शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार अभ्यासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:37 IST

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता....

नाना पटोले : विर्शी येथे डिजिटल शाळा कार्यशाळा साकोली : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता शासनाने डिजिटल शाळेचे धोरण अवलंबिले आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटलायझेशन करण्याचे आमचे ध्येय असून शेतकरी, शेतमजूर यांच्या गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याचे आमचा मानस असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.साकोली तालुक्यातील विर्शी येथे डिजिटल शाळेविषयी कार्यशाळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राजेश काशिवार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, मुख्य कार्यपालन अधिकारी शरद अहिरे, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, रेखा वासनिक, तहसिलदार अनिल खडतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एम.संखे, खंड विकास अधिकारी श्री. तडस, विशीर्चे सरपंच डॉ. निमराज कापगते, पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते.यावेळी नाना पटोले म्हणाले, या परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठया प्रमाणात असून त्यांना आपल्या मुलांच्या दजेर्दार शिक्षणावर निधी खर्च करणे जड जाते. याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात डिजीटल शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून डिजीटल योजनावर २५ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्वत: ग्रामसभेद्वारे अधिक निधीची मागणी करु शकते,, असे खासदार पटोले यांनी सांगितले. भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत ७६७ गावांपैकी ४२० शाळेत डिजीटल प्रणाली सुरु झालेली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना डिजीटल प्रणालीचे शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी घडवावे, असे सांगून नाना पटोले म्हणाले, पोलीस विभागाने जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे सुरू करून चांगल्या उपक्रमाला चालना दिली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कौतुक केले.यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, या क्षेत्रातील ७१ टक्के शाळांचे डिजीटलायझेशन झाले आहे. या प्रणालीमुळे प्रगतीशिल भावी पीढी घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एमपीएसी व युपीएससी स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी शरद अहिरे, उमेश वर्मा, पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी डिजीटल शिक्षण प्रणालीविषयी मार्गदर्शन केले. या निमित्ताने डिजीटल शाळा निर्मितीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.एनएमएमएस परीक्षेत जिल्हयात प्रथम श्रेणीत पात्र ठरलेले विद्यार्थी मोनीष राजेंद्र पटले व श्रेणीत पात्र ठरलेले प्रशीक विनेश गणवीर यांना भेट वस्तु देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संपूर्ण विर्शी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यशाळेत सुशील कोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक विर्शीचे सरपंच डॉ. निमराज कापगते यांनी केले. संचालन राकेश झोडे व टी. आय पटले यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)