शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या उरल्या नावापुरत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:15 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत ...

ठळक मुद्देउद्देशापासून फारकत : पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडविता यावे आणि गावात शांतता प्रस्तापित करता यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तंटामुक्त समित्यांची संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण राज्यात समित्यांची ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थापना केली. यामध्ये तंटामुक्त मोहीम राबवून गाव तंटामुक्त करण्याच्या समित्यांना लाखो रुपयाचा पुरस्कारही दिल्या जातो. आजमितीस भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. मात्र अनेक समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे वास्तव्य दिसून येते. बहुतांश पुरस्कारप्राप्त गावातच आता तंटे होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर येत आहे. बºयाच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यसनाधिन व अवैध धंद्यांना शह देणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा असल्याचा उद्देश सफल होण्याबाबत शासंकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या आपल्या उद्देशापासून फारकत घेत असल्याने पोलीस प्रशासनाला आजही गावात वादविवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे समित्यांच्या कर्तव्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे.जिल्हा पोलीस प्रशासनानेही तंटामुक्त समित्यांच्या अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे. अन्यथा गावातील तंटे गावात सुटण्याऐवजी ते वेशीबाहेर येऊन त्याची नक्कीच पोलिसात तक्रार पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.समित्या निरुत्साहीतंटामुक्त समित्यांनी जर खरोखरच जर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊ शकते. परंतु समित्याच जर निरुत्साही असतील तर समित्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अशी आहेत तंटामुक्तीची कर्तव्येगावातील संपूर्ण दारुबंदी करून अनिष्ट चालीरिती, परंपरांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविणे, वनसंवर्धन व वनसंरक्षण करणे, ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबर समित्यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, ईद ए मिलाद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस संरक्षणाविना साजरे करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे अशी समितीची कर्तव्य असले तरी एकही पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.