शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महापुरानंतर शेतात केवळ तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात.

ठळक मुद्देशेतशिवारात स्मशान शांतता : शेतजमीन गेली खरडून, पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पूर ओसरल्यानंतर आता भात शेतात केवळ वाळलेले तणस शिल्लक दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांत नैराश्य पसरले असून अद्यापही प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळाले नाही.वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात. दोन दिवस जरी पुराचे पाणी शेतात थांबले तरी धानपिकाला फारसा फरक पडत नाही. पीक वाळत नाही. मात्र यावर्षी पूर ओसरल्यानंतर शेतात वाळलेले तणसच दिसत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे कळायला मार्ग नाही.यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दोनदा पुराचा फटका बसला. हिरवेगार पीक नेस्तनाबूत झाले. शेतजमिन खरडून गेली. पहिल्या पुरानंतर आठवडाभराच्या अंतराने दुसरा पूर आला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. करडी परिसरात पुरामुळे २२ गावातील तीन हजार हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकरी शेतात जातात तेव्हा समोरील दृष्य पाहून डोळ्यात आसवांचा महापूर आल्याशिवाय राहत नाही. बी - बियाणे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. परंतु वैनगंगेच्या महापुराने सर्वकाही वाहून नेले. आता शासनाकडून सर्वेक्षण सुरु आहे. परंतु ठोस मदतीचे अद्यापही आश्वासन मिळाले नाही. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न असून घर संसार चालविण्यासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी २० हजाराची मदत जाहीर केली. राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही मदत शेतकºयांना मिळाली नाही. अनेक शेतकरी देशोधडीला लागले असून या शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशी मागणी आहे.महापुरात जिल्ह्यातील ४३ हजार व्यक्ती बाधितभंडारा : जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराचा १४४ गावांना फटका बसला असून त्यात ४३ हजार २८४ व्यक्ती बाधीत झाले आहेत. ४ हजार ७३६ घरे उद्ध्वस्त झाली असून ६७३ घरे पूर्णत: तर ४ हजार ६३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. महापुरात ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून एक जण जखमी झाला. ३२० पशूधन पुरात वाहून गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भंडारा तालुक्याला बसला. ४५ गावातील ५२०९ कुटुंब या महापुराच्या तडाख्यात सापडले. १३४१ घरे उद्ध्वस्त झाली असून त्यात ४११ घरे पूर्णत: तर ९३० घरे अंशत: बाधित झाली आहेत. ६९ गोठे महापुराच्या तडाख्यात सापडली असून २६३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

टॅग्स :floodपूर