शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या उरल्या नावापुरत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:15 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत ...

ठळक मुद्देउद्देशापासून फारकत : पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष

आॅनलाईन लोकमतभंडारा : ग्रामस्तरावरील तंटे सामोपचाराने गावातच मिटवून गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. मात्र बहुतांश गावात तंटामुक्त समितीचेच अध्यक्ष वादग्रस्त ठरत असून गावातील तंटे अशामुळे सुटतील काय, असा प्रश्न उपस्थित होत असून अनेक ठिकाणी तंटामुक्त समित्या नावालाच उरल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच सोडविता यावे आणि गावात शांतता प्रस्तापित करता यावी हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून तंटामुक्त समित्यांची संकल्पना अस्तित्वात आणली. संपूर्ण राज्यात समित्यांची ग्रामपंचायतीत ठराव घेऊन स्थापना केली. यामध्ये तंटामुक्त मोहीम राबवून गाव तंटामुक्त करण्याच्या समित्यांना लाखो रुपयाचा पुरस्कारही दिल्या जातो. आजमितीस भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या अस्तित्वात आहेत. मात्र अनेक समित्यांचे काम केवळ कागदोपत्री सुरु असल्याचे वास्तव्य दिसून येते. बहुतांश पुरस्कारप्राप्त गावातच आता तंटे होत असल्याचे गंभीर प्रकरण समोर येत आहे. बºयाच गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व्यसनाधिन व अवैध धंद्यांना शह देणारे असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीचा असल्याचा उद्देश सफल होण्याबाबत शासंकता निर्माण होत आहे. बऱ्याच दिवसांपासून तंटामुक्त समित्या आपल्या उद्देशापासून फारकत घेत असल्याने पोलीस प्रशासनाला आजही गावात वादविवादाप्रसंगी दाखल व्हावे लागत आहे. यामुळे समित्यांच्या कर्तव्याची पुन्हा एकदा उजळणी करण्याची गरज आहे.जिल्हा पोलीस प्रशासनानेही तंटामुक्त समित्यांच्या अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा देणे गरजेचे आहे. अन्यथा गावातील तंटे गावात सुटण्याऐवजी ते वेशीबाहेर येऊन त्याची नक्कीच पोलिसात तक्रार पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही.समित्या निरुत्साहीतंटामुक्त समित्यांनी जर खरोखरच जर ग्रामस्तरावर विविध उपक्रम राबविल्यास समाजात जनजागृती होऊ शकते. परंतु समित्याच जर निरुत्साही असतील तर समित्यांचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अशी आहेत तंटामुक्तीची कर्तव्येगावातील संपूर्ण दारुबंदी करून अनिष्ट चालीरिती, परंपरांना प्रतिबंध करणे, त्याचबरोबर विविध उत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबविणे, वनसंवर्धन व वनसंरक्षण करणे, ग्रामसुरक्षा दल स्थापन करून गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, शिवाय गावातील तंटे गावातच सामंजस्याने सोडविण्याबरोबर समित्यांनी गणेशोत्सव, बकरी ईद, ईद ए मिलाद आदी धार्मिक कार्यक्रम पोलीस संरक्षणाविना साजरे करणे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणे अशी समितीची कर्तव्य असले तरी एकही पूर्ण होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.