शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

महापुरानंतर शेतात केवळ तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात.

ठळक मुद्देशेतशिवारात स्मशान शांतता : शेतजमीन गेली खरडून, पुराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : वैनगंगेच्या महापुराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असून पूर ओसरल्यानंतर आता भात शेतात केवळ वाळलेले तणस शिल्लक दिसत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांत नैराश्य पसरले असून अद्यापही प्रशासनाकडून मदतीचे ठोस आश्वासन मिळाले नाही.वैनगंगेला आलेला महापूर १९९४ साली आलेल्या पुरापेक्षाही मोठा असल्याचे वयोवृद्ध सांगतात. असा महाभयानक महापूर कधी पाहिलाच नाही, असेही अनेकांनी सांगितले. वैनगंगेच्या पुरात गावांसह शेतशिवार खरडून गेले. मोहाडी तालुक्यातील करडी, पालोरा परिसराला तर सर्वाधिक फटका बसला. पुराच्या पाण्यात तेलाचा तवंग आणि उग्र वास येत असल्याचे अनेक जण सांगतात. दोन दिवस जरी पुराचे पाणी शेतात थांबले तरी धानपिकाला फारसा फरक पडत नाही. पीक वाळत नाही. मात्र यावर्षी पूर ओसरल्यानंतर शेतात वाळलेले तणसच दिसत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे कळायला मार्ग नाही.यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांना दोनदा पुराचा फटका बसला. हिरवेगार पीक नेस्तनाबूत झाले. शेतजमिन खरडून गेली. पहिल्या पुरानंतर आठवडाभराच्या अंतराने दुसरा पूर आला आणि शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. करडी परिसरात पुरामुळे २२ गावातील तीन हजार हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शेतकरी शेतात जातात तेव्हा समोरील दृष्य पाहून डोळ्यात आसवांचा महापूर आल्याशिवाय राहत नाही. बी - बियाणे आणि मशागतीवर मोठा खर्च केला. परंतु वैनगंगेच्या महापुराने सर्वकाही वाहून नेले. आता शासनाकडून सर्वेक्षण सुरु आहे. परंतु ठोस मदतीचे अद्यापही आश्वासन मिळाले नाही. बँकांचे कर्ज कसे भरावे असा प्रश्न असून घर संसार चालविण्यासाठी सावकाराच्या दारात उभे राहण्याशिवाय पर्याय नाही.पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने हेक्टरी २० हजाराची मदत जाहीर केली. राजकीय नेत्यांसह प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली. केंद्र सरकारकडून अद्यापपर्यंत एक रुपयाही मदत शेतकºयांना मिळाली नाही. अनेक शेतकरी देशोधडीला लागले असून या शेतकºयांना तात्काळ मदत करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. प्रशासनाने तात्काळ सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा अशी मागणी आहे.महापुरात जिल्ह्यातील ४३ हजार व्यक्ती बाधितभंडारा : जिल्ह्यात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या महापुराचा १४४ गावांना फटका बसला असून त्यात ४३ हजार २८४ व्यक्ती बाधीत झाले आहेत. ४ हजार ७३६ घरे उद्ध्वस्त झाली असून ६७३ घरे पूर्णत: तर ४ हजार ६३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. महापुरात ४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असून एक जण जखमी झाला. ३२० पशूधन पुरात वाहून गेले आहेत. पुराचा सर्वाधिक फटका भंडारा तालुक्याला बसला. ४५ गावातील ५२०९ कुटुंब या महापुराच्या तडाख्यात सापडले. १३४१ घरे उद्ध्वस्त झाली असून त्यात ४११ घरे पूर्णत: तर ९३० घरे अंशत: बाधित झाली आहेत. ६९ गोठे महापुराच्या तडाख्यात सापडली असून २६३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

टॅग्स :floodपूर