शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मिळणार अभ्यासाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 00:37 IST

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता....

नाना पटोले : विर्शी येथे डिजिटल शाळा कार्यशाळा साकोली : जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात लोक चळवळ निर्माण करण्याची गरज असून भावी पिढीला आधुनिक तंत्रज्ञानासह गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरिता शासनाने डिजिटल शाळेचे धोरण अवलंबिले आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक वर्ग डिजिटलायझेशन करण्याचे आमचे ध्येय असून शेतकरी, शेतमजूर यांच्या गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शिक्षणासाठी तयार करण्याचे आमचा मानस असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.साकोली तालुक्यातील विर्शी येथे डिजिटल शाळेविषयी कार्यशाळा व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राजेश काशिवार, अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, पोलीस अधीक्षक विनीता साहू, उपवनसंरक्षक उमेश वर्मा, मुख्य कार्यपालन अधिकारी शरद अहिरे, साकोलीचे उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, पंचायत समिती सभापती धनपाल उंदिरवाडे, उपसभापती लखन बर्वे, साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, रेखा वासनिक, तहसिलदार अनिल खडतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एम.संखे, खंड विकास अधिकारी श्री. तडस, विशीर्चे सरपंच डॉ. निमराज कापगते, पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते.यावेळी नाना पटोले म्हणाले, या परिसरात शेतकरी, शेतमजूर मोठया प्रमाणात असून त्यांना आपल्या मुलांच्या दजेर्दार शिक्षणावर निधी खर्च करणे जड जाते. याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात डिजीटल शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीच्या माध्यमातून डिजीटल योजनावर २५ टक्के निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्वत: ग्रामसभेद्वारे अधिक निधीची मागणी करु शकते,, असे खासदार पटोले यांनी सांगितले. भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत ७६७ गावांपैकी ४२० शाळेत डिजीटल प्रणाली सुरु झालेली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना डिजीटल प्रणालीचे शिक्षण देऊन गुणवंत विद्यार्थी घडवावे, असे सांगून नाना पटोले म्हणाले, पोलीस विभागाने जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे सुरू करून चांगल्या उपक्रमाला चालना दिली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कौतुक केले.यावेळी आमदार राजेश काशिवार म्हणाले, या क्षेत्रातील ७१ टक्के शाळांचे डिजीटलायझेशन झाले आहे. या प्रणालीमुळे प्रगतीशिल भावी पीढी घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचा लाभ घ्यावा. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एमपीएसी व युपीएससी स्पर्धात्मक परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी शरद अहिरे, उमेश वर्मा, पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी डिजीटल शिक्षण प्रणालीविषयी मार्गदर्शन केले. या निमित्ताने डिजीटल शाळा निर्मितीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.एनएमएमएस परीक्षेत जिल्हयात प्रथम श्रेणीत पात्र ठरलेले विद्यार्थी मोनीष राजेंद्र पटले व श्रेणीत पात्र ठरलेले प्रशीक विनेश गणवीर यांना भेट वस्तु देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमापूर्वी संपूर्ण विर्शी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यशाळेत सुशील कोरे यांनी प्रोजेक्टरद्वारे नागरिकांना व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक विर्शीचे सरपंच डॉ. निमराज कापगते यांनी केले. संचालन राकेश झोडे व टी. आय पटले यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, व परिसरातील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)