शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या उरल्या नावापुरत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:15 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत ...

ठळक मुद्देउद्देशापासून फारकत : पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडविता यावे आणि गावात शांतता प्रस्तापित करता यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तंटामुक्त समित्यांची संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण राज्यात समित्यांची ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थापना केली. यामध्ये तंटामुक्त मोहीम राबवून गाव तंटामुक्त करण्याच्या समित्यांना लाखो रुपयाचा पुरस्कारही दिल्या जातो. आजमितीस भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. मात्र अनेक समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे वास्तव्य दिसून येते. बहुतांश पुरस्कारप्राप्त गावातच आता तंटे होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर येत आहे. बºयाच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यसनाधिन व अवैध धंद्यांना शह देणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा असल्याचा उद्देश सफल होण्याबाबत शासंकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या आपल्या उद्देशापासून फारकत घेत असल्याने पोलीस प्रशासनाला आजही गावात वादविवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे समित्यांच्या कर्तव्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे.जिल्हा पोलीस प्रशासनानेही तंटामुक्त समित्यांच्या अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे. अन्यथा गावातील तंटे गावात सुटण्याऐवजी ते वेशीबाहेर येऊन त्याची नक्कीच पोलिसात तक्रार पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.समित्या निरुत्साहीतंटामुक्त समित्यांनी जर खरोखरच जर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊ शकते. परंतु समित्याच जर निरुत्साही असतील तर समित्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अशी आहेत तंटामुक्तीची कर्तव्येगावातील संपूर्ण दारुबंदी करून अनिष्ट चालीरिती, परंपरांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविणे, वनसंवर्धन व वनसंरक्षण करणे, ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबर समित्यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, ईद ए मिलाद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस संरक्षणाविना साजरे करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे अशी समितीची कर्तव्य असले तरी एकही पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.