शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

कारवाई टाळण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचा बदलीसाठी खटाटोप

By admin | Updated: September 17, 2016 01:01 IST

वनकार्यालयातील सुमारे २०० वृक्षांची परवानगीविना तोड करण्यात आली. याप्रकरणावर येथील उपवनसंरक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही.

प्रकरण वनविभागातील वृक्षतोडीचे : दोषी असतानाही प्रकरणावर घातले जातेय पांघरूण, वरिष्ठांच्या आदेशाकडे सर्वांच्या नजराप्रशांत देसाई  भंडारावनकार्यालयातील सुमारे २०० वृक्षांची परवानगीविना तोड करण्यात आली. याप्रकरणावर येथील उपवनसंरक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी मेश्राम यांनी वरिष्ठांच्या माध्यमातून बदलीचा आटापिटा चालविल्याचे समोर येत आहे.भंडारा उपवनसंरक्षक कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय परिसरात असलेले सागवान व अन्य प्रकारच्या वृक्षांची तोड सुमारे १० महिन्यापुर्वी करण्यात आली. या वृक्षतोडीसाठी नगरपालिकेकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. मात्र पालिकेने वृक्षतोडीसाठी परवानगी दिलेली नसतानाही वनपरिक्षेत्रधिकारी संजय मेश्राम यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करताना वृक्षांची कत्तल केली. यात सुमारे ८० साग झाडांची तर १२९ आडजात झाडांची तोड करण्यात आली. सदर प्रकरणाचे गांभीर्य मागील काही दिवसापासून ्न‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत आहे. मात्र अशा गंभीर प्रकरणात येथील उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. याप्रकरणी प्रथमदर्शनी वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेश्राम हे दोषी आढळून येत आहे. वृक्ष कटाईचे परवानगी पालिकेने दिलेली नसतानाही त्यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून ही तोड केल्याचे स्पष्ट होत आहे.सर्व सामान्य नागरिकाने एखादे सागाचे वृक्ष तोडल्यास त्याच्यावर तात्काळ वनकायद्यांतर्गत कारवाई करण्यात येते. मात्र येथे वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी शंभरावर वृक्षांची तोड केली असल्याचे दिसत असतानाही त्यांना मात्र त्या अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविला आहे. अशात भंडारा येथील वनाधिकाऱ्यांनीच वृक्षांची तोड केल्याचे प्रकरण समोर आले असतानाही त्यांच्यावर कारवाईला विलंब होत आहे. त्यामुळे वृक्षतोडीबाबत येथील वनाधिकारी गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. यात मेश्राम यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आता सर्वच स्तरातून होत आहे. दरम्यान कारवाई होईल या भितीने वनपरिक्षेत्राधिकारी मेश्राम यांनी त्यांच्या वरिष्ठांना गळ घातली असून त्यांची भंडारा येथून तातडीने बदली करावी, अशी मागणी केल्यानंतर बदलीसाठी त्यांनी खटाटोप सुरू केल्याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशिर्वाद असल्याची प्रतिक्रिया मेश्राम यांनी ‘लोकमत’ला दिली.