजता सुमारास ठाणा पेट्रोलपंप टी पॉर्इंट येथे आले असता रस्त्यालगत असलेले चार फुट उंचीचे सिमेंटचे पाईप रस्त्याच्या दूर केले. हे सिमेंट पाईप १० वर्षापासून याच ठिकाणी रस्त्यालगत पडून होते. यामुळेच ठाणा येथील माजी सरपंच शिवदास उरकुडे यांच्या मुलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन अपघात झाले. प्रशासनाने येथील पाईप व अनधिकृत झोपटी पानटपरी हटविल्याने नागरिकांनी आयुध प्रशासनाचे आभार मानले. मात्र आयुध प्रशासनाची परवानगी घेऊन आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह आयुध निर्माणीच्या नियमानुसार करणाऱ्या पानटपरी, अल्पोपहार विके्रत्यांना नाहक बळी पडावे लागले.