शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

महापुरानंतर शेतात केवळ तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात.

ठळक मुद्देशेतशिवारात स्मशान शांतता : शेतजमीन गेली खरडून, पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पूर ओसरल्यानंतर आता भात शेतात केवळ वाळलेले तणस शिल्लक दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांत नैराश्य पसरले असून अद्यापही प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळाले नाही.वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात. दोन दिवस जरी पुराचे पाणी शेतात थांबले तरी धानपिकाला फारसा फरक पडत नाही. पीक वाळत नाही. मात्र यावर्षी पूर ओसरल्यानंतर शेतात वाळलेले तणसच दिसत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे कळायला मार्ग नाही.यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दोनदा पुराचा फटका बसला. हिरवेगार पीक नेस्तनाबूत झाले. शेतजमिन खरडून गेली. पहिल्या पुरानंतर आठवडाभराच्या अंतराने दुसरा पूर आला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. करडी परिसरात पुरामुळे २२ गावातील तीन हजार हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकरी शेतात जातात तेव्हा समोरील दृष्य पाहून डोळ्यात आसवांचा महापूर आल्याशिवाय राहत नाही. बी - बियाणे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. परंतु वैनगंगेच्या महापुराने सर्वकाही वाहून नेले. आता शासनाकडून सर्वेक्षण सुरु आहे. परंतु ठोस मदतीचे अद्यापही आश्वासन मिळाले नाही. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न असून घर संसार चालविण्यासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी २० हजाराची मदत जाहीर केली. राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही मदत शेतकºयांना मिळाली नाही. अनेक शेतकरी देशोधडीला लागले असून या शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशी मागणी आहे.महापुरात जिल्ह्यातील ४३ हजार व्यक्ती बाधितभंडारा : जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराचा १४४ गावांना फटका बसला असून त्यात ४३ हजार २८४ व्यक्ती बाधीत झाले आहेत. ४ हजार ७३६ घरे उद्ध्वस्त झाली असून ६७३ घरे पूर्णत: तर ४ हजार ६३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. महापुरात ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून एक जण जखमी झाला. ३२० पशूधन पुरात वाहून गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भंडारा तालुक्याला बसला. ४५ गावातील ५२०९ कुटुंब या महापुराच्या तडाख्यात सापडले. १३४१ घरे उद्ध्वस्त झाली असून त्यात ४११ घरे पूर्णत: तर ९३० घरे अंशत: बाधित झाली आहेत. ६९ गोठे महापुराच्या तडाख्यात सापडली असून २६३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

टॅग्स :floodपूर