शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

मौल्यवान वृक्षांची खुलेआम कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. वैनगंगासह तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विपूल वनसंपदा आहे. याशिवाय नागझिरा अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प याशिवाय अनेक राखीव जंगल व जंगलव्याप्त वने आहेत. मात्र या वनातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तस्करांनी आपला मोर्चा वनाकडे वळविल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : वनांची सुरक्षाही धोक्यात, पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात मौल्यवान वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. या कत्तलीवर वनविभागाचे दुर्लक्ष असून संगणमतानेच हा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रक्षक भक्षक बनल्याचे चित्र असून जंगलांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे.पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. वैनगंगासह तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात विपूल वनसंपदा आहे. याशिवाय नागझिरा अभयारण्य, उमरेड-कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प याशिवाय अनेक राखीव जंगल व जंगलव्याप्त वने आहेत. मात्र या वनातून मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होत असल्याचे दिसून येत आहे. वैनगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तस्करांनी आपला मोर्चा वनाकडे वळविल्याचे दिसून येते. वृक्षकटाईच्या माध्यमातून लक्षावधींची उलाढाल दिसून येते.वनविभागाच्या रेकॉर्डनुसार नजर फेरल्यास खसऱ्याची अनेक प्रकरणात गौड बंगाल असल्याचे दिसून येईल. मात्र कुणी बोलायला तयार नाही. राखीव जंगलव्याप्त शिवारातून वृक्षांची कत्तली होण्याचे प्रमाण अधिक आहे. दुसरीकडे सरपणासाठी लाकडे गोळा करण्याच्या नावावरही तस्करांनी हैदोस घातला आहे. वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येत असली तरी त्या मानाने वृक्ष कटाईची मोहीम अधिक तीव्र असल्याचे जाणवते. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम अंतर्गत जिल्ह्यालाही मोठे उद्दिष्ट मिळाले होते. त्यात बहुतांशपणे रोपट्यांची लागवडही करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी किती रोपट्यांचे संगोपन झाले व किती जगले याचेही संशोधन होणे गरजेचे झाले आहे. वृक्ष संगोपनात किती कोटींचा खर्च झाला याची चौकशी होणेही गरजेचे आहे. किती झाडांचे संगोपन झाले आहे, याचीही माहिती उपलब्ध होईल.खसरा प्रकरणांची चौकशी गरजेचीपरवानगीने वृक्ष कापणी केल्यानंतर सदर खसºयात किती वृक्ष कापण्यात आली याची नोंद केली जाते. त्यात वृक्ष कटाईच्या जवळपास तीन ते पाच पटीने वृक्ष लागवड करावी, असा नियम आहे. मात्र हा नियम सर्रासपणे धाब्यावर बसविण्यात येतो. नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार हा अनेक वर्षांपासून सुरू आहे. परिणामी आजघडीला वृक्षकटाईमुळे जंगलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.वृक्ष कापणीनंतर लागवड होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल साधणार तरी कसा, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे. खसरा प्रकरणाची चौकशी केल्यास अनेक लहान-मोठे मासे गळाला लागू शकतात. मात्र कंत्राटदार व वनविभाग अधिकाऱ्यांच्या संगणमताने हा सर्व प्रकार होत असल्याने प्रकरण तिथेच दाबले जाते. परिणामी खसरा प्रकरणाची सर्वच वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत चौकशी होणे गरजेचे आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग